शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

दहशतवादी तळ उद्धवस्त केल्याचा भारताचा दावा खोटा असल्याचा पाकिस्तानचा कांगावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 01:59 IST

पाकव्याप्त काश्मीरमधील तीन दहशतवादी तळ उद्धवस्त केल्याचा भारताचा दावा खोटा असल्याचा कांगावा पाकिस्तानने केला आहे.

इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्मीरमधील तीन दहशतवादी तळ उद्धवस्त केल्याचा भारताचा दावा खोटा असल्याचा कांगावा पाकिस्तानने केला आहे. जिथे मारा केला त्या जागी भारताने कोणाही विदेशी राजदूत किंवा पत्रकारांना घेऊन जावे व आपला दावा खरा असल्याचे सिद्ध करून दाखवावे, असे आव्हानही पाकिस्तानने दिले आहे.

पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील तंगधर व केरान क्षेत्रामध्ये केलेल्या माऱ्याला भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तरात पाकिस्तानचे सहा ते दहा सैनिक मारले गेले व तीन दहशतवादी तळ उद््ध्वस्त करण्यात आले, असे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी रविवारी सांगितले होते. या माºयात पाकिस्तानच्या आणखी एका दहशतवादी तळाचे मोठे नुकसान झाले असून, सीमेपलीकडून होणाºया दहशतवादी कारवायांना त्यामुळे मोठा तडाखा बसला आहे, असेही ते म्हणाले होते. रावत यांनी केलेला दावा खोटा असल्याचे पाकिस्तानच्या लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असीफ गफूर यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले की, अत्यंत जबाबदारीच्या पदावर काम करणाºया रावत यांच्यासारख्या व्यक्तीने असे दावे करणे चुकीचे आहे. भारतीय लष्कराने मारा केला तिथे एकही दहशतवादी तळ नव्हता. भारताच्या पाकिस्तानातील राजदूतावासाने कोणाही विदेशी राजदूताला किंवा पत्रकारांना घेऊन त्या जागेवर जावे आणि खातरजमा करून घ्यावी.

भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सातत्याने खोटे दावे करण्यात येत असून हे प्रकार विशेषत: पुलवामा हल्ल्यानंतर अधिक वाढले आहेत. त्यामुळे प्रादेशिक शांततेला धोका निर्माण झाला आहे. देशांतर्गत काही कुहेतूंची पूर्तता करण्यासाठी भारतीय लष्कर सातत्याने खोटे दावे करीत आहेत. हे वर्तन लष्करी मूल्यांचा भंग करणारे आहे, असेही गफूर यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

घुसखोरीच्या प्रयत्नांना अटकाव

काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम भारताने ५ आॅगस्ट रोजी रद्द केल्यानंतर पाकिस्तानच्या अंगाचा तिळपापड झाला आहे. काश्मीरप्रश्नी आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानने कांगावा केला; पण त्या देशाला कोणीही फारसे गांभीर्याने घेतले नाही.त्यानंतर पाकिस्तानने भारतातील कुरापती आणखी वाढविल्या आहेत. दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय करून तेथून दहशतवादी भारतात घुसविण्याचे जोरदार प्रयत्न पाकिस्तानकडून होत आहेत. त्याला भारताने रविवारी कारवाईद्वारे अटकाव केल्याने पाकिस्तान संतप्त झाला आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी