शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 16:02 IST

India-Pakistan War Scenario: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले आहेत.

India-Pakistan War Scenario: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला, ज्यात 26 निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यानंतर देशभरातून पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना सोडणार नाही, असा पवित्रा सरकारने घेतला आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सरकारने पाकिस्तानी दूतावास बंद केले असून, सिंधू पाणी करारदेखील रद्द केला आहे. या सर्व कारवाईसोबतच युद्धाचा संशयही व्यक्त केला जातोय. जर भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा युद्ध झाले, तर जगभरातील कोणते देश कोणाच्या बाजूने असतील?

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली, तर भारताला दोन आघाड्यांवर लढावे लागू शकते. चीन आणि पाकिस्तानची मैत्री सर्वश्रृत आहे. अशा परिस्थितीत भारताला दोन्ही देशांचा सामना करावा लागू शकतो. असे झाले तर भारतासाठी ही खूप कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते. पण, चीन सर्व गोष्टींचा विचार करुन भारत-पाक युद्धात उतरले. 1962 मध्ये चीनने भारताला युद्धात हरवले होते, पण आता परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही. आता भारताची ताकदही पूर्वीपेक्षा वाढली आहे.

कोणते देश भारताला पाठिंबा देतील?सध्या भारत जगात एक बलवान देश म्हणून उदयास आला आहे. भारताचे बहुतांश मोठ्या देशांशी खूप चांगले संबंध आहेत. यामध्ये सर्वात मोठा देश अमेरिका आहे, ज्याला जगातील सर्वात मोठी शक्ती म्हटले जाते. दोन्ही देश एकमेकांशी विविध प्रकारचे व्यापार करतात. गेल्या काही वर्षांत पाकिस्ताननेही अमेरिकेशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु दहशतवाद आणि इतर गोष्टींमुळे अमेरिका पाकिस्तानला फारसे महत्त्व देत नाही. अशा परिस्थितीत अमेरिका भारताच्या बाजूने येऊ शकतो.

रशिया आणि इस्रायलदेखील भारताच्या बाजूनेअमेरिकेनंतर, भारताला जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी शक्ती असलेल्या रशियाकडूनही पाठिंबा मिळू शकतो. गेल्या अनेक दशकांपासून रशिया आणि भारताचे संबंध खूप चांगले आहेत. भारताने रशियाकडून अनेक मोठी शस्त्रे खरेदी केली असून, भविष्यातही असे करार सुरू राहतील. यापूर्वीही रशियाने पाकिस्तानसोबतच्या युद्धात उघडपणे भारताला पाठिंबा दिला होता. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून इस्रायल आणि भारत यांच्यातील संबंधही मजबूत आहेत. कारगिल युद्धादरम्यान इस्रायलने भारताला खूप मदत केली होती. आताही युद्ध पेटल्यास इस्रायलचा भारताला पाठिंबा असेल.

पाकिस्तानच्या बाजूने कोण येणार?अशा परिस्थितीत चीन वगळता दुसरा कोणताही मोठा देश पाकिस्तानला मदत करणार नाही. पाकिस्तानने भारताशी पंगा घेतला तर त्याला फक्त चीनवर अवलंबून राहावे लागेल. पाकिस्तान मुस्लिम देशांकडूनही मदत मागू शकतो, परंतु कोणताही इस्लामिक देश भारताविरुद्ध युद्धसदृश परिस्थिती निर्माण करेल अशी शक्यता खूपच कमी आहे. 

 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतPakistanपाकिस्तानwarयुद्धIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान