शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
2
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
3
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
4
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
5
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
6
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
7
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
8
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
9
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
10
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
11
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
12
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
13
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
14
'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
15
थ्रिलर फिल्मपेक्षाही भयंकर! जावयासोबत सासूचं सूत जुळलं, अडसर ठरणाऱ्या नवऱ्यालाच संपवलं
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना...
17
गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं, तीन दिवसंपासून घसरतोय हा शेअर; आजही 5.58% आपटला, काय म्हणतात एक्सपर्ट?
18
एका दिवसात १ लाख कोटींचा धुराळा! टाटांच्या 'या' कंपनीचा शेअर धडाम; संक्रांतीपूर्वीच गुंतवणूकदारांना 'धक्का'
19
ना भिंतीवर पोस्टर, ना रॅली, ना फ्लेक्सबाजी; जपानची निवडणूक पद्धत पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
20
T20 Word Cup: ४ परदेशी खेळाडूंना भारताचा व्हिसा नाकारला; 'पाकिस्तान कनेक्शन' पडले महागात
Daily Top 2Weekly Top 5

'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 19:31 IST

India on khuzdar blast: असंतोषाने धुमसत असलेल्या बलुचिस्तानातील खुजदारमध्ये बॉम्बस्फोट झाला. या घटनेमागे भारताचा हात असल्याचा कांगावा पाकिस्तानने केला. त्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला तिखट शब्दात सुनावले.

India Pakistan News: पाकिस्तानातील बलुसिस्तान प्रांतामध्ये बॉम्बस्फोटाची घटना घडली. बुधवारी झालेल्या या बॉम्बस्फोटात चार मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला. शाळेच्या बसमध्येच बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. या घटनेमागे भारताचा हात असल्याचा कांगावा पाकिस्तानने केला. त्यावर भारताने पाकिस्तानची चांगलीच कानउघाडणी केली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

खुजदारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटा प्रकरणी पाकिस्तानने केलेले दावे भारताने फेटाळून लावले आहेत. जगातील दहशतवाद्यांचा केंद्रबिंदू असलेल्या पाकिस्तानचे आरोप बिनबुडाचे असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. पाकिस्तान स्वतःच्या मुद्द्यांवरून जगाची दिशाभूल करण्यासाठी अशा गोष्टी करतो, अशा शब्दात भारताने सुनावले. 

'पाकिस्तानच प्रयत्न फसलाय', भारताने सुनावले

भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी पाकिस्तानने केलेल्या कांगाव्याला उत्तर दिले आहे. 

वाचा >>ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

"खुजदारमध्ये आज घडलेल्या घटनेमध्ये भारतीयाचा सहभाग असल्याचा पाकिस्तानाचा बिनबुडाचा आरोप भारत फेटाळून लावतो. या घटनेतील मृतांप्रती भारत तीव्र दुःख व्यक्त करतो. दहशतवाद्यांचे जागतिक केंद्र असल्याची आपली प्रतिमेवरून लक्ष भरकटवण्यासाठी आणि स्वतःचे अपयश लपवण्याची पाकिस्तानची ही सवय झाली आहे. पाकिस्तान त्याच्या देशातंर्गत समस्यांबद्दल भारताला दोषी ठरवत असतो, ही त्याची सवय आहे. पण, जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न पूर्णपणे फसला आहे', अशा शब्दात भारताने पाकिस्ताना खडेबोल सुनावले आहेत. 

बॉम्बस्फोटाची कुणी घेतली जबाबादरी?

पाकिस्तानातील खुजदारमध्ये शाळेच्या बसमध्ये झालेल्या स्फोटात चार विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला. ही शाळा लष्कराकडून चालवण्यात येते. ज्यावेळी बसमध्ये स्फोट झाला, त्यावेळी बसमधून ४० विद्यार्थी प्रवास करत होते. 

याच घटनेवरून पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारतावर आरोप केले होते. या घटनेमध्ये भारताचा सहभागा असल्याचे ते म्हणाले होते. त्याला भारताकडून उत्तर देण्यात आले. दरम्यान, बॉम्बस्फोटाची जबाबदारी पाकिस्तानातील तहरीक ए तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरBlastस्फोटIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPakistanपाकिस्तान