शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
5
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
6
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
7
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
8
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
9
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
10
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
11
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
12
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
13
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
14
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
15
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
16
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
17
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
18
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
19
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
20
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
Daily Top 2Weekly Top 5

"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 13:32 IST

भारतीय सैन्यावर अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या शाहिद आफ्रिदीला शिखर धवनने चोख प्रत्युत्तर दिले आहे.

Shikhar Dhawan on Shahid Afridi: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे समोर येत आहे. मात्र पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी  हे मान्य करायला तयार नाही. शाहिद आफ्रिदीने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचे पुरावे भारताकडून मागितले होते. तसेच या हल्ल्यासाठी भारतीय सैन्यालाही जबाबदार धरलं. यावरुनच भारतीय क्रिकेकटपटू शिखर धवनने आफ्रिदीला सुनावलं आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत केलेल्या विधानामुळे पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीवर सर्व बाजूंनी टीका होत आहे. भारतीय सैन्यावर अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या शाहिद आफ्रिदीला शिखर धवनने चोख प्रत्युत्तर दिले आहे. माजी भारतीय क्रिकेटपटूने सोशल मीडियावर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीवर टीका केली. तुम्ही अजून किती खालच्या पातळीवर जाणार आहात असं शिखर धवनने  म्हटलं आहे.

"तुम्हाला कारगिलमध्ये सुद्धा हरवलं होतं. आधीच तुम्ही इतके खालच्या पातळीवर गेला आहात, आणखी किती खाली जाल? अनावश्यक टिप्पण्या करण्याऐवजी, तुमच्या देशाच्या प्रगतीसाठी डोकं लावा. शाहिद आफ्रिदी आम्हाला आमच्या भारतीय सैन्याचा खूप अभिमान आहे. भारत माता की जय! जय हिंद!," असं शिखर धवन याने म्हटलं आहे.

शाहिद आफ्रिदीने काय म्हटलं?

"त्या दहशतवाद्यांनी एक तास तिथे दहशतवाद माजवली होती पण तुमच्या ८ लाख सैनिकांपैकी कोणीही तिथे गेले नाही आणि जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी १० मिनिटांत पाकिस्तानला दोष दिला. ते स्वतःच चुका करतात, ते स्वतःच लोकांना मारतात आणि नंतर ते स्वतःच व्हिडीओ दाखवतात आणि म्हणतात की ते जिवंत आहेत. असं करु नका. पाकिस्तान हा आमचा धर्म आहे, इस्लाम शांततेबद्दल बोलतो. आम्ही भारतासोबत चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण आम्हाला तिथून नेहमीच धमक्या येत असतात. आम्हाला माहितही नव्हते की आम्ही तिथे खेळायला जाऊ की नाही. २०१६ च्या विश्वचषकात मी कर्णधार होतो, आम्ही लाहोरमध्ये होतो आणि आम्हाला माहित नव्हते की आमचे भारतात विमान असेल की नाही. म्हणूनच मी म्हणतो की स्पोर्टस डिप्लोमसी ही सर्वोत्तम आहे. तुमचा कबड्डी संघ येतो, पण क्रिकेट संघ येत नाही. जर तुम्हाला करायचे असेल तर ते पूर्णपणे बंद करा अन्यथा ते करू नका," असे शाहिद आफ्रिदीने म्हटलं होतं.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाShahid Afridiशाहिद अफ्रिदीShikhar Dhawanशिखर धवनPakistanपाकिस्तान