शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 05:34 IST

४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना सोडावा लागणार भारत, २७ एप्रिलपासून सर्व व्हिसा रद्द  

नवी दिल्ली - केंद्र सरकारने दिलेली मुदत संपुष्टात आल्यानंतर एकही पाकिस्तानी नागरिक देशात थांबू नये, याची खात्री करावी, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दूरध्वनी करून दिली.

पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले सर्व व्हिसा २७ एप्रिलपासून रद्द करण्यात आल्याची घोषणा केंद्र सरकारने गुरुवारी केली होती. तसेच पाकिस्तानमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीयांनी शक्य तितक्या लवकर मायदेशी परतावे असेही सांगितले. पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात अनेक कठोर निर्णय घेतले. पाकिस्तानी नागरिकांनी भारतातून ४८ तासांत मायदेशी निघून जावे, असा आदेश बुधवारी देण्यात आला. या पार्श्वभूमीवर शाह यांनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन करून एकही पाकिस्तानी नागरिक भारतात राहू नये, याची खातरजमा करण्यास सांगितले. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले असले, तरी हा निर्णय पाकिस्तानातून भारतात आलेल्या हिंदूंना लागू होणार नाही असे सरकारने स्पष्ट केले. 

पाकिस्तानी हिंदू येतात धार्मिक विधींसाठी भारतातपाकिस्तानातील हिंदू नागरिक आपल्या नातेवाइकांच्या अस्थिविसर्जन व धार्मिक विधींसाठी भारतातील हरिद्वार, ऋषिकेश यांसारख्या तीर्थस्थळांना भेट देतात.  अनेक अडथळे असूनही दोन्ही बाजूंनी नातेसंबंध जपले जातात. विवाहसंबंधही जुळवले जातात. स्थानिक रहिवाशांच्या मते, केंद्र सरकारच्या आदेशामुळे अनेक विवाहांवर संकट निर्माण झाले आहे.

हल्लेखोरांवर कारवाई झाली पाहिजे : अमेरिकाअमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालक तुलसी गॅबार्ड यांनी शुक्रवारी सांगितले की, पहलगामध्ये अमानूष हल्ला करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी अमेरिका भारताला सहकार्य करेल.  याआधी बुधवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी दूरध्वनीवरून बोलताना पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला.

भारत सोडण्याच्या आदेशाने धार्मिक यात्रेवर आलेल्यांची वाढली चिंता४८ तासांत भारत सोडण्याच्या आदेशामुळे धार्मिक यात्रेसाठी आलेल्या पाक हिंदू नागरिकांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली. आहे. त्यांना इतक्या तातडीने परत कसे जावे हेच समजेनासे झाले आहे. भारत सरकारने वाघा आणि अटारी सीमाचौक्या बंद केल्या आहेत. २७ मार्च रोजी ईश्वरदास हे आपल्या कुटुंबातील १३ सदस्यांसह वाघा सीमेमार्गे जोधपूरला आले. त्यांच्या ग्रुपमध्ये एकूण ५० लोक आहेत. त्यांच्या व्हिसाची मुदत २५ मे रोजी संपणार आहे. मात्र, सध्याच्या स्थितीत तेही गोंधळले आहेत. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाAmit Shahअमित शाहChief Ministerमुख्यमंत्रीPakistanपाकिस्तान