शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 10:15 IST

पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात हा संरक्षण करार पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या रियाद दौऱ्यात झाला.

नवी दिल्ली - भारत सरकार पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यातील संरक्षण करारावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. या करारामुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रादेशिक स्थिरतेवर काय परिणाम होऊ शकतात याचा आढावा भारत घेत आहे. भारत आपल्या राष्ट्रीय हिताचं रक्षण करणे आणि सर्वच क्षेत्रात सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहे असं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे. पाकिस्तान आणि सौदी अरेबियात झालेल्या संरक्षण करारावर भारताने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

पाकिस्तान आणि सौदी अरेबियात झालेल्या करारानुसार, जर कुठल्याही एका देशावर हल्ला झाला तर तो दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाणार आहे. त्याबाबत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी अधिकृत निवेदन जारी केले. त्यात म्हटलंय की, सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यात दीर्घ काळापासून सुरू असलेल्या चर्चेला औपचारिक स्वरूप देणार असल्याची भारताला माहिती होती. सरकार या घटनाक्रमाकडे राष्ट्रीय सुरक्षा, प्रादेशिक आणि जागतिक स्थिरतेवर पडणारा प्रभाव यादृष्टीने आढावा घेत आहे. भारत स्वत:च्या हिताचे रक्षण आणि सर्व क्षेत्रात व्यापक राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहे असं त्यांनी सांगितले. 

एकावर हल्ला २ दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल

पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात हा संरक्षण करार पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या रियाद दौऱ्यात झाला. शहबाज शरीफ यांनी क्राऊन प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली. जियो न्यूजनुसार, या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये संरक्षण करार करण्यात आला. या करारानुसार, दोन्ही पैकी कुठल्याही एका देशावर हल्ला झाला तर तो दोन्ही देशांवरील हल्ला समजला जाणार आहे. करारानंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदनात जवळपास ८ दशकांची भागीदारी, बंधुता, इस्लामिक एकता याआधारावर एकमेकांच्या सहमतीने संरक्षण करारावर सही केल्याचं म्हटलं आहे.

भारताची चिंता वाढवणारा करार

दरम्यान, पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यातील हा संरक्षण करार अशावेळी झाला आहे जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावात आहे. त्यात या करारामुळे भारताची चिंता वाढू शकते. भारत सरकार या दोन्ही देशांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असून देशाच्या सुरक्षेसाठी योग्य ती पाऊले उचलत असल्याचं सांगितले जाते. भारतासाठी हा करार अनेक दृष्ट्‍या चिंतेचा विषय आहे. सर्वात आधी हा करार पाकिस्तानला आणखी मजबूत बनवणार आहे. त्याशिवाय पाकिस्तान भारतावर दबाव वाढवण्याचा यातून प्रयत्न करणार आहे. त्यातून प्रादेशिक अस्थिरता आणखी वाढू शकते.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानsaudi arabiaसौदी अरेबिया