शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

बिहारनंतर आता देशभरात लागू होणार SIR; निवडणूक आयोग लागला तयारीला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 13:35 IST

Pan India SIR: देशभरात मतदार यादीचे विशेष पुनरावलोकन सुरू होणार; 'ही' कागदपत्रे अनिवार्य

Pan India Sir: बिहारनंतर आता देशभरात SIR (Special Intensive Revision) म्हणजेच मतदार यादीचे विशेष पुनरावलोकन सुरू होणार आहे. ही प्रक्रिया मंगळवारपासून (28 ऑक्टोबर) सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी भारत निवडणूक आयोगाने आज सर्व राज्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.

निवडणुका होणाऱ्या राज्यांना प्राधान्य

पहिल्या फेजमध्ये असम, तमिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये एसआयआरची अंमलबजावणी केली जाणार आहे. या सर्व राज्यांमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. याशिवाय उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्येही ही प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, 2026 मध्ये ज्या राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्या राज्यांना प्राधान्याने या प्रक्रियेत समाविष्ट केले जाईल.

आवश्यक कागदपत्रांची यादी 

एसआयआरच्या प्रक्रियेत नागरिकांना स्वतःची ओळख आणि भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी एकूण 12 कागदपत्रे सादर करावी लागतील. ही यादी बिहार मॉडेलप्रमाणेच असेल. यापैकी आधी 11 दस्तऐवजांची यादी आयोगाने जारी केली होती, परंतु सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता ‘आधार कार्ड’ही समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र आयोगाने स्पष्ट केले आहे की, “आधार फक्त ओळखपत्र म्हणून मान्य असेल, नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी नाही.”

कोणती कागदपत्रे लागणार? 

आधार कार्ड

मतदार ओळखपत्र 

पासपोर्ट

ड्रायव्हिंग लायसन्स

पॅन कार्ड

रेशन कार्ड

रहिवासी दाखला 

वीज, पाणी किंवा गॅस बिल

बँक पासबुक

मनरेगा जॉब कार्ड

2002 च्या मतदार यादीची प्रत

ही कागदपत्रे व्यक्तीची ओळख आणि कायमचा पत्ता सिद्ध करण्यासाठी वापरली जातील.

नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी लागणारे दस्तऐवज

जन्म प्रमाणपत्र

शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 

2002 च्या मतदार यादीतील पालकांचे नाव

ज्यांचे नाव आधीच 2002 च्या मतदार यादीत आहे, त्यांना फक्त गणना फॉर्म आणि त्या यादीची प्रत द्यावी लागेल. परंतु जर एखाद्या व्यक्तीचे नाव त्या यादीत नसून पालकांचे नाव त्यात असेल, तर त्याला आपला ओळख पुरावा आणि पालकांचे नाव असलेली 2002 ची यादीची प्रत दोन्ही सादर करावी लागेल.

मतदार यादी अधिक पारदर्शक करण्याचे उद्दिष्ट 

निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की, या प्रक्रियेमुळे मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि फसवणूकमुक्त केली जाईल. त्यामध्ये दुहेरी नोंदी, फेक एन्ट्री आणि गैरकायदेशीर मतदार वगळण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, आयोगाने स्पष्ट केले आहे की, “केवळ आधार कार्डाच्या आधारे कोणालाही भारतीय नागरिक मानले जाणार नाही.”

English
हिंदी सारांश
Web Title : Pan-India SIR rollout after Bihar; Election Commission prepares.

Web Summary : Following Bihar, a Special Intensive Revision (SIR) of voter lists will be implemented nationwide, prioritizing states with upcoming elections. Citizens need to submit documents, including Aadhaar (as ID only), to verify identity and citizenship, ensuring a transparent voter list.
टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूक 2024Tamilnaduतामिळनाडूwest bengalपश्चिम बंगालUttar Pradeshउत्तर प्रदेश