शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 11:04 IST

दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाक सीमेवर तणाव वाढला आहे. पाकिस्तानविरोधात लष्कर, नौदल आणि हवाई दलाला कारवाई करण्याची मुभा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे.

नवी दिल्ली - पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यात सिंधु जल कराराला स्थगिती देत भारताने पाकचे कंबरडे मोडले आहे. त्यानंतर आता पुन्हा भारताने पाकिस्तानला दणका दिला आहे. भारतानं पाकिस्तानसाठी एअरस्पेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नोटीस टू एअरमन(NOTAM) जारी करत ३० एप्रिल ते २३ मे या कालावधीत पाकिस्तानचं कुठलेही विमान अथवा लढाऊ विमाने भारताच्या हवाई हद्दीत प्रवेश करू शकत नाही. 

पाकिस्तानने भारतीय विमानांना त्यांच्या हवाई क्षेत्रात बंदी घातल्यानंतर भारतानेही पाकिस्तानी विमानांसाठी एअरस्पेस बंद केले आहे. नोटीस टू एअरमननुसार, भारताने ३० एप्रिल ते २३ मे २०२५ या काळात देशाच्या हवाई क्षेत्रात पाकिस्तानी प्रवासी विमान, लष्करी विमानांना बंदी आणली आहे. नोटीस टू एअर मिशन सिस्टम अशी व्यवस्था आहे ज्याच्या मदतीने फ्लाईटमध्ये असणाऱ्या केबिन क्रूला महत्वाच्या सूचना पाठवल्या जातात. विमानातील पायलटला हवामान, विस्फोट, हवाई क्षेत्रात बंदी, पॅराशूट जंप, रॉकेट लॉन्च आणि सैन्य सराव सारखी संवेदनशील माहिती या नोटीस टू एअरमनमार्फत पाठवली जाते.

 

पाकिस्तानींसाठी NO ENTRY

दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाक सीमेवर तणाव वाढला आहे. पाकिस्तानविरोधात लष्कर, नौदल आणि हवाई दलाला कारवाई करण्याची मुभा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार पाकिस्तानी लोकांना देशाच्या कानाकोपऱ्यातून शोधून शोधून त्यांच्या देशात परत पाठवले जात आहे. पाकिस्तानसाठी भारताने त्यांचे रस्ते बंद केलेत. भारतीय सीमेवर पाकिस्तानी नागरिकांना NO ENTRY आहे. 

दरम्यान, पाकिस्तानी उपपंतप्रधान यांनी पुढील ३६ तासांत युद्ध होण्याचा दावा केला आहे. उपपंतप्रधान इशाक डार यांनी मोठ्या सूत्रांच्या हवाल्याने हा दावा केला असून तो चुकीचा नसेल असं म्हटलं आहे. ३६ तासांत भारत पाकिस्तानवर हल्ला करू शकते असं त्यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानी संरक्षण मंत्री यांनीही माध्यमांशी बोलताना वेळेसोबत तणाव आणखी वाढत चालला आहे. कमी होण्याची चिन्हे नाहीत. अनेक देश हा संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पाकिस्तान कुठल्याही परिस्थितीत भारताच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देईल असं त्यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला