शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानची पाणबुडी गायब झालेली; नौदलाने 21 दिवस घेतला शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 15:48 IST

पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये 40 जवान शहीद झाले होते.

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर 12 दिवसांत भारतानेपाकिस्तानात एअर स्ट्राईक करून जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला होता. यानंतर लगेचच समुद्रात भारतीय नौदलाच्या हालचाली वेगवान झाल्या होत्या. भारताच्या काही युद्धनौकांनी पाकिस्तानकडे कूच केले होते. या घडामोडींचा खुलासा झाला आहे. 

पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. याचा बदला भारताने लगेचच घेतला होता. यामुळे पाकिस्ताननेही दुसऱ्या दिवशी अमेरिकेने दिलेली एफ 16 विमाने भारतात घुसविली होती. यामध्ये पाकिस्तानचे एक विमान पाडले होते. तर पाकिस्तानचे हेलिकॉप्टर समजून भारतीय पायलटने भारताचेच हेलिकॉप्टर पाडले होते. यानंतर लगेचच भारतीय नौदल सतर्कतेच्या इशाऱ्यावर गेले होते. भारत-पाकिस्तान दरम्यान तेव्हा युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होती. या हवाई हल्ल्यानंतर भारतीय युद्धनौकांची हालचाल वाढली होती. यामागचे कारण आता समोर आले आहे. पाकिस्तानची सर्वाच आधुनिक अगोस्टा श्रेणीतील पाणबुडी पीएनएस साद ही पाकिस्तानी पाण्यातून अचानक गायब झाली होती, असे एका केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्याने एएनआयला सांगितले आहे. 

महत्वाचे म्हणजे ही पाणबुडी साधारण पाणबुड्यांपेक्षा वेगळी आहे. ती बराचकाळ हवा घेण्यासाठी वरती न येता पाण्याखाली राहू शकते. यामुळे ही पाणबुडी शेवटची दिसल्याचे ठिकाणावरून ती गुजरातच्या समुद्रात गेल्याचा अंदाज लावला जात होता. या ठिकाणापासून गुजरात दोन दिवसांवर आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई पाच दिवसांच्या अंतरावर होती. यामुळे देशाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. 

आता नेव्हीचा स्ट्राइक?, भारताकडून अरबी समुद्रात युद्धनौका, पाणबुड्या अन् लढाऊ विमानं तैनात

यामुळे भारतीय नौदलाने तातडीने या पाणबुडीचा शोध सुरु केला. यासाठी पाणबुडीविरोधी युद्धनौका आणि विमानांचा वापर करण्यात येत होता. या वेळात पाकिस्तानची पाणबुडी ज्या भागात जाण्याची शक्यता होती, तेथे कसून शोध घेतला जात होता. जर पीएनएस साद भारताच्या हद्दीत घुसली असती तर तिच्यावर समुद्राच्या तटावर आणण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याचे आदेश देण्यात आले होते. प्रसंगी या पाणबुडीवर लष्करी कारवाईही करण्याची मुभा देण्यात आली होती, असे या अधिकाऱ्याने सांगितले. 

या साठी भारताची अण्वस्त्रांनी युक्त असलेली पाणबुडी आयएनएस चक्रलाही पाकिस्तानच्या समुद्री सीमेवर पाठविण्यात आले होते. तसेच स्कॉर्पिऑन श्रेणीतील आयएनएस कलावरीला पाणबुडीलाही सादच्या मागावर पाठविम्यात आले होते. शिवाय नौदलाने व्याप्ती वाढवत सॅटेलाईट आणि बोटींचीही मदत घेतली होती. हा शोध तब्बल 21 दिवस सुरु होता. ती अन्यत्र कुठेतरी लपविण्यात आली असावी असा निष्कर्ष काढण्यात आला. 21 दिवसांनंतर ही पाणबुडी पाकिस्तानच्या पश्चिमेकडे आढळून आली. 

भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव वाढल्यानंतर नौदलाने आयएनएस विक्रमादित्यसह तब्बल 60 युद्धनौका समुद्रात तैनात केल्या होत्या. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानindian navyभारतीय नौदलIndiaभारत