शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 16:55 IST

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यानंतर विरोधक भाजपवर टीका करत आहेत.

Robert Vadra On Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. या हल्ल्यानंतर विरोधी पक्षातील नेते सत्ताधारी भाजपवर टीका करत आहेत. अशातच आता या प्रकरणावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी प्रतिक्रिया दिली.

वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना रॉबर्ट वाड्रा म्हणाले की, या हल्ल्यात प्राण गमावलेल्या 28 लोकांना मी श्रद्धांजली वाहतो. पण, देशातील सद्याच्या वातावरणामुळे हा हल्ला झाल्याचे मला वाटते. मुस्लिमांना मशिदींमध्ये नमाज अदा करण्यापासून रोखले जाणे किंवा मूर्ती शोधण्यासाठी मशिदींचे सर्वेक्षण करणे, यामुळे अशाप्रकारचा हल्ला झाला आहे. आपल्याला दाबले जातेय, अशी भावना देशातील मुस्लिमांमध्ये आहे. हे माझे वैयक्तिक मत आहे, माझ्या कुटुंबाचे किंवा काँग्रेसचे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?

वाड्रा पुढे म्हणतात, तुम्ही बाबर आणि औरंगजेाचा विषय आणता, त्यामुळेही मुस्लिम समाज दुखावला जातो. या मुद्द्यावर राजकारण होणे आणि त्यांच्यावर विविध निर्बंध लादले जाणे, हे योग्य नाही. धर्म आणि राजकारण वेगळे असले पाहिजे. जर हे थांबवले नाही, तर अशाप्रकारचे दहशतवादी हल्ले होतच राहतील. पहलगाममध्ये नाव-धर्म पाहून गोळ्या झाडल्या, हे चुकीचे आहे. मी याचा तीव्र शब्दात निषेध करतो.

वाड्रा पुढे म्हणतात, देशात सरकार हिंदुत्वाबद्दल बोलते, तेव्हा अल्पसंख्याकांना अस्वस्थ वाटते. देशात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट निर्माण झाली आहे. जोपर्यंत आपण एकजूट आणि धर्मनिरपेक्ष राहणार नाही, तोपर्यंत आपल्या कमकुवतपणा आणि अंतर्गत समस्या आपल्या शत्रूंना स्पष्टपणे दिसून येतील. दहशतवादाविरोधात समाजाने एकत्र येणे आवश्यक आहे. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो, तो मानवतेवर थेट हल्ला आहे, असेही वाड्रांनी यावेळी म्हटले.

 

 

 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाrobert vadraरॉबर्ट वाड्राBJPभाजपा