शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 15:49 IST

India vs Pakistan: भारतात सासर, पाकिस्तानात माहेर किंवा पाकिस्तानात सासर, भारतात माहेर असलेल्या अनेकजणी आपापल्या माहेरी आलेल्या होत्या. त्यांना सगळे आवरून मुलांना घेऊन वाघा किंवा अटारी बॉर्डर गाठावी लागत आहे. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानींना देश सोडण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली आहे. तर त्याला प्रत्यूत्तर म्हणून पाकिस्ताननेहीभारतीय नागरिकांना ४८ तासांची मुदत दिली आहे. परंतू, मुख्य अडचण माहेरवाशिनींची झाली आहे. भारतात सासर, पाकिस्तानात माहेर किंवा पाकिस्तानात सासर, भारतात माहेर असलेल्या अनेकजणी आपापल्या माहेरी आलेल्या होत्या. त्यांना सगळे आवरून मुलांना घेऊन वाघा किंवा अटारी बॉर्डर गाठावी लागत आहे. 

पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...

याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या

कराचीला दिलेली जोधपूरची महिला यामुळे त्रस्त झाली आहे. आम्हाला ४८ तासांत जाण्यास सांगितले आहे. हे कसे शक्य आहे. अटारी हे जोधपूरपासून ९०० किमी दूर आहे. आम्हाला बस मिळत नाहीत. माझ्या पतीला तिकिटांसाठी १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. २७ तारखेला जाणार होतो. परंतू, या हल्ल्यामुळे आता जावे लागत आहे. माझा पासपोर्ट भारतीय आहे, परंतू मी अर्धी पाकिस्तानी आहे. दहशतवाद्यांना अल्ला शिक्षा देईल, पण यात आमची काय चूक, आमच्यासारख्या लग्न होऊन गेलेल्यांसाठी एक पर्याय खुला ठेवावा, अशी दोन्ही सरकारांना विनंती करत असल्याचे या महिलेने सांगितले. 

तर दिल्लीत माहेरी आलेल्या महिलेने तिची आपबिती सांगितली आहे. सादिया अल्वी ही भारतीय आहे, तिचे कराचीतील मुलाशी लग्न झाले आहे. सादिया म्हणते, माझ्याकडे भारतीय पासपोर्ट आहे, त्यावरचा व्हिसा संपला आहे. तर माझ्या पाच वर्षांच्या मुलाकडे पाकिस्तानी पासपोर्ट आहे. मी पाकिस्तानात जाऊ शकत नाही, मुलाला एकटे कसे पाठवू, असा सवाल तिने केला आहे. पाकिस्तानी एम्बेसीमध्ये गेलेली परंतू ती बंद आहे. सरकारने याचा विचार करावा व मला व्हिसा द्यावा जेणेकरून मी मुलासह पतीच्या घरी जाऊ शकेन, असे सादिया म्हणत आहे. 

असाच प्रकार पाकिस्तानात गेलेल्या महिलांच्या बाबत घडला आहे. तिकडून भारतात येण्यासाठी त्या निघाल्या आहेत, परंतू वाघा बॉर्डर बंद असल्याने परत माघारी फिरावे लागले आहे. सिंध प्रांतातील हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाच्या लोकांवर या निर्णयाचा परिणाम होत आहे. १५ वर्षांची मुलगी तिकडे १० वी ची परीक्षा देण्यासाठी गेली होती, ती देखील आता तिथे अडकली आहे. आठ महिन्यांपूर्वी तिचे कुटुंब धार्मिक अत्याचाराला कंटाळून भारतात आले होते. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानIndiaभारतWagha Borderवाघा बॉर्डर