शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
2
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
3
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
7
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
8
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
9
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
10
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
11
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
12
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
13
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
14
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
15
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
16
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
17
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 12:11 IST

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, कर्नाटकातील मंत्र्यांनी थेट पाकिस्तानाशी दोन हात करायची तयारी असल्याचे म्हटले आहे.

Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानच असून, तेथे आश्रयास असलेली दहशतवादी संघटना लष्कर-ए -तोयबा, आयएसआय आणि पाकिस्तानी आर्मी यांचा या हल्ल्यात थेट सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या हल्ल्याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सादर केलेल्या प्राथमिक अहवालात ही माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. यातच कर्नाटकच्या एका मंत्र्याने युद्धासाठी पाकिस्तानात जायची तयारी दर्शवली आहे. 

लष्कर-ए-तोयबा, आयएसआय आणि आर्मीच्या मदतीने हल्ल्याचे नियोजन केले होते. हाशमी मुसा उर्फ सुलेमान आणि अली भाई उर्फ तल्हा भाई हे या हल्ल्याचे मुख्य हँडलर होते. ते दोघेही पाकिस्तानी नागरिक आहेत. हे दोघे सीमेपलीकडून नियंत्रकांशी संपर्कात होते आणि हल्ल्याची वेळ, साधने आणि योजना यासंबंधी सूचना घेत होते. दुसरीकडे, भारतावर दबाव टाकून पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करावा, अशा विनवण्या आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सौदी अरेबिया यासह मुस्लिम देशांना करायला सुरुवात केल्याचे समजते. यातच कर्नाटकचे मंत्री जमीर अहमद खान यांनी पहलगाम हल्ल्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले.

मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार

एका पत्रकार परिषदेत पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना जमीर अहमद खान म्हणाले की, आम्ही भारतीय आहोत, आम्ही हिंदुस्थानी आहोत. पाकिस्तानचे आपल्याबरोबर कधीही कसलेही संबंध नव्हते. पाकिस्तान आपला कायम शत्रू राहिलेला आहे. जर पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि केंद्र सरकारने परवानगी दिली तर युद्धासाठी पाकिस्तानात जाण्यास तयार आहे. मी युद्धासाठी पाकिस्तानात जाईन. मोदी, शाह यांनी मला आत्मघातकी बॉम्ब द्यावा. मी माझ्या शरीरावर बांधेन आणि पाकिस्तानात जाऊन त्यांच्यावर हल्ला करेन, असे खान यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, खान यांनी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. हा हल्ला निष्पाप नागरिकांविरोधातील घृणास्पद आणि अमानवी कृत्य आहे. प्रत्येक भारतीयाने एकजूट दाखवली पाहिजे. केंद्र सरकारला राष्ट्रीय सुरक्षेबाबत कठोर पावले उचलण्याचे आवाहन खान यांनी केले.

 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरKarnatakकर्नाटकCentral Governmentकेंद्र सरकार