शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

काश्मीरवर बोलता बोलता इम्रान खान यांच्याकडून दहशतवादी डारचं समर्थन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 21:23 IST

पुलवामात 40 जवानांचे प्राण घेणाऱ्या दहशतवाद्याचा खान यांना पुळका

इस्लामाबाद: भारताच्या कठोर कारवाईनं पाकिस्तानमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळेच भारतीय हवाई दलाच्या कारवाईनंतर अवघ्या दोनच दिवसात पाकिस्ताननं शांतीचा सूर लावला आहे. आम्हाला शांतता हवी आहे. युद्ध करण्याची आमची इच्छा नाही, असं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज संसदेत म्हटलं. मात्र भारतावर टीका करता करता खान यांनी दहशतवादाचं अप्रत्यक्षपणे समर्थन केलं. विशेष म्हणजे पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करणारा दहशतवादी आदिल अहमदचं त्यांनी समर्थन केलं. भारत सरकारकडून काश्मीरमध्ये अत्याचार सुरू आहेत. त्याचमुळे एक 20 वर्षांचा तरुण आत्मघाती हल्लेखोर झाला, असं इम्रान खान म्हणाले. आदिल अहमद डार स्वातंत्र्याची भाषा करत होता. त्यामुळेच त्यानं स्वत:ला स्फोटकांसह उडवलं, असंदेखील खान यांनी म्हटलं. आदिलचा पुरेपूर बचाव करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यासाठी खान यांनी तमिळ टायगर्सचा संदर्भ दिला. पाकिस्तान गेल्या 20 वर्षांपासून आपल्याच जमिनीवर दहशतवादाचा सामना करत असल्याचंदेखील खान म्हणाले. भारतावर टीका करताना खान यांनी दहशतवाद्यांचं समर्थन केलं. पुलवामातील हल्ला आपल्याच स्थानिक दहशतवाद्यानं केल्याचं जैश ए मोहम्मदनं जाहीर केलं होतं. जैशचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरनं डारचं कौतुकदेखील केलं होतं. यासाठी अजहरनं ऑडिओ क्लिपदेखील जारी केली होती. संसदेत बोलताना इम्रान खान यांनी पुन्हा एकदा काश्मीर राग आळवला. गेल्या चार वर्षांपासून काश्मीरमध्ये स्वातंत्र्याची मागणी जोर धरु लागली आहे. याबद्दल भारतीय जनतेनं सरकारला प्रश्न विचारायला हवेत, असं खान म्हणाले. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदterroristदहशतवादी