शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

हाय अलर्ट ! प्रजासत्ताक दिनापूर्वी सीमारेषेवर मोठा हल्ला घडवण्याचा पाकिस्तानचा कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 17:02 IST

Jammu kashmir : काश्मीर खोऱ्यामध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र स्वरुपात राबवण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जवानांच्या कारवाईमुळे बिथरलेल्या पाकिस्ताननं सीमारेषेवर स्नायपर्स आणि बॉर्डर अ‍ॅक्शन टीम तैनात केल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देभारतीय लष्कराच्या प्रमुख चौक्यावर पाकिस्‍तानचा निशाणानियंत्रण रेषेवर पाकिस्‍तानकडून स्‍नायपर्स तैनात26 जानेवारीपूर्वी सीमारेषेवर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा कट

श्रीनगर - काश्मीर खोऱ्यामध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र स्वरुपात राबवण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जवानांच्या कारवाईमुळे बिथरलेल्या पाकिस्ताननं सीमारेषेवर स्नायपर्स आणि बॉर्डर अ‍ॅक्शन टीम तैनात केल्याची माहिती समोर आली आहे. सीमारेषेवर दहशतवाद्यांनी अनेक तळ उभारल्याची माहिती सॅटलाइटद्वारे मिळालेल्या चित्रांद्वारे स्पष्ट झाली आहे. 26 जानेवारीपूर्वी पाकिस्तानी स्नायपर्स आणि बॉर्ड अ‍ॅक्शन टीम भारतीय जवानांवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती समोर आली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून भारतीय लष्करानं कठोर मोहीम राबवत दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यामुळे पाकिस्तान सैरभैर झाला आहे. भारतीय जवानांवर भ्याड हल्ला करण्याचा कट पाकिस्तानात रचला जात आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, मोहम्मद अशरफच्या मदतीनं पाकिस्तान भारतीय जवानांवर हल्ला करण्याचा कटकारस्थान रचत आहे. मोहम्मद सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये वास्तव्यास आहे. त्याच्या मदतीनं पाकिस्तानला तंगधार परिसरात मोठा हल्ला घडवायचा आहे. भारतीय जवानांच्या प्रमुख चौक्यांवर पाकिस्तानचे लक्ष्य आहे. सुरक्षा यंत्रणांमधील सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर भारतीय जवान सतर्क झाले आहेत. 

दरम्यान, सीमारेषेपलिकडून वारंवार भ्याड हल्ला करणाऱ्यांचं कंबरडं मोडण्यासाठी भारतीय लष्करानं मोहीम हाती घेतली आहे. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेली मोहीम लष्कराने अधिकच तीव्र केल्याचं दिसत आहे. भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई राबवत कधी काळी हिज्बुलचा गड मानल्या जाणाऱ्या काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्याला दहशवादमुक्त केले आहे. दहशतवादाविरोधातील भारतीय लष्कराच्या मोहीमेला मिळालेले हे मोठे यश आहे. 

जवानांच्या यशस्वी कारवाईनंतर बारामुल्ला जिल्हा दहशवादमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. दहशतवादमुक्त म्हणून घोषित करण्यात आलेल्या उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला हा पहिलाच जिल्हा असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी (23 जानेवारी) बारामुल्लामध्ये तीन दहशवाद्यांना यमसदनी धाडल्यानंतर भारतीय लष्कराकडून या जिल्ह्याला दहशतवादमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले. 

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तान