शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 15:56 IST

भारतीय लष्कराच्या तिन्ही प्रमुखांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि भारत-पाकिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली.

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे 9 अड्डे नष्ट करण्यासाठी 'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत तीव्र कारवाई केली. या कारवाईनंतर भारतीय सैन्याकडून सातत्याने याबाबत माहिती दिली जात आहे. आजही(12 मे) भारतीय लष्कराच्या तिन्ही प्रमुखांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि भारत-पाकिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीबद्दल माहिती पत्रकार परिषदेद्वारे माहिती दिली. 

दरम्यान, पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी एक व्हिडिओ दाखवण्यात आला. या व्हिडिओमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हल्ल्यांना योग्य उत्तरच दिले नाही, तर पाकचे वाईट हेतूही उध्वस्त केले, हे दाखवण्यात आले. या व्हिडिओची सर्वात खास गोष्ट म्हणजे, या व्हिडिओच्या बॅग्राउंडला प्रसिद्ध कवी रामधारी सिंह 'दिनकर' यांची कविता लावण्यात आली. 'याचना नहीं, अब रण होगा...जब नाश मनुज पर छाता है, पहले विवेक मर जाता है. ' या ओळीचा वापर या व्हिडिओत करण्यात आला. 

या कवितेसह भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरचा व्हिडिओ खूप प्रभावी वाटला. ही कविता वीर आणि रौद्र भावनांमध्ये लिहिलेली असून, दिनकर यांच्या 'रश्मीरथी' या महाकाव्यात दिसते. जेव्हा भगवान श्रीकृष्ण शांतीदूत म्हणून पांडवांना भेटण्यासाठी हस्तिनापूरला पोहोचतात आणि युद्ध थांबवण्याचे आवाहन करतात, त्या प्रसंगावर ही कविता आधारलेली आहे. 

सैन्यप्रमुखांचा पाकिस्तानला इशारापत्रकार परिषदेदरम्यान लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले, आपल्याला हवाई संरक्षण कारवाईला समजून घेणे आवश्यक आहे. पाकिस्तानच्या पापाचा घडा भरला आहे. आम्ही आधीच पूर्ण तयारी केली होती आणि त्यानुसारच कारवाई केली. एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले, आमची लढाई दहशतवाद आणि दहशतवाद्यांशी आहे, म्हणून आम्ही प्रथम दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. पण पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देणे योग्य मानले. पाकिस्तानने ही लढाई स्वतःची बनवली, म्हणूनच त्यांना प्रत्युत्तर देणे आवश्यक होते.

दिनकर यांच्या कवितेचे संक्षिप्त रुप...

मैत्री की राह बताने को,सबको सुमार्ग पर लाने को,दुर्योधन को समझाने को,भीषण विध्वंस बचाने को,भगवान हस्तिनापुर आये,पांडव का संदेशा लाये।

पर, इसमें भी यदि बाधा हो,तो दे दो केवल पांच ग्राम,रखो अपनी धरती तमाम।हम वहीं खुशी से खायेंगे,परिजन पर असि न उठायेंगे!

दुर्योधन वह भी दे ना सका,आशीष समाज की ले न सका,उलटे, हरि को बांधने चला,जो था असाध्य, साधने चला।जब नाश मनुज पर छाता है,पहले विवेक मर जाता है।

हरि ने भीषण हुंकार किया,अपना स्वरूप-विस्तार किया,डगमग-डगमग दिग्गज डोले,भगवान् कुपित होकर बोले-जंजीर बढ़ा कर साध मुझे,हाँ, हाँ दुर्योधन! बांध मुझे।

हित-वचन नहीं तूने माना,मैत्री का मूल्य न पहचाना,तो ले, मैं भी अब जाता हूं,अन्तिम संकल्प सुनाता हूं।याचना नहीं, अब रण होगा,जीवन-जय या कि मरण होगा।

टकरायेंगे नक्षत्र-निकर,बरसेगी भू पर वह्नि प्रखर,फण शेषनाग का डोलेगा,विकराल काल मुंह खोलेगा।दुर्योधन! रण ऐसा होगा।फिर कभी नहीं जैसा होगा।

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान