शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भारताच्या ४० चौक्यांवर पाकने केला गोळीबार, एक जवान शहीद; २ स्थानिकांचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 03:37 IST

जम्मूतील तीन जिल्ह्यांतील आंतरराष्ट्रीय सीमांवरील पाच सेक्टरवर पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून शुक्रवारी केलेल्या

नवी दिल्ली : जम्मूतील तीन जिल्ह्यांतील आंतरराष्ट्रीय सीमांवरील पाच सेक्टरवर पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून शुक्रवारी केलेल्या उखळी तोफगोळ््यांच्या मा-यात बीएसएफचा एक जवान शहीद झाला तर दोन स्थानिक मरण पावले. पाकच्या या आगळीकीला भारतीय सैन्याकडूनही चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. पाकिस्तानच्या सैनिकांनी भारताच्या ४0 चौक्यांवर गोळीबार केला. त्यामुळे तेथील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या असून, लोकांना घराबाहेर न पडण्याचे तसेच शक्यतो तेथून स्थलांतर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.जम्मू, सांबा, कठुआ या तीन जिल्ह्यांच्या सीमाभागात पाकने आगळीक केली आहे. राजौरी जिल्ह्यातही सकाळपासून पाकिस्तानी सैनिकांनी उखळी तोफांचा मारा सुरू केला. बीएसएफच्या तीन चौक्यांना पाकिस्तानी सैनिकांनी लक्ष्य केले आहे. त्यात बीएसएफचे हेडकॉन्स्टेबल जगपाल सिंग हे शहीद झाले, तर दोन जवानही जखमी झाले.अन्य दोन स्थानिकही मरण पावले. पाकच्या हल्ल्यांत कठुआ जिल्ह्यात नऊ, जम्मू जिल्ह्यातील आठ व सांबा जिल्ह्यातील चार असे २३ जण जखमी झाले असून त्यातील १३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्वत: शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाºया पाकिस्तानने प्रत्यक्षात भारताकडून आमच्यावर गोळीबार सुरू आहे, असा कांगावा सुरू केला आहे. भारताच्या माºयात पाकिस्तानी नागरिक ठार झाले आहेत, असा कांगावा करून भारताचे पाकिस्तानातील उपउच्चायुक्त जे. पी. सिंग यांना बोलावून घेण्यात आले. गेल्या दोन दिवसांत जे.पी. सिंग यांना दोनदा बोलावण्यात आले आहे.चोख प्रत्युत्तर देऊ - सुभाष भामरेपाकिस्तानला कशा प्रकारे चोख प्रत्युत्तर द्यायचे, हे भारतीय लष्कराला व्यवस्थित ठाऊक आहे व त्यासाठी लष्कर संपूर्ण सज्ज आहे, असेकेंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाषभामरे यांनी म्हटले आहे. सीमेपलीकडून घुसखोरीचे प्रकारही घडत असून ते रोखण्यात येतील असेही ते पुढे म्हणाले.