शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
3
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
4
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
5
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
6
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
7
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
8
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
9
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
10
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
11
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
12
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
13
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
14
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
15
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
16
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
17
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
18
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
19
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
20
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर

एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 05:34 IST

४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना सोडावा लागणार भारत, २७ एप्रिलपासून सर्व व्हिसा रद्द  

नवी दिल्ली - केंद्र सरकारने दिलेली मुदत संपुष्टात आल्यानंतर एकही पाकिस्तानी नागरिक देशात थांबू नये, याची खात्री करावी, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दूरध्वनी करून दिली.

पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले सर्व व्हिसा २७ एप्रिलपासून रद्द करण्यात आल्याची घोषणा केंद्र सरकारने गुरुवारी केली होती. तसेच पाकिस्तानमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीयांनी शक्य तितक्या लवकर मायदेशी परतावे असेही सांगितले. पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात अनेक कठोर निर्णय घेतले. पाकिस्तानी नागरिकांनी भारतातून ४८ तासांत मायदेशी निघून जावे, असा आदेश बुधवारी देण्यात आला. या पार्श्वभूमीवर शाह यांनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन करून एकही पाकिस्तानी नागरिक भारतात राहू नये, याची खातरजमा करण्यास सांगितले. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले असले, तरी हा निर्णय पाकिस्तानातून भारतात आलेल्या हिंदूंना लागू होणार नाही असे सरकारने स्पष्ट केले. 

पाकिस्तानी हिंदू येतात धार्मिक विधींसाठी भारतातपाकिस्तानातील हिंदू नागरिक आपल्या नातेवाइकांच्या अस्थिविसर्जन व धार्मिक विधींसाठी भारतातील हरिद्वार, ऋषिकेश यांसारख्या तीर्थस्थळांना भेट देतात.  अनेक अडथळे असूनही दोन्ही बाजूंनी नातेसंबंध जपले जातात. विवाहसंबंधही जुळवले जातात. स्थानिक रहिवाशांच्या मते, केंद्र सरकारच्या आदेशामुळे अनेक विवाहांवर संकट निर्माण झाले आहे.

हल्लेखोरांवर कारवाई झाली पाहिजे : अमेरिकाअमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालक तुलसी गॅबार्ड यांनी शुक्रवारी सांगितले की, पहलगामध्ये अमानूष हल्ला करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी अमेरिका भारताला सहकार्य करेल.  याआधी बुधवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी दूरध्वनीवरून बोलताना पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला.

भारत सोडण्याच्या आदेशाने धार्मिक यात्रेवर आलेल्यांची वाढली चिंता४८ तासांत भारत सोडण्याच्या आदेशामुळे धार्मिक यात्रेसाठी आलेल्या पाक हिंदू नागरिकांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली. आहे. त्यांना इतक्या तातडीने परत कसे जावे हेच समजेनासे झाले आहे. भारत सरकारने वाघा आणि अटारी सीमाचौक्या बंद केल्या आहेत. २७ मार्च रोजी ईश्वरदास हे आपल्या कुटुंबातील १३ सदस्यांसह वाघा सीमेमार्गे जोधपूरला आले. त्यांच्या ग्रुपमध्ये एकूण ५० लोक आहेत. त्यांच्या व्हिसाची मुदत २५ मे रोजी संपणार आहे. मात्र, सध्याच्या स्थितीत तेही गोंधळले आहेत. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाAmit Shahअमित शाहChief Ministerमुख्यमंत्रीPakistanपाकिस्तान