शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
4
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
5
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
6
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
7
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
8
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
9
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
10
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
11
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
12
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
13
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
14
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
15
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
16
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
17
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
18
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
19
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
20
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?

'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 19:59 IST

Pahalgam Terror Attack: 'संरक्षण मंत्री म्हणून माझ्या सैनिकांसह देशाच्या सीमांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही माझी जबाबदारी आहे.'

Pahalgam Terror Attack: भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी दिल्लीतील बकरवाला आनंदधाम आश्रमातील सनातन संस्कृती जागरण महोत्सवाला हजेरी लावली. या व्यासपीठावरुन संरक्षणमंत्र्यांनी पहलगाम हल्ल्याबद्दल पाकिस्तानला थेट इशारा दिला आणि म्हटले की, संरक्षण मंत्री म्हणून माझ्या सैनिकांसह देशाच्या सीमांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही माझी जबाबदारी आहे. पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात तुम्हाला जे हवे तेच होईल.

देशाविरोधात कारवाया करणाऱ्यांना योग्य उत्तर देणे, ही माझी जबाबदारी आहे. तुम्ही सर्वजण आपल्या पंतप्रधानांना चांगले ओळखता, तुम्हाला त्यांच्या कामाच्या शैलीची माहिती आहे, त्यांच्या दृढनिश्चयाचीही चांगली जाणीव आहे. मी तुम्हाला खात्री देतो की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाला जे हवे आहे, तेच होईल, असे सूचक विधान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. 

2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र बनेलराजनाथ सिंह पुढे म्हणतात, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पंतप्रधान मोदींनी 2047 पर्यंत संपूर्ण देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. स्वाभाविकच, हे ध्येय छोटे नाही, पण तुम्ही निश्चिंत राहा, हे ध्येय साध्य होईल. आता आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. पूर्वी, जेव्हा जेव्हा भारत आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर काही बोलायचा, तेव्हा जग भारताचे गांभीर्याने ऐकत नव्हते. भारत हा एक कमकुवत देश आहे, गरिबांचा देश आहे, असे म्हटले जायचे. पण, आज जेव्हा भारत आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर काही बोलतो तेव्हा संपूर्ण जग उघड्या कानांनी ऐकतो, असेही ते यावेळी म्हणाले.

पहलगाम प्रकरणातील नवीनतम अपडेट काय आहे?पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीचा भाग म्हणून अनंतनागमध्ये 25 हून अधिक स्थानिक पर्यटक मार्गदर्शकांची चौकशी करण्यात आली आहे. स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय हा हल्ला होऊ शकला नसता, असे तपास यंत्रणांचे मत आहे. तपास पुढे नेण्यासाठी एजन्सी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ओव्हरग्राउंड वर्करचा शोध घेत आहेत. हल्ल्यानंतर भारत जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही लष्कर प्रमुखांची भेट घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधानांनी म्हटले आहे की, 'ज्यांनी हल्ला केला त्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल'. त्याअंतर्गत लष्करी तयारी तीव्र करण्यात आली आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाRajnath Singhराजनाथ सिंहIndiaभारतPakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदी