संयुक्त राष्ट्रांच्या महासभेदरम्यान, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दहशतवादावर दिलेल्या निवेदनात पाकिस्तानचे नाव न घेता जोरदार टीका केली. त्यांच्या विधानात दहशतवाद आणि त्याला आश्रय देणाऱ्या देशांचा उल्लेख केला होता, परंतु कोणत्याही देशाचे नाव घेतले नव्हते. यावर पाकिस्तानने प्रतिक्रिया दिली. यामुळे आता पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसल्याचे दिसत आहे. त्यांनी स्वत:च दहशतवादाचे अड्डे असल्याचे मान्य केले.
एस जयशंकर यांनी पाकिस्तानचा पर्दाफाश केल्यानंतर, पाकिस्तानी प्रतिनिधीने उत्तर देण्याचा अधिकार वापरला आणि म्हटले की, भारत दहशतवादाबद्दलच्या दुर्भावनापूर्ण आरोपांद्वारे पाकिस्तानला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. जयशंकर यांच्या विधानात दहशतवादाचा उल्लेख होता पण पाकिस्तानचे नाव घेतले नव्हते.
पाकिस्तानने दहशतवादाची कबुली दिली
भारताने पाकिस्तानच्या प्रतिसादाचे वर्णन सीमापार दहशतवादाच्या त्यांच्या दीर्घ इतिहासाची कबुली म्हणून केले आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पाकिस्तानचे नाव घेतले नसले तरी, दहशतवादावर प्रतिक्रिया दिली.
एस जयशंकर यांनी UNGA मध्ये काय म्हटले?
"मोठे आंतरराष्ट्रीय दहशतवादी हल्ले त्याच एका देशाशी जोडलेले आहेत. स्वातंत्र्यापासून भारत दहशतवादाच्या आव्हानाचा सामना करत आहे, असंही एस जयशंकर म्हणाले.
पाकिस्तानच्या उत्तराला उत्तर देताना भारताने म्हटले की, यावरून असे दिसून येते की, ज्या शेजारी देशाचे नाव घेतले गेले नाही, त्याने अजूनही सीमापार दहशतवादाला प्रतिसाद देणे आणि त्याची दीर्घकालीन दहशतवादाची कबुली देणे पसंत केले आहे.
भारताच्या उत्तराच्या अधिकाराचा वापर करत श्रीनिवास म्हणाले, "कोणताही युक्तिवाद किंवा खोटे बोलणे कधीही दहशतवाद्यांच्या गुन्ह्यांना झाकू शकत नाही!" पाकिस्तानी प्रतिनिधीने उत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा सभागृह सोडले, परंतु पाकिस्तानी प्रतिनिधी बोलत असताना श्रीनिवास सभागृहातून निघून गेले.
Web Summary : Jaishankar's UNGA terror remarks, without naming Pakistan, drew a reaction. Pakistan's response, claiming innocence, was viewed as an admission of supporting terrorism, confirming India's long-held accusations. India criticized Pakistan's history of cross-border terrorism.
Web Summary : जयशंकर के संयुक्त राष्ट्र महासभा में आतंकवाद पर भाषण के बाद पाकिस्तान ने प्रतिक्रिया दी। भारत ने इसे सीमा पार आतंकवाद की स्वीकृति माना। पाकिस्तान के जवाब को भारत ने आतंकवाद का समर्थन करने की स्वीकृति के रूप में देखा।