शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पाकचा आडमुठेपणा! भारतीय जवानांकडून मिठाई घेण्यास पाकिस्तानी सैन्याचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 13:11 IST

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर भारत-पाक यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. 

नवी दिल्ली - बकरी ईदच्या निमित्ताने भारताकडूनपाकिस्तानला मिठाई देण्यात आली मात्र पाकने मिठाई घेण्यास नकार दिला आहे. हुसैनीवाला बॉर्डरवर बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या जवानांकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही पाकिस्तानच्या सैन्याला ईदच्या निमित्ताने मिठाई पाठवण्याचा प्रस्ताव दिला मात्र पाकिस्तानच्या सैन्याकडून त्यासाठी नकार आला आहे. कोणताही मोठा सण असतो तेव्हा दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांना मिठाई पाठवतात ही प्रथा आहे. मात्र जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर भारत-पाक यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. 

भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफ जवानांकडून पाकिस्तानी सैन्याला मिठाई देण्याचा कार्यक्रम केला गेला. मात्र सध्या दोन्ही देशांमधील तणाव इतका वाढला आहे की, पाकिस्तानी सैन्याकडून भारताच्या मिठाईला नकार देण्यात आला. 

बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानकडून बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अटारी-वाघा बॉर्डर आणि हुसैनीवाला बॉर्डरवर मिठाई देण्या-घेण्यासाठी कोणताही संदेश आला नाही. याआधी पाकिस्तानकडून संदेश प्राप्त झाल्यानंतर भारताकडून मिठाई दिली जात होती. मात्र यंदा असं झालं नाही. 

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम भारत सरकारने रद्द केल्यामुळे पाकिस्तानने लाहोर-दिल्ली बससेवा निलंबित करण्याची घोषणा केली. सोमवारपासून ही बससेवा स्थगित केली जाईल, असे पाकिस्तानने म्हटलं होतं.

फेब्रुवारी 1999 मध्ये ही बससेवा सुरू करण्यात आली होती. 2001 मध्ये भारतीय संसदेवर अतिरेकी हल्ला झाल्यानंतर ही बससेवा निलंबित करण्यात आली होती. 2003 मध्ये ती पुन्हा सुरू करण्यात आली होती. पाकिस्तानचे संपर्क व डाक सेवामंत्री मुराद सईद यांनी सांगितले की, ‘राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बुधवारच्या बैठकीतील निर्णयाला सुसंगत निर्णय घेऊन लाहोर-दिल्ली बससेवा निलंबित करण्यात येत आहे.’ पाकिस्तानच्या संपर्क मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात मात्र या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून होणार असल्याचे म्हटलं होतं. 

तसेच पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंध औपचारिकरीत्या संपुष्टात आणले आहेत. पाकिस्तानी राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत संसदेच्या संयुक्त अधिवेशनात यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत भारतासोबतचे व्यापारी संबंध संपविण्यावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले, असे पाकिस्तानातील आघाडीचे दैनिक ‘डॉन’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानBSFसीमा सुरक्षा दल