शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

पाकिस्तान हे दहशतवादाचे केंद्र, भारताकडून इम्रान खान यांच्या दाव्याची पोलखोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 20:59 IST

पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध नसल्याचे सांगत हात झटकण्याचा प्रयत्न केला होता.

ठळक मुद्देपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुलवामा हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध नसल्याचे सांगत हात झटकण्याचा प्रयत्न केला होतापाकिस्तान हा दहशकवादाचे केंद्र असून, पाकिस्तानी पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेबाबत आश्चर्य वाटले नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे

नवी दिल्ली - पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध नसल्याचे सांगत हात झटकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पाकिस्तानी पंतप्रधानांच्या या दाव्याची भारताने पोलखोल केली आहे. पाकिस्तान हा दहशकवादाचे केंद्र असून, पाकिस्तानी पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेबाबत आश्चर्य वाटले नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मांडलेल्या भूमिकेबाबत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक पत्रक प्रसिद्ध करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ''पाकिस्तानी पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेबाबत आम्हाला आश्चर्य वाटलेले नाही. एवढ्या भीषण हल्ल्याचा साधा निषेधही त्यांनी नोंदवला नाही. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी जैश ए मोहम्मदसारख्या दहशतावादी संघटनेने केलेल्या दाव्याकडेही दुर्लक्ष केले आहे. मात्र जैश ए मोहम्मद ही संघटना आणि त्यांचा म्होरक्या मसूद अझहर हे पाकिस्तानात वास्तव्यास आहेत,'' असे परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या पत्रकात म्हटले आहे.  ''पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताने पुरावे दिल्यास तपास करू असा प्रस्ताव पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दिला आहे. मात्र पाकिस्तानकडून देण्यात येणारे आणि घासून गुळगुळीत झालेले हे वक्तव्य आहे. मुंबई हल्ल्यावेळी पण पाकिस्तानला पुरावे देण्यात आले होते. मात्र गेल्या 10 वर्षांत त्यासंबंधीच्या प्रकरणात काहीही प्रगती झालेली नाही.'' असा टोला परराष्ट्र मंत्रालयाने लगावला आहे. दरम्यान, पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर गप्प बसलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अखेर या प्रकरणावरील आपले मौन सोडले. मात्र पुलवामा हल्ल्याचा साधा निषेध नोंदवण्यापेक्षा इम्रान खान यांनी भारतालाच धमकावण्याचा प्रयत्न केला. भारतात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे पाकिस्तानवर हल्ला झाल्यास राजकीय लाभ मिळू शकतो. मात्र पाकिस्तानवर हल्ला केला तर पाकिस्तानही त्याला प्रत्युत्तर देईल, अशी धमकी इम्रान खान यांनी दिली.  

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारतImran Khanइम्रान खान