शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

चीन-पाकिस्तानची हातमिळवणी धोकादायक; आव्हानांना तोंड देण्यास भारत सज्ज- लष्करप्रमुख

By कुणाल गवाणकर | Published: January 12, 2021 1:00 PM

सीमेपलीकडून होणाऱ्या कुरघोड्यांना प्रत्युत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम; लष्करप्रमुखांचा इशारा

नवी दिल्ली: पाकिस्तान आणि चीन यांचं एकत्र येणं भारतासाठी धोकादायक आहे. पाकिस्तानकडून सातत्यानं दहशतवादाला खतपाणी घालण्याचं काम सुरू आहे. त्यांना योग्य वेळी योग्य ठिकाणी उत्तर दिलं जाईल. त्यासाठीची वेळ आणि ठिकाण आम्ही निश्चित करू, असा स्पष्ट इशारा लष्करप्रमुख मनोज नरवणेंनी दिला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी देशापुढील धोक्यांची माहिती दिली.पाकिस्तानकडून दहशतवादाला प्रोत्साहन दिलं जातं. मात्र आम्ही दहशतवाद कदापि सहन करणार नाही. ही आमची भूमिका आहे. दहशतवादी कारवायांना प्रत्युत्तर देण्यात येईल. त्यासाठीची वेळ आणि ठिकाण आम्ही निश्चित करतो, हा संदेश आपल्याकडून सीमेपलीकडील देशाला देण्यात आलेला आहे, असं नरवणे म्हणाले. यावेळी त्यांनी चीन आणि पाकिस्तानच्या जवळिकीवरही भाष्य केलं. 'लष्करी आणि बिगरलष्करी क्षेत्रांमध्ये चीन आणि पाकिस्तानचं सहकार्य वाढत आहे. त्यामुळे दोन आघाड्यांवर आव्हांनाचा सामना करण्याची तयारी आपल्याला ठेवायला हवी,' असं नरवणे म्हणाले.चिनी सैन्यासोबत लडाखमध्ये निर्माण झालेला तणाव अद्याप संपलेला नसल्याची माहिती त्यांनी दिली. 'आम्ही याआधीही आव्हानांचा सामना करून मार्गक्रमण केलं आहे. भारतीय लष्करानं लडाखमध्येच नव्हे, तर संपूर्ण प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील गस्ती वाढवल्या आहेत. भारत आणि चीनमध्ये कमांडर स्तरावरील आठ बैठका झाल्या आहेत. आता लवकरच नववी बैठक होईल,' असं नवरणेंनी सांगितलं.कोरोना महामारी आणि उत्तर सीमांवरील परिस्थिती आमच्यापुढील दोन प्रमुख मोठी आव्हानं होती. सीमेवरील परिस्थिती पाहता आम्ही सीमेवरील सतर्कता वाढवली आहे. सीमेवर शांतता नांदावी, अशीच आमची अपेक्षा आहे. पण सीमेवर कोणताही अनुचित प्रकार घडल्यास आम्ही दोन हात करण्यास पूर्णपणे तयार आहोत, अशा शब्दांत नरवणेंनी चीनला इशारा दिला. भविष्यातील आव्हानांचा विचार लष्कराला अधिकाधिक सुसज्ज करण्यात येईल. यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येईल, असं नरवणे म्हणाले.

टॅग्स :manoj naravaneमनोज नरवणेIndian Armyभारतीय जवानchinaचीनPakistanपाकिस्तान