शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

पाकच्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर, सीमाचौक्या केल्या नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 01:34 IST

गेले काही दिवस शस्त्रसंधीचे उल्लंघन करून जम्मूच्या सीमेवर पाकिस्तानकडून होत असलेल्या तोफांच्या मा-यास भारताने चौख प्रत्युत्तर दिले असून, सीमेच्या पलीकडील पाकिस्तानच्या काही चौक्या, तसेच दारूगोळा व इंधन साठविलेली काही कोठारे उद्ध्वस्त केली आहेत.

नवी दिल्ली : गेले काही दिवस शस्त्रसंधीचे उल्लंघन करून जम्मूच्या सीमेवर पाकिस्तानकडून होत असलेल्या तोफांच्या मा-यास भारताने चौख प्रत्युत्तर दिले असून, सीमेच्या पलीकडील पाकिस्तानच्या काही चौक्या, तसेच दारूगोळा व इंधन साठविलेली काही कोठारे उद्ध्वस्त केली आहेत.पाकिस्तानच्या लष्करावर भारतीय सैन्याने गेल्या चार दिवसांत ९ हजार उखळी तोफगोळ््यांचा मारा केला आहे. पाकिस्तानी सैनिक ज्या चौक्यांच्या आडोशाने मारा करीत होते, त्यातील काही चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत.बीएसएफ व केंद्रीय गृहखात्याच्या सूत्रांनी सांगितले की, जम्मू विभागातील १९० किमी लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानने गेल्या गुरुवारपासून सुरू केलेल्या मा-यात ५ भारतीय जवान शहीद झाले, तर ७ नागरिक मरण पावले. याखेरीज ६० भारतीय नागरिक जखमी झाले होते.पाकिस्तानने चालविलेल्या माºयाला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. कितीही विपरित परिस्थिती आली, तरी भारताचे शिर खाली झुकू दिले जाणार नाही, असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी व्यक्त केला होता. भारत हा आता दुर्बळ देश राहिलेला नाही. जगाची भारताबद्दलची धारणा बदलली आहे, असेही ते म्हणाले होते.सीमा सुरक्षा दलाच्या एका अधिका-याने सांगितले की, जम्मूच्या कांचन भागात आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात एका नागरिकाचा मृत्यू झाला. दोनजण जखमी झाले. जम्मूमध्ये नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सिमेनजीकच्या शाळा सातत्याने बंद आहेत.या अधिकाºयाने सांगितले की, परगवाल, मठ, आरएसपुरा, अरनिया आणि रामगढ सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर रात्रभर गोळीबार होत होता. पाकिस्तानी जवानांनी काल रात्री जम्मूच्या कांचक सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर पुन्हा गोळीबार केला.

टॅग्स :Indian Armyभारतीय लष्करPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर