शहरं
Join us  
Trending Stories
1
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
4
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
5
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
6
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
7
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
8
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
9
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
10
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
11
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
12
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
13
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
14
अदला बदली! माझं घर तुझं, तुझं घर माझं, होम-स्वॅपिंगचा नवा ट्रेंड; मोफत राहण्यासाठी भन्नाट 'जुगाड'
15
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
16
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
17
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
18
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
19
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
20
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, गोळीबारात 1 जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 19:15 IST

काश्मीर सीमेलगत पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. जम्मू काश्मीरच्या पुलवामामधील केरी, बटल यापरिसरात रविवारपासून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे

जम्मू - काश्मीर सीमेलगत पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. जम्मू काश्मीरच्या पुलवामामधील केरी, बटल यापरिसरात रविवारपासून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला असून इतर 8 जवान जखमी आहेत. जखमी जवानांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

करमजीत सिंह असं या शहीद जवानाचे नाव आहे. गोळीबारीत 24 वर्षाचा शिपाई करमजीत सिंह गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान करमजीत सिंह यांची प्राणज्योत मावळली. करमजीत सिंह पंजाब राज्यातील जनेर गावचे रहिवाशी होते. करमजीत यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1994 साली झाला होता.

पहाटे साडेपाच पासून साडे सातपर्यंत पाकिस्तानकडून गोळीबार सुरु होता. भारतीय लष्करानेही पाकिस्तानला जशास तसे प्रत्युत्तर दिले. या घटनेत भारतीय लष्कराचे नुकसान झालं आहे. याआधीही जम्मू काश्मीरच्या राजोरी जिल्ह्यामधील सुंदरबन सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला होता मात्र भारतीय जवानांना पाकिस्तानला चोख उत्तर दिले. पाकिस्तानने रविवारी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास गोळीबार सुरु केला. त्यात बलडो गावाचे रहिवाशी रमेश लाल यांची जनावरे जखमी झाली. रहिवाशी परिसरात पाकिस्तानकडून हा गोळीबार करण्यात आला. मात्र त्यात फारसे नुकसान झालं नाही. 

सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तान लष्कराकडून सीमाभागातील गावांना निशाणा बनवत गोळीबारी केली जातेय. त्याला प्रत्युत्तर भारतीय जवानांनीही दिले आहे. यामध्ये पाकिस्तान लष्कराची एक पोस्ट उद्धवस्त केल्याचंही समजतंय. 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले. पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला होता. या कारवाईने जैश-ए-मोहम्मदचं कंबरडं मोडलं. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 जवानांना वीरमरण आले होते.मात्र पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या तणावाचं वातावरण आहे.   

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाCeasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघन