शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

पाकिस्तानचे नापाक कारस्थान उधळले! भारतीय अधिकाऱ्यांना हनिट्रॅपमध्ये अडकवण्याचा होता डाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 08:11 IST

सातत्याने भारताला पाण्यात पाहणाऱ्या आणि भारतविरोधी कारवाया करणारी पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयचे अजून एक नापाक कृत्य भारताने हाणून पाडले आहे.

नवी दिल्ली - सातत्याने भारताला पाण्यात पाहणाऱ्या आणि भारतविरोधी कारवाया करणारी पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयचे अजून एक नापाक कृत्य भारताने हाणून पाडले आहे. भारतीय अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी आयएसआयने हनिट्रॅप लावला होता. भारतीय अधिकाऱ्यांच्या चाणाक्षपणामुळे हा डाव उधळून लावण्यात यश मिळाले आहे. यासंदर्भात तीन भारतीय अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असून, काही दिवसांपूर्वी या अधिकाऱ्यांनी आयएसआयच्या या डावाबाबत आपल्या विभागाला माहिती दिली होती. इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. भारतीय अधिकाऱ्यांकडून गोपनीय माहिती मिळवण्यासाठी आयएसआयने हा डाव आखला होता. मात्र या अधिकाऱ्यांनी या डावाला बळी पडत कोणतेही चुकीचे कृत्य केल्याचे समोर आलेले नाही. तिन्ही भारतीय अधिकाऱी चौकशीला सहकार्य करत असून, आतापर्यंत कोणत्याही दृष्टीकोनातून या अधिकाऱ्यांना संशयित मानण्यात आलेले नाही. भारतासंदर्भातील काही गोपनीय दस्तऐवज हस्तगत करण्यासाठी पाकिस्तान अशी चाल खेळू शकतो, असा संशय आधीपासूनच असल्याने हा डाव उधळून लावता आला. सध्यातरी या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी सुरू असून, या अधिकाऱ्यांना पुन्हा पाकिस्तानमध्ये पाठवण्यात येणार नाही, अशी शक्यता आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या एका सूत्राने सांगितले की, "हे भारतीय अधिकारी पाकिस्तानमधील भाषा विभागात कार्यरत होते. भारतातून आलेल्या महत्त्वपूर्ण कागदपत्रांचे भाषांतर करण्याचे काम हे अधिकारी करत असत. या अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी पाकिस्तानकडून अनेक वेळा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. कनिष्ठ भारतीय अधिकाऱ्यांना पाकिस्तानमधील कुठल्यातरी गोपनीय ठिकाणी नेऊन त्यांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ बनवण्याचा डाव होता. या व्हिडिओंचा वापर करून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याच्या प्रयत्नात आयएसआय होती." शत्रूराष्ट्रासंदर्भात गोपनीय माहिती हस्तगत गण्यासाठी अशा प्रकारचे सापळे जगभरात लावले जातात. मात्र, पाकिस्तानकडून भारतीय अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आखण्यात आलेली योजना काहीशी धक्कादायक आणि चिंता वाढवणारी आहे. पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेच्या या कटकारस्थानाबाबत भारताच्या अधिकाऱ्यांना आधीच सुगावा लागलेला असल्याने त्यांनी आपल्या वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर भारत सरकराने या अधिकाऱ्यांना माघारी बोलावले आहे.  आता या प्रकरणावर काय कारवाई करायची याबाबतचा निर्णय सरकारकडून पुढच्या काही दिवसांत घेण्यात येईल.  तसेच या अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवण्यासाठी पाकिस्तानकडून महिलांचा वापर झाला का याचीही चौकशी करण्यात येणार आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान