शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"२६/११ नंतर पहलगाम सर्वात मोठा दहशतवादी हल्ला, पाकिस्तान वाईट..." UN मध्ये भारताने सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 13:05 IST

भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानला दृष्ट राष्ट्र म्हटले.

जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतातील संबंध ताणले आहेत. भारताने पाकिस्तान विरोधात मोठी कारवाई केली आहे. दरम्यान, आता संयुक्त राष्ट्रमध्येही भारताने पाकिस्तानला सुनावले आहे. पाकिस्तानला वाईट राष्ट्र म्हणून संबोधले आहे. 

भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानला 'दुष्ट राज्य' म्हटले आहे. भारताच्या उप-स्थायी प्रतिनिधी राजदूत योजना पटेल म्हणाल्या की, एका विशिष्ट शिष्टमंडळाने भारताविरुद्ध प्रचार करण्यासाठी आणि निराधार आरोप करण्यासाठी या व्यासपीठाचा गैरवापर करणे दुर्दैवी आहे.

प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी

" काही दिवसापूर्वी जगाने पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्याचा, प्रशिक्षण देण्याचा आणि निधी देण्याचा पाकिस्तानचा इतिहास कबूल करताना ऐकले आहे. ही त्यांची उघड कबुली आहे आणि पाकिस्तानला जागतिक दहशतवादाला प्रोत्साहन देणारा आणि प्रदेश अस्थिर करणारा एक दुष्ट देश म्हणून उघड करते. जग आता डोळे बंद करून राहू शकत नाही, असंही त्यांनी सांगितले. 

२६/११ पेक्षा मोठा हल्ला 

संयुक्त राष्ट्रांमध्ये योजना पटेल म्हणाल्या की, २००८ मध्ये झालेल्या २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर पहलगाम दहशतवादी हल्ल्यात देशातील नागरिकांचे सर्वात मोठे नुकसान झाले. अनेक दशकांपासून सीमापार दहशतवादाचा बळी राहिलेला भारत अशा हल्ल्यांचा बळी, त्यांच्या कुटुंबियांवर आणि समाजावर होणारा दीर्घकालीन परिणाम पूर्णपणे जाणतो.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे काही दिवसापूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातील नेते आणि सरकारांनी व्यक्त केलेल्या स्पष्ट पाठिंब्याचे आणि एकतेचे भारत कौतुक करतो. त्या म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचा हा एक चांगला परिणाम आहे. जगातील प्रत्येक प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध केला पाहिजे, असंही पटेल म्हणाल्या.

योजना पटेल म्हणाल्या की, दहशतवादामध्ये पीडितांचे म्हणणे ऐकण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी ही एक सुरक्षित जागा आहे. पीडितांचे ऐकून घेण्यासाठी आणि त्यांना समर्थन देण्यासाठी  VoTAN सारखे उपक्रम आवश्यक आहेत असे भारताचे मत आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ