शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

"२६/११ नंतर पहलगाम सर्वात मोठा दहशतवादी हल्ला, पाकिस्तान वाईट..." UN मध्ये भारताने सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 13:05 IST

भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानला दृष्ट राष्ट्र म्हटले.

जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतातील संबंध ताणले आहेत. भारताने पाकिस्तान विरोधात मोठी कारवाई केली आहे. दरम्यान, आता संयुक्त राष्ट्रमध्येही भारताने पाकिस्तानला सुनावले आहे. पाकिस्तानला वाईट राष्ट्र म्हणून संबोधले आहे. 

भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानला 'दुष्ट राज्य' म्हटले आहे. भारताच्या उप-स्थायी प्रतिनिधी राजदूत योजना पटेल म्हणाल्या की, एका विशिष्ट शिष्टमंडळाने भारताविरुद्ध प्रचार करण्यासाठी आणि निराधार आरोप करण्यासाठी या व्यासपीठाचा गैरवापर करणे दुर्दैवी आहे.

प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी

" काही दिवसापूर्वी जगाने पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्याचा, प्रशिक्षण देण्याचा आणि निधी देण्याचा पाकिस्तानचा इतिहास कबूल करताना ऐकले आहे. ही त्यांची उघड कबुली आहे आणि पाकिस्तानला जागतिक दहशतवादाला प्रोत्साहन देणारा आणि प्रदेश अस्थिर करणारा एक दुष्ट देश म्हणून उघड करते. जग आता डोळे बंद करून राहू शकत नाही, असंही त्यांनी सांगितले. 

२६/११ पेक्षा मोठा हल्ला 

संयुक्त राष्ट्रांमध्ये योजना पटेल म्हणाल्या की, २००८ मध्ये झालेल्या २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर पहलगाम दहशतवादी हल्ल्यात देशातील नागरिकांचे सर्वात मोठे नुकसान झाले. अनेक दशकांपासून सीमापार दहशतवादाचा बळी राहिलेला भारत अशा हल्ल्यांचा बळी, त्यांच्या कुटुंबियांवर आणि समाजावर होणारा दीर्घकालीन परिणाम पूर्णपणे जाणतो.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे काही दिवसापूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातील नेते आणि सरकारांनी व्यक्त केलेल्या स्पष्ट पाठिंब्याचे आणि एकतेचे भारत कौतुक करतो. त्या म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचा हा एक चांगला परिणाम आहे. जगातील प्रत्येक प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध केला पाहिजे, असंही पटेल म्हणाल्या.

योजना पटेल म्हणाल्या की, दहशतवादामध्ये पीडितांचे म्हणणे ऐकण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी ही एक सुरक्षित जागा आहे. पीडितांचे ऐकून घेण्यासाठी आणि त्यांना समर्थन देण्यासाठी  VoTAN सारखे उपक्रम आवश्यक आहेत असे भारताचे मत आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ