शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

पाकने छुपे युद्ध सुरूच ठेवलेय! त्यांनी इतिहासातून कोणताही धडा घेतला नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 05:42 IST

कारगिल युद्धातील विजयाच्या राैप्य महोत्सवी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीरांना आदरांजली वाहिली. यावेळी ते बोलत होते.

द्रास (कारगिल) : पाकिस्तानने इतिहासातून कोणताही धडा घेतला नाही आणि विषय धगधगता राहावा यासाठी दहशतवादाच्या नावाखाली छुपे युद्ध सुरूच ठेवले आहे. मात्र, दहशतवाद्यांचे हे नापाक इरादे कधीही पूर्ण होणार नाहीत, आमचे शूर जवान त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. कारगिल युद्धातील विजयाच्या राैप्य महोत्सवी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीरांना आदरांजली वाहिली. यावेळी ते बोलत होते.

अग्निपथ योजना म्हणजे लष्कराने हाती घेतलेल्या आवश्यक सुधारणांपैकी एक आहे. परंतु विरोधकांनी त्यातही राजकारण केल्याची टीका मोदी यांनी केली.

३० वर्षांनंतरच्या पेन्शनसाठी आज शिव्याशाप खाईन का?‘सरकारने पेन्शनचे पैसे वाचवण्यासाठी अग्निपथ योजना आणली, असा गैरसमज काही लोक पसरवत आहेत. अशा लोकांच्या विचाराची लाज वाटते; पण त्यांना विचारले पाहिजे. मोदींच्या राजवटीत आज ज्यांची भरती होईल त्यांना पेन्शन आताच द्यावी लागेल का? त्याला पेन्शन देण्याची वेळ ३० वर्षांनी येईल. मोदी तेव्हा १०५ वर्षांचे असतील आणि तेव्हा मोदींचे सरकार असेल का? ३० वर्षांनंतर द्याव्या लागणाऱ्या पेन्शनसाठी आज शिव्याशाप खाईल, असे राजकारणी मोदी आहेत का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.

यांनीच सैन्यात हजारो कोटींचे घोटाळे केले‘हे तेच लोक आहेत, ज्यांनी सैन्यात हजारो कोटींचे घोटाळे करून आमचे सैन्य कमकुवत केले. त्यांचीच हवाई दलाला कधीही आधुनिक लढाऊ विमाने मिळू नयेत, अशी इच्छा होती. यांनीच तेजस लढाऊ विमान थंडबस्त्यात टाकण्याची तयारी केली होती’, असा आरोपही मोदींनी विरोधकांवर केला. 

तरुणांत अग्निवीरबद्दल प्रचंड संताप : खरगेमोदी सरकारने लष्कराच्या सांगण्यावरून अग्निपथ योजना लागू केली, हे उघड खोटे आहे आणि बलाढ्य लष्कराचा अक्षम्य अपमान आहे. माजी लष्करप्रमुख (निवृत्त) जनरल एमएम नरवणे यांनी सांगितले आहे की ‘अग्निपथ योजनें’तर्गत ७५% लोकांना कायम ठेवायचे होते आणि २५% लोकांना ४ वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त करायचे होते; पण मोदी सरकारने याच्या उलट केले आणि तिन्ही लष्करी दलांमध्ये ही योजना जबरदस्तीने लागू केली.  देशातील तरुणांमध्ये अग्निवीरबद्दल प्रचंड संताप आणि तीव्र विरोध आहे. अग्निपथ योजना बंद करावी, ही काँग्रेसची मागणी कायम आहे.-मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस

१.२५  लाख कोटी रुपयांहून अधिक निधी माजी सैनिकांना मोदी सरकारने दिला ५०० कोटींचा निधी देत काँग्रेस ‘वन रँक, वन पेन्शन’वर खोटे बोलली, असे मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तान