शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
"पप्पा, मी वाचणार नाही...", मुलाचा अखेरचा कॉल; उत्तरकाशीतील दुर्घटनेनं दिली आयुष्यभराची जखम
4
भारतानं रशियासोबत असं काही केलं की ट्रम्प यांचा होईल तिळपापड; अमेरिकेच्या दुखत्या नसेवर हात ठेवला का?
5
TCS मध्ये मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून पगार वाढणार, पण 'या' १२,००० कर्मचाऱ्यांची धडधड वाढली!
6
ओयो हॉटेलमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण; महिला चप्पल घेऊन मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल...
7
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
8
८ डावात फक्त एक फिफ्टी! टेस्टमध्ये 'नापास'चा ठपका; आता करुण नायर या मोठ्या स्पर्धेतून OUT
9
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
10
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
11
Trump Tariff News Apple Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
12
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
13
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
14
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
15
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
16
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
17
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
18
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
19
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
20
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत

"२६/११ नंतर पहलगाम सर्वात मोठा दहशतवादी हल्ला, पाकिस्तान वाईट..." UN मध्ये भारताने सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 13:05 IST

भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानला दृष्ट राष्ट्र म्हटले.

जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतातील संबंध ताणले आहेत. भारताने पाकिस्तान विरोधात मोठी कारवाई केली आहे. दरम्यान, आता संयुक्त राष्ट्रमध्येही भारताने पाकिस्तानला सुनावले आहे. पाकिस्तानला वाईट राष्ट्र म्हणून संबोधले आहे. 

भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानला 'दुष्ट राज्य' म्हटले आहे. भारताच्या उप-स्थायी प्रतिनिधी राजदूत योजना पटेल म्हणाल्या की, एका विशिष्ट शिष्टमंडळाने भारताविरुद्ध प्रचार करण्यासाठी आणि निराधार आरोप करण्यासाठी या व्यासपीठाचा गैरवापर करणे दुर्दैवी आहे.

प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी

" काही दिवसापूर्वी जगाने पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्याचा, प्रशिक्षण देण्याचा आणि निधी देण्याचा पाकिस्तानचा इतिहास कबूल करताना ऐकले आहे. ही त्यांची उघड कबुली आहे आणि पाकिस्तानला जागतिक दहशतवादाला प्रोत्साहन देणारा आणि प्रदेश अस्थिर करणारा एक दुष्ट देश म्हणून उघड करते. जग आता डोळे बंद करून राहू शकत नाही, असंही त्यांनी सांगितले. 

२६/११ पेक्षा मोठा हल्ला 

संयुक्त राष्ट्रांमध्ये योजना पटेल म्हणाल्या की, २००८ मध्ये झालेल्या २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर पहलगाम दहशतवादी हल्ल्यात देशातील नागरिकांचे सर्वात मोठे नुकसान झाले. अनेक दशकांपासून सीमापार दहशतवादाचा बळी राहिलेला भारत अशा हल्ल्यांचा बळी, त्यांच्या कुटुंबियांवर आणि समाजावर होणारा दीर्घकालीन परिणाम पूर्णपणे जाणतो.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे काही दिवसापूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातील नेते आणि सरकारांनी व्यक्त केलेल्या स्पष्ट पाठिंब्याचे आणि एकतेचे भारत कौतुक करतो. त्या म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचा हा एक चांगला परिणाम आहे. जगातील प्रत्येक प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध केला पाहिजे, असंही पटेल म्हणाल्या.

योजना पटेल म्हणाल्या की, दहशतवादामध्ये पीडितांचे म्हणणे ऐकण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी ही एक सुरक्षित जागा आहे. पीडितांचे ऐकून घेण्यासाठी आणि त्यांना समर्थन देण्यासाठी  VoTAN सारखे उपक्रम आवश्यक आहेत असे भारताचे मत आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ