शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 16:42 IST

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांकडून विविध विधाने येत आहेत.

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशातून पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जाहीर केले आहे की, या हल्ल्यातील दहशतवाद्यांना कल्पनेपलीकडे शिक्षा भोगावी लागेल. पण, दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी पहलगाम हल्ल्यावर वादग्रस्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता या या सर्व प्रतिक्रियांवर राहुल गांधी नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.

राहुल गांधी नाराजपहलगाम दहशतवादी हल्ल्यावरील सर्वपक्षीय बैठकीनंतर मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी सरकारसोबत असल्याचे म्हटले आहे. पण, काही काँग्रेस नेते या घटनेबाबत वादग्रस्त विधाने देत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल गांधी काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रियांवर नाराज आहेत. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही आक्षेप व्यक्त केला आहे. तसेच, आता पक्षाच्या नेत्यांना काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर झालेल्या ठरावापेक्षा वेगळी विधाने जारी न करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. 

युद्धाची गरज नाही - सिद्धरामय्याकर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले होते की, पाकिस्तानशी युद्धाची गरज नाही. आम्ही युद्धाच्या बाजूने नाही. या विधानावरून भाजपने सिद्धरामय्या तसेच काँग्रेसवरही निशाणा साधला. भाजपने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध अनेक ठिकाणी निदर्शनेही केली. मुख्यमंत्र्यांशिवाय, कर्नाटक सरकारमधील एका मंत्र्यांनीही वादग्रस्त वक्तव्य केले. दहशतवाद्यांनी धर्म विचारुन हल्ला केलाय नाही, असे ते म्हणाले. यावरुनही मोठा वाद झाला आहे.

राहुल गांधींनी घेतली जखमींची भेटकाँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी (25 एप्रिल) पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील जखमी आणि पीडितांची भेट घेतली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत ते म्हणाले की, जे काही घडले आहे, ते समाजात फूट पाडण्याच्या उद्देशाने घडले आहे. ही घटना म्हणजे, भावाला भावाविरुद्ध उभे करण्याचे षड्यंत्र आहे. अशा परिस्थितीत, प्रत्येक भारतीयाने एकत्र येऊन दहशतवाद्यांचे नापाक प्रयत्न हाणून पाडणे गरजेचे आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाRahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसBJPभाजपा