शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
4
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
5
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
6
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
7
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
8
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
9
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
10
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
11
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
12
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
13
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
14
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
15
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
16
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
17
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
18
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
19
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
20
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी

पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 10:15 IST

पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात हा संरक्षण करार पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या रियाद दौऱ्यात झाला.

नवी दिल्ली - भारत सरकार पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यातील संरक्षण करारावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. या करारामुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रादेशिक स्थिरतेवर काय परिणाम होऊ शकतात याचा आढावा भारत घेत आहे. भारत आपल्या राष्ट्रीय हिताचं रक्षण करणे आणि सर्वच क्षेत्रात सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहे असं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे. पाकिस्तान आणि सौदी अरेबियात झालेल्या संरक्षण करारावर भारताने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

पाकिस्तान आणि सौदी अरेबियात झालेल्या करारानुसार, जर कुठल्याही एका देशावर हल्ला झाला तर तो दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाणार आहे. त्याबाबत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी अधिकृत निवेदन जारी केले. त्यात म्हटलंय की, सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यात दीर्घ काळापासून सुरू असलेल्या चर्चेला औपचारिक स्वरूप देणार असल्याची भारताला माहिती होती. सरकार या घटनाक्रमाकडे राष्ट्रीय सुरक्षा, प्रादेशिक आणि जागतिक स्थिरतेवर पडणारा प्रभाव यादृष्टीने आढावा घेत आहे. भारत स्वत:च्या हिताचे रक्षण आणि सर्व क्षेत्रात व्यापक राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहे असं त्यांनी सांगितले. 

एकावर हल्ला २ दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल

पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात हा संरक्षण करार पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या रियाद दौऱ्यात झाला. शहबाज शरीफ यांनी क्राऊन प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली. जियो न्यूजनुसार, या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये संरक्षण करार करण्यात आला. या करारानुसार, दोन्ही पैकी कुठल्याही एका देशावर हल्ला झाला तर तो दोन्ही देशांवरील हल्ला समजला जाणार आहे. करारानंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदनात जवळपास ८ दशकांची भागीदारी, बंधुता, इस्लामिक एकता याआधारावर एकमेकांच्या सहमतीने संरक्षण करारावर सही केल्याचं म्हटलं आहे.

भारताची चिंता वाढवणारा करार

दरम्यान, पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यातील हा संरक्षण करार अशावेळी झाला आहे जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावात आहे. त्यात या करारामुळे भारताची चिंता वाढू शकते. भारत सरकार या दोन्ही देशांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असून देशाच्या सुरक्षेसाठी योग्य ती पाऊले उचलत असल्याचं सांगितले जाते. भारतासाठी हा करार अनेक दृष्ट्‍या चिंतेचा विषय आहे. सर्वात आधी हा करार पाकिस्तानला आणखी मजबूत बनवणार आहे. त्याशिवाय पाकिस्तान भारतावर दबाव वाढवण्याचा यातून प्रयत्न करणार आहे. त्यातून प्रादेशिक अस्थिरता आणखी वाढू शकते.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानsaudi arabiaसौदी अरेबिया