शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
3
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
4
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
5
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
6
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
7
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
8
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
9
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
10
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
11
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
12
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
13
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
14
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
15
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
16
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
17
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
18
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
19
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
20
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...

बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानची पाणबुडी गायब झालेली; नौदलाने 21 दिवस घेतला शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 15:48 IST

पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये 40 जवान शहीद झाले होते.

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर 12 दिवसांत भारतानेपाकिस्तानात एअर स्ट्राईक करून जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला होता. यानंतर लगेचच समुद्रात भारतीय नौदलाच्या हालचाली वेगवान झाल्या होत्या. भारताच्या काही युद्धनौकांनी पाकिस्तानकडे कूच केले होते. या घडामोडींचा खुलासा झाला आहे. 

पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. याचा बदला भारताने लगेचच घेतला होता. यामुळे पाकिस्ताननेही दुसऱ्या दिवशी अमेरिकेने दिलेली एफ 16 विमाने भारतात घुसविली होती. यामध्ये पाकिस्तानचे एक विमान पाडले होते. तर पाकिस्तानचे हेलिकॉप्टर समजून भारतीय पायलटने भारताचेच हेलिकॉप्टर पाडले होते. यानंतर लगेचच भारतीय नौदल सतर्कतेच्या इशाऱ्यावर गेले होते. भारत-पाकिस्तान दरम्यान तेव्हा युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होती. या हवाई हल्ल्यानंतर भारतीय युद्धनौकांची हालचाल वाढली होती. यामागचे कारण आता समोर आले आहे. पाकिस्तानची सर्वाच आधुनिक अगोस्टा श्रेणीतील पाणबुडी पीएनएस साद ही पाकिस्तानी पाण्यातून अचानक गायब झाली होती, असे एका केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्याने एएनआयला सांगितले आहे. 

महत्वाचे म्हणजे ही पाणबुडी साधारण पाणबुड्यांपेक्षा वेगळी आहे. ती बराचकाळ हवा घेण्यासाठी वरती न येता पाण्याखाली राहू शकते. यामुळे ही पाणबुडी शेवटची दिसल्याचे ठिकाणावरून ती गुजरातच्या समुद्रात गेल्याचा अंदाज लावला जात होता. या ठिकाणापासून गुजरात दोन दिवसांवर आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई पाच दिवसांच्या अंतरावर होती. यामुळे देशाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. 

आता नेव्हीचा स्ट्राइक?, भारताकडून अरबी समुद्रात युद्धनौका, पाणबुड्या अन् लढाऊ विमानं तैनात

यामुळे भारतीय नौदलाने तातडीने या पाणबुडीचा शोध सुरु केला. यासाठी पाणबुडीविरोधी युद्धनौका आणि विमानांचा वापर करण्यात येत होता. या वेळात पाकिस्तानची पाणबुडी ज्या भागात जाण्याची शक्यता होती, तेथे कसून शोध घेतला जात होता. जर पीएनएस साद भारताच्या हद्दीत घुसली असती तर तिच्यावर समुद्राच्या तटावर आणण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याचे आदेश देण्यात आले होते. प्रसंगी या पाणबुडीवर लष्करी कारवाईही करण्याची मुभा देण्यात आली होती, असे या अधिकाऱ्याने सांगितले. 

या साठी भारताची अण्वस्त्रांनी युक्त असलेली पाणबुडी आयएनएस चक्रलाही पाकिस्तानच्या समुद्री सीमेवर पाठविण्यात आले होते. तसेच स्कॉर्पिऑन श्रेणीतील आयएनएस कलावरीला पाणबुडीलाही सादच्या मागावर पाठविम्यात आले होते. शिवाय नौदलाने व्याप्ती वाढवत सॅटेलाईट आणि बोटींचीही मदत घेतली होती. हा शोध तब्बल 21 दिवस सुरु होता. ती अन्यत्र कुठेतरी लपविण्यात आली असावी असा निष्कर्ष काढण्यात आला. 21 दिवसांनंतर ही पाणबुडी पाकिस्तानच्या पश्चिमेकडे आढळून आली. 

भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव वाढल्यानंतर नौदलाने आयएनएस विक्रमादित्यसह तब्बल 60 युद्धनौका समुद्रात तैनात केल्या होत्या. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानindian navyभारतीय नौदलIndiaभारत