शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

दिल्लीतल्या प्रदूषणाला चीन, पाकिस्तान जबाबदार; भाजपा नेत्याचा 'हवाई'शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 09:51 IST

शेजारच्या देशानं विषारी वायू सोडल्यानं दिल्लीत प्रदूषण; भाजपा नेत्याचं अजब तर्कट

नवी दिल्ली: दिवाळीनंतर दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषणाची तीव्रता सतत वाढत आहे. दृश्यमानता कमी झाल्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. याशिवाय दिल्लीकरांचा श्वासदेखील कोंडला जात आहे. पंजाब, हरयाणातले शेतकरी तण जाळत असल्यानं दिल्लीतली हवा प्रदूषित होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं या दोन्ही राज्यांमधील सरकारची चांगलीच कानउघाडणी केली. मात्र भाजपा नेत्यानं हवेच्या प्रदूषणासाठी पाकिस्तान आणि चीनला जबाबदार धरलं आहे. आपल्या देशाला घाबरणाऱ्या शेजारी देशानं विषारी वायू सोडला असावा. त्यामुळे हवा प्रदूषित झाली असावी. पाकिस्तान आणि चीन आपल्याला घाबरले आहेत. त्यामुळेच त्यांनी विषारी वायू सोडला असावा, असं भाजपा नेते विनीत अग्रवाल यांनी म्हटलं. भाजपाच्या व्यापार विभागाचे संयोजक असलेल्या अग्रवाल यांनी आधीही अनेकदा अशी विधानं केली आहेत. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेला पाकिस्तानच दिल्लीतल्या प्रदूषणासाठी जबाबदार असल्याचं अग्रवाल म्हणाले.  पाकिस्तानचा शेवट जवळ आला आहे. तो देश भीक मागण्यासाठी कटोरा घेऊन जगभर फिरतोय. भारताचं नुकसान व्हावं यासाठी पाकिस्तानचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकरी आधीदेखील तण जाळायचे. उद्योगधंदे आधीपासूनच सुरू आहेत. मात्र तेव्हा कधीही अशी धुरक्याची चादर पाहायला मिळाली नव्हती. त्यामुळे प्रदूषणासाठी शेतकरी आणि उद्योगधंदे चालवणाऱ्यांना जबाबदार धरणं चुकीचं आहे. देशाच्या विकासात शेतकरी आणि उद्योगपतींचं मोठं योगदान आगे. हे दोन्ही घटक अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, असं अग्रवाल यांनी म्हटलं.

टॅग्स :delhi pollutionदिल्ली प्रदूषणBJPभाजपाPakistanपाकिस्तानchinaचीन