शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

दिल्लीतल्या प्रदूषणाला चीन, पाकिस्तान जबाबदार; भाजपा नेत्याचा 'हवाई'शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 09:51 IST

शेजारच्या देशानं विषारी वायू सोडल्यानं दिल्लीत प्रदूषण; भाजपा नेत्याचं अजब तर्कट

नवी दिल्ली: दिवाळीनंतर दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषणाची तीव्रता सतत वाढत आहे. दृश्यमानता कमी झाल्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. याशिवाय दिल्लीकरांचा श्वासदेखील कोंडला जात आहे. पंजाब, हरयाणातले शेतकरी तण जाळत असल्यानं दिल्लीतली हवा प्रदूषित होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं या दोन्ही राज्यांमधील सरकारची चांगलीच कानउघाडणी केली. मात्र भाजपा नेत्यानं हवेच्या प्रदूषणासाठी पाकिस्तान आणि चीनला जबाबदार धरलं आहे. आपल्या देशाला घाबरणाऱ्या शेजारी देशानं विषारी वायू सोडला असावा. त्यामुळे हवा प्रदूषित झाली असावी. पाकिस्तान आणि चीन आपल्याला घाबरले आहेत. त्यामुळेच त्यांनी विषारी वायू सोडला असावा, असं भाजपा नेते विनीत अग्रवाल यांनी म्हटलं. भाजपाच्या व्यापार विभागाचे संयोजक असलेल्या अग्रवाल यांनी आधीही अनेकदा अशी विधानं केली आहेत. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेला पाकिस्तानच दिल्लीतल्या प्रदूषणासाठी जबाबदार असल्याचं अग्रवाल म्हणाले.  पाकिस्तानचा शेवट जवळ आला आहे. तो देश भीक मागण्यासाठी कटोरा घेऊन जगभर फिरतोय. भारताचं नुकसान व्हावं यासाठी पाकिस्तानचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकरी आधीदेखील तण जाळायचे. उद्योगधंदे आधीपासूनच सुरू आहेत. मात्र तेव्हा कधीही अशी धुरक्याची चादर पाहायला मिळाली नव्हती. त्यामुळे प्रदूषणासाठी शेतकरी आणि उद्योगधंदे चालवणाऱ्यांना जबाबदार धरणं चुकीचं आहे. देशाच्या विकासात शेतकरी आणि उद्योगपतींचं मोठं योगदान आगे. हे दोन्ही घटक अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, असं अग्रवाल यांनी म्हटलं.

टॅग्स :delhi pollutionदिल्ली प्रदूषणBJPभाजपाPakistanपाकिस्तानchinaचीन