शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 11:04 IST

दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाक सीमेवर तणाव वाढला आहे. पाकिस्तानविरोधात लष्कर, नौदल आणि हवाई दलाला कारवाई करण्याची मुभा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे.

नवी दिल्ली - पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यात सिंधु जल कराराला स्थगिती देत भारताने पाकचे कंबरडे मोडले आहे. त्यानंतर आता पुन्हा भारताने पाकिस्तानला दणका दिला आहे. भारतानं पाकिस्तानसाठी एअरस्पेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नोटीस टू एअरमन(NOTAM) जारी करत ३० एप्रिल ते २३ मे या कालावधीत पाकिस्तानचं कुठलेही विमान अथवा लढाऊ विमाने भारताच्या हवाई हद्दीत प्रवेश करू शकत नाही. 

पाकिस्तानने भारतीय विमानांना त्यांच्या हवाई क्षेत्रात बंदी घातल्यानंतर भारतानेही पाकिस्तानी विमानांसाठी एअरस्पेस बंद केले आहे. नोटीस टू एअरमननुसार, भारताने ३० एप्रिल ते २३ मे २०२५ या काळात देशाच्या हवाई क्षेत्रात पाकिस्तानी प्रवासी विमान, लष्करी विमानांना बंदी आणली आहे. नोटीस टू एअर मिशन सिस्टम अशी व्यवस्था आहे ज्याच्या मदतीने फ्लाईटमध्ये असणाऱ्या केबिन क्रूला महत्वाच्या सूचना पाठवल्या जातात. विमानातील पायलटला हवामान, विस्फोट, हवाई क्षेत्रात बंदी, पॅराशूट जंप, रॉकेट लॉन्च आणि सैन्य सराव सारखी संवेदनशील माहिती या नोटीस टू एअरमनमार्फत पाठवली जाते.

 

पाकिस्तानींसाठी NO ENTRY

दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाक सीमेवर तणाव वाढला आहे. पाकिस्तानविरोधात लष्कर, नौदल आणि हवाई दलाला कारवाई करण्याची मुभा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार पाकिस्तानी लोकांना देशाच्या कानाकोपऱ्यातून शोधून शोधून त्यांच्या देशात परत पाठवले जात आहे. पाकिस्तानसाठी भारताने त्यांचे रस्ते बंद केलेत. भारतीय सीमेवर पाकिस्तानी नागरिकांना NO ENTRY आहे. 

दरम्यान, पाकिस्तानी उपपंतप्रधान यांनी पुढील ३६ तासांत युद्ध होण्याचा दावा केला आहे. उपपंतप्रधान इशाक डार यांनी मोठ्या सूत्रांच्या हवाल्याने हा दावा केला असून तो चुकीचा नसेल असं म्हटलं आहे. ३६ तासांत भारत पाकिस्तानवर हल्ला करू शकते असं त्यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानी संरक्षण मंत्री यांनीही माध्यमांशी बोलताना वेळेसोबत तणाव आणखी वाढत चालला आहे. कमी होण्याची चिन्हे नाहीत. अनेक देश हा संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पाकिस्तान कुठल्याही परिस्थितीत भारताच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देईल असं त्यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला