शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
2
Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
3
दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
4
नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
5
शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
6
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
7
Mumbai: मुंबईत कांदा स्वस्त होणार की महागणार? पावसामुळे मोठे नुकसान; उत्पादनाचा अंदाज येईना
8
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
9
Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
10
Stock Market: उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरला; Nifty २६०००० च्या खाली, 'या' स्टॉक्सवर नजर
11
Mumbai: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू; आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप
12
सुनेसोबत अनैतिक संबंध, मुलाला मार्गातून हटवण्यासाठी बाप झाला हैवान, मग रचलं असं नाटक
13
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
14
दिल्लीतील स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला डॉ. उमरचा व्हिडिओ आला समोर; 'सुसाइड बॉम्बर'चा उल्लेख
15
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
16
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
17
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
18
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
19
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
20
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरीत मजुरांच्या वेदना असहाय्य, राजघाटावर एकाच कार्यकर्त्यांच आमरण उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 21:27 IST

मुंबई, पुणे, दिल्ली येथून मोठ्या संख्येने मजूर उत्तर प्रदेश आणि बिहार येथे जात आहेत. लॉकडाऊनमुळे ट्रान्सपोर्ट सेवा बंद असल्याने हे मजूर गावी जाण्यासाठी पायपीठ करत आहेत

नवी दिल्ली - लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे विविध राज्यातील आणि जिल्ह्यातील मजूर, कामगार, विद्यार्थी आणि पर्यटक अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने शिथिलता दिल्यानंतर या सर्वच नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात येत आहे. त्यासाठी, रेल्वे, बस आणि खासगी वाहनांने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. परराज्यातील मजूरांना स्पेशल श्रमिक ट्रेनच्या सहाय्याने राज्य सरकारने त्यांच्या राज्यात पाठविण्यात सुरुवात केली आहे. मात्र, अद्यापही हजारो मजूर पायीच आपल्या गावाकडं जाताना दिसत आहेत. या मजूरांच्या वेदना दूर व्हाव्यात म्हणून एक तरुण कार्यकर्ता थेट राजघाटावर आंदोलन करत बसला होता. 

मुंबई, पुणे, दिल्ली येथून मोठ्या संख्येने मजूर उत्तर प्रदेश आणि बिहार येथे जात आहेत. लॉकडाऊनमुळे ट्रान्सपोर्ट सेवा बंद असल्याने हे मजूर गावी जाण्यासाठी पायपीठ करत आहेत. यातून अपघाताच्या घटना घडताना दिसत आहेत. औरंगाबाद येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेत १५ मजूरांचा मृत्यू झाला. या घटनेनं देशातील मजूरांच्या स्थलांतराचे भीषण वास्तव जगासमोर आले आहे.  त्यानंतर, सर्वच राज्यातील नेत्यांकडून मजूरांना चालत न जाण्याची विनंती करण्यात येत आहे. मजुरांनी दिल्ली सोडून जाऊ नये, अशी मी त्यांना विनंती करतो. जर तुम्ही अडकले आहात आणि तुमची घरी जाण्याची इच्छा आहे, तर आम्ही ट्रेनची व्यवस्था करीत आहोत. बिहार, मध्य प्रदेशला रेल्वेगाड्या गेल्या आहेत. अजून थोडावेळ वाट पाहा, पण पायी चालत जाऊ नका.", असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले. मात्र, मजूरांची पायपीट काही केल्या बंद होताना दिसत नाही.

या मजूरांच्या अडचणींवर सरकारने उपाय करावा म्हणून, सामाजिक कार्यकर्ता प्रवीण काशी यांनी दिल्लीतील राजघाट येथे महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषण सुरु केलं आहे. आपल्या उपोषणात या कार्यकर्त्याने तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. स्थलांतरीत मजूर आणि नागरिकांना मास्क, सॅनिटायझर्स आणि कोरोनाविरुद्ध लढण्यासाठीच्या महत्वाच्या वस्तू देण्यात याव्यात. तसेच, स्वस्त धान्य दुकानातून धान्य आणि जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करावा. त्यासोबतच, तिसरी मागणी म्हणजे, देशातील प्रत्येक बेरोजगारास प्रतिदिन २५० रुपये एवढा भत्ता देण्यात यावा, अशी मागणी या सामाजिक कार्यकर्त्याने केली आहे. 

दिल्लीतील यमुना ब्रीजजवळ शेकडो मजूर आणि स्थलांतरीत अडकून पडले आहेत. या सर्वांना आपल्या घरी जायचं आहे, मी या मजूरांना भेटलो असून त्यांच पीडा असहनीय असल्याचे काशी यांनी म्हटलं आहे. या मजूरांचे भविष्य अंधकारमय बनल आहे, त्याची सर्वांनाची भीती वाटत असल्याचं त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. या कामगारांना पोटाला अन्न मिळत नसल्याने आणि हाती काम नसल्याने पैसा नाही, म्हणूनच हे आपल्या मूळगावी जात असल्याचं काशी यांनी सांगितलं. देशात लाखो मजूर, कामगार स्थलांतर करताना दिसत आहेत. आपल्या लहान मुलांसह भुकेल्या पोटाने हे मजूर मैल न मैल चालत आहेत. सरकारपर्यंत या कामगारांचा आवाज का पोहोचत नाही? असा सवालही काशी यांनी विचारला आहे. 

काशी यांच्या आंदोलनाची माहिती मिळताच, दर्यागंज पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी राजघाटवर जाऊन काशीला ताब्यात घेतलं आहे. तसेच, तुम्हाला उपोषण करता येणार नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र, तरीही मी मजूरांच्या प्रश्नासाठी संघर्ष करतच राहणार, असे काशीने म्हटले आहे.  

टॅग्स :delhiदिल्लीcorona virusकोरोना वायरस बातम्याMigrationस्थलांतरणLabourकामगारGovernmentसरकारArvind Kejriwalअरविंद केजरीवाल