शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
3
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
4
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
5
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
6
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
7
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
8
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
9
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
10
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
11
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
12
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
13
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
14
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
15
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
16
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
17
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
18
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
19
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
20
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप

पाकच्या ‘हवाई बंदी’चा भारतीय कंपन्यांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 04:06 IST

पाकिस्तानला टाळण्यासाठी ओमानला न्यावी लागत आहेत विमाने

नवी दिल्ली : पाकिस्तानने आपल्या हवाई क्षेत्राच्या वापरास बंदी घातल्यामुळे आंतरराष्ट्रीय मार्गांवर विमान वाहतूक करणाऱ्या भारतीय कंपन्यांना लांबचा पल्ला घेऊन विमाने उडवावी लागत आहेत. त्यातच तेल कंपन्यांनी हवाई इंधनाचे भाव वाढविल्याने कंपन्यांना दुहेरी फटका सहन करावा लागत आहे.

बालाकोट एअरस्ट्राईकनंतर पाकिस्ताननेभारतीय विमान वाहतूक कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. आणखी किमान १५ मेपर्यंत पाकिस्तानची ही बंदी कायम राहील, असे सूत्रांनी सांगितले. तेल कंपन्यांनी हवाई इंधनात २.५ टक्के वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी मे महिन्यातील इंधनाचा दर ७०० डॉलर प्रतिकिलो झाला आहे. गेल्या महिन्यात तो ६६८ डॉलर प्रतिकिलो होता.

पाकिस्तानी हवाई बंदीमुळे दररोज ४०० विमानांना फटका बसत आहे. पाकिस्तानला टाळण्यासाठी भारतीय विमानांना ओमान हवाई क्षेत्रापर्यंत खाली जावे लागत आहे. इराणचे हवाई क्षेत्र जवळ असले तरी तेथे आधीच वाहतूक जास्त असल्यामुळे तेथे जास्तीची १०० उड्डाणेच सामावून घेता आली आहेत. पाकचे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे विमान कंपन्यांचा सर्वच खर्च वाढला आहे. विमानांना जास्त अंतर कापावे लागत आहे. त्यासाठी जास्त इंधन, वेळ व मनुष्यबळ लागत आहे. एअर इंडियाने आपल्या पायलटांना ओव्हरटाईम करायला सांगितला आहे. एअर इंडियाच्या दिल्ली ते अमेरिका थेट विमानास इंधन भरण्यासाठी एक थांबा घ्यावा लागत आहे.

अरबी समुद्रावरून मस्कतचा फेराएअर इंडियची विमाने आता दिल्लीहून मुंबई आणि अहमदाबादमार्गे जातात. अरबी समुद्रावरून उड्डाण करून ते आधी मस्कतला पोहोचतात आणि तेथून आपल्या नियोजित स्थानी जातात.आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनाही भारतात येण्यासाठी पाकचे हवाई क्षेत्र टाळून यावे लागत आहे. सिंगापूर एअर लाइन्स, फिन्नएअर, ब्रिटिश एअरवेज, एअरोफ्लॉट, थाई एअरवेज यांचा त्यात समावेश आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतairplaneविमान