शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

पाक दहशतवादी आज काश्मीरमध्ये मोठा हल्ला करण्याची शक्यता; ११ मे हाच दिवस का निवडला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 08:01 IST

जैश-ए-मोहम्मदमध्ये बहुतांश विदेशी अतिरेकी आहेत, परंतु पुलवामा कार हल्ल्याप्रमाण स्थानिक काश्मिरींचा वापर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी करण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देगाजी हैदर उर्फ ​​सैफुल्ला मीरला हिज्बुल मुजाहिद्दीनने काश्मीरचा प्रमुख बनवलाआज काश्मीरमध्ये कार बॉम्ब अथवा आत्मघाती हल्ला करण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणेच्या रिपोर्टनंतर काश्मीर खोऱ्यात रेड अलर्ट

नवी दिल्ली - पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद सोमवारी जम्मू-काश्मीरमध्ये हल्ल्याची योजना आखत आहे. गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनंतर सुरक्षा दलाला रेड अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. दहशतवादी कार बॉम्ब किंवा आत्मघाती बॉम्बद्वारे हल्ला करण्याची शक्यता असल्याचा संशय सुरक्षा दलाला आहे.

हिज्बुल मुजाहिद्दीनने रियाज नायकू चकमकीत ठार झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील संघटनेचा प्रमुख म्हणून गाजी हैदर उर्फ ​​सैफुल्ला मीर याची नियुक्ती केली आहे. एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की गाजी हैदर हे त्याचे खोटे नाव आहे, गाजी म्हणजे इस्लामिक योद्धा आणि हैदर म्हणजे शूर. नव्या हिजबुल प्रमुखचा शोध लवकरच सुरू केला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. दहशतवादी संघटनेने दुसरी फळीही तयार केली आहे. गाजी हैदरचा उपप्रमुख जफर उल इस्लाम असेल आणि अबू तारिकला मुख्य सैन्य सल्लागारची जबाबदारी देण्यात आली आहे.

सुरक्षा दलाची पहिली प्राथमिकता म्हणजे ११ मे रोजी जैश-ए-मोहम्मदचा संभाव्य हल्ला रोखणे ही आहे. अनेक दिवसांपासून दहशतवादी संघटना या हल्ल्याची तयारी करत आहे.. गुप्तचर अहवालानुसार गेल्या आठवड्यात जैशचा प्रमुख मुफ्ती अब्दुल रऊफ असगरने आयएसआयच्या प्रमुखाची भेट घेतली.

सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, ११ मे हीच तारीख का निवडली त्यामागे कारण आहे. आज रमजानचा १७ वा दिवस आहे. याच दिवशी सौदी अरेबियामध्ये बद्रची लढाई सुरू झाली, जी काही शंभर सैनिकांनी जिंकली. इस्लामी इतिहासामधील हा एक मोठा विजय म्हणून पाहिला जातो तसेच हे एक महत्त्वपूर्ण वळण मानले जाते. याव्यतिरिक्त, पोखरणमधील अणू चाचणीच्या परीक्षणाचा २२ वा वर्धापन दिन आहे. ११ मे १९८८ रोजी भारत अणुऊर्जा संपन्न देश बनला होता.

जैश-ए-मोहम्मदमध्ये बहुतांश विदेशी अतिरेकी आहेत, परंतु पुलवामा कार हल्ल्याप्रमाण स्थानिक काश्मिरींचा वापर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी करण्याची शक्यता आहे. काश्मीर पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानच्या या दहशतवादी गटासाठी हे कमी खर्चिक आहे. तसेच हा हल्ला स्थानिक काश्मिरींनी केला असा दावा करणेही पाकिस्तानला सोयीस्कर जातं.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मद