शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पाकिस्तानचे नापाक कारस्थान उधळले! भारतीय अधिकाऱ्यांना हनिट्रॅपमध्ये अडकवण्याचा होता डाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 08:11 IST

सातत्याने भारताला पाण्यात पाहणाऱ्या आणि भारतविरोधी कारवाया करणारी पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयचे अजून एक नापाक कृत्य भारताने हाणून पाडले आहे.

नवी दिल्ली - सातत्याने भारताला पाण्यात पाहणाऱ्या आणि भारतविरोधी कारवाया करणारी पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयचे अजून एक नापाक कृत्य भारताने हाणून पाडले आहे. भारतीय अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी आयएसआयने हनिट्रॅप लावला होता. भारतीय अधिकाऱ्यांच्या चाणाक्षपणामुळे हा डाव उधळून लावण्यात यश मिळाले आहे. यासंदर्भात तीन भारतीय अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असून, काही दिवसांपूर्वी या अधिकाऱ्यांनी आयएसआयच्या या डावाबाबत आपल्या विभागाला माहिती दिली होती. इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. भारतीय अधिकाऱ्यांकडून गोपनीय माहिती मिळवण्यासाठी आयएसआयने हा डाव आखला होता. मात्र या अधिकाऱ्यांनी या डावाला बळी पडत कोणतेही चुकीचे कृत्य केल्याचे समोर आलेले नाही. तिन्ही भारतीय अधिकाऱी चौकशीला सहकार्य करत असून, आतापर्यंत कोणत्याही दृष्टीकोनातून या अधिकाऱ्यांना संशयित मानण्यात आलेले नाही. भारतासंदर्भातील काही गोपनीय दस्तऐवज हस्तगत करण्यासाठी पाकिस्तान अशी चाल खेळू शकतो, असा संशय आधीपासूनच असल्याने हा डाव उधळून लावता आला. सध्यातरी या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी सुरू असून, या अधिकाऱ्यांना पुन्हा पाकिस्तानमध्ये पाठवण्यात येणार नाही, अशी शक्यता आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या एका सूत्राने सांगितले की, "हे भारतीय अधिकारी पाकिस्तानमधील भाषा विभागात कार्यरत होते. भारतातून आलेल्या महत्त्वपूर्ण कागदपत्रांचे भाषांतर करण्याचे काम हे अधिकारी करत असत. या अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी पाकिस्तानकडून अनेक वेळा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. कनिष्ठ भारतीय अधिकाऱ्यांना पाकिस्तानमधील कुठल्यातरी गोपनीय ठिकाणी नेऊन त्यांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ बनवण्याचा डाव होता. या व्हिडिओंचा वापर करून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याच्या प्रयत्नात आयएसआय होती." शत्रूराष्ट्रासंदर्भात गोपनीय माहिती हस्तगत गण्यासाठी अशा प्रकारचे सापळे जगभरात लावले जातात. मात्र, पाकिस्तानकडून भारतीय अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आखण्यात आलेली योजना काहीशी धक्कादायक आणि चिंता वाढवणारी आहे. पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेच्या या कटकारस्थानाबाबत भारताच्या अधिकाऱ्यांना आधीच सुगावा लागलेला असल्याने त्यांनी आपल्या वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर भारत सरकराने या अधिकाऱ्यांना माघारी बोलावले आहे.  आता या प्रकरणावर काय कारवाई करायची याबाबतचा निर्णय सरकारकडून पुढच्या काही दिवसांत घेण्यात येईल.  तसेच या अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवण्यासाठी पाकिस्तानकडून महिलांचा वापर झाला का याचीही चौकशी करण्यात येणार आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान