शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 11:04 IST

दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाक सीमेवर तणाव वाढला आहे. पाकिस्तानविरोधात लष्कर, नौदल आणि हवाई दलाला कारवाई करण्याची मुभा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे.

नवी दिल्ली - पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यात सिंधु जल कराराला स्थगिती देत भारताने पाकचे कंबरडे मोडले आहे. त्यानंतर आता पुन्हा भारताने पाकिस्तानला दणका दिला आहे. भारतानं पाकिस्तानसाठी एअरस्पेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नोटीस टू एअरमन(NOTAM) जारी करत ३० एप्रिल ते २३ मे या कालावधीत पाकिस्तानचं कुठलेही विमान अथवा लढाऊ विमाने भारताच्या हवाई हद्दीत प्रवेश करू शकत नाही. 

पाकिस्तानने भारतीय विमानांना त्यांच्या हवाई क्षेत्रात बंदी घातल्यानंतर भारतानेही पाकिस्तानी विमानांसाठी एअरस्पेस बंद केले आहे. नोटीस टू एअरमननुसार, भारताने ३० एप्रिल ते २३ मे २०२५ या काळात देशाच्या हवाई क्षेत्रात पाकिस्तानी प्रवासी विमान, लष्करी विमानांना बंदी आणली आहे. नोटीस टू एअर मिशन सिस्टम अशी व्यवस्था आहे ज्याच्या मदतीने फ्लाईटमध्ये असणाऱ्या केबिन क्रूला महत्वाच्या सूचना पाठवल्या जातात. विमानातील पायलटला हवामान, विस्फोट, हवाई क्षेत्रात बंदी, पॅराशूट जंप, रॉकेट लॉन्च आणि सैन्य सराव सारखी संवेदनशील माहिती या नोटीस टू एअरमनमार्फत पाठवली जाते.

 

पाकिस्तानींसाठी NO ENTRY

दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाक सीमेवर तणाव वाढला आहे. पाकिस्तानविरोधात लष्कर, नौदल आणि हवाई दलाला कारवाई करण्याची मुभा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार पाकिस्तानी लोकांना देशाच्या कानाकोपऱ्यातून शोधून शोधून त्यांच्या देशात परत पाठवले जात आहे. पाकिस्तानसाठी भारताने त्यांचे रस्ते बंद केलेत. भारतीय सीमेवर पाकिस्तानी नागरिकांना NO ENTRY आहे. 

दरम्यान, पाकिस्तानी उपपंतप्रधान यांनी पुढील ३६ तासांत युद्ध होण्याचा दावा केला आहे. उपपंतप्रधान इशाक डार यांनी मोठ्या सूत्रांच्या हवाल्याने हा दावा केला असून तो चुकीचा नसेल असं म्हटलं आहे. ३६ तासांत भारत पाकिस्तानवर हल्ला करू शकते असं त्यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानी संरक्षण मंत्री यांनीही माध्यमांशी बोलताना वेळेसोबत तणाव आणखी वाढत चालला आहे. कमी होण्याची चिन्हे नाहीत. अनेक देश हा संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पाकिस्तान कुठल्याही परिस्थितीत भारताच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देईल असं त्यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला