शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, गोळीबारात 1 जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 19:15 IST

काश्मीर सीमेलगत पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. जम्मू काश्मीरच्या पुलवामामधील केरी, बटल यापरिसरात रविवारपासून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे

जम्मू - काश्मीर सीमेलगत पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. जम्मू काश्मीरच्या पुलवामामधील केरी, बटल यापरिसरात रविवारपासून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला असून इतर 8 जवान जखमी आहेत. जखमी जवानांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

करमजीत सिंह असं या शहीद जवानाचे नाव आहे. गोळीबारीत 24 वर्षाचा शिपाई करमजीत सिंह गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान करमजीत सिंह यांची प्राणज्योत मावळली. करमजीत सिंह पंजाब राज्यातील जनेर गावचे रहिवाशी होते. करमजीत यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1994 साली झाला होता.

पहाटे साडेपाच पासून साडे सातपर्यंत पाकिस्तानकडून गोळीबार सुरु होता. भारतीय लष्करानेही पाकिस्तानला जशास तसे प्रत्युत्तर दिले. या घटनेत भारतीय लष्कराचे नुकसान झालं आहे. याआधीही जम्मू काश्मीरच्या राजोरी जिल्ह्यामधील सुंदरबन सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला होता मात्र भारतीय जवानांना पाकिस्तानला चोख उत्तर दिले. पाकिस्तानने रविवारी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास गोळीबार सुरु केला. त्यात बलडो गावाचे रहिवाशी रमेश लाल यांची जनावरे जखमी झाली. रहिवाशी परिसरात पाकिस्तानकडून हा गोळीबार करण्यात आला. मात्र त्यात फारसे नुकसान झालं नाही. 

सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तान लष्कराकडून सीमाभागातील गावांना निशाणा बनवत गोळीबारी केली जातेय. त्याला प्रत्युत्तर भारतीय जवानांनीही दिले आहे. यामध्ये पाकिस्तान लष्कराची एक पोस्ट उद्धवस्त केल्याचंही समजतंय. 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले. पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला होता. या कारवाईने जैश-ए-मोहम्मदचं कंबरडं मोडलं. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 जवानांना वीरमरण आले होते.मात्र पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या तणावाचं वातावरण आहे.   

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाCeasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघन