शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
3
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
4
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
5
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
6
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
7
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
8
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
9
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
10
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
11
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
12
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
14
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
15
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
16
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
17
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
18
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
19
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
20
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा

अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 15:49 IST

India vs Pakistan: भारतात सासर, पाकिस्तानात माहेर किंवा पाकिस्तानात सासर, भारतात माहेर असलेल्या अनेकजणी आपापल्या माहेरी आलेल्या होत्या. त्यांना सगळे आवरून मुलांना घेऊन वाघा किंवा अटारी बॉर्डर गाठावी लागत आहे. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानींना देश सोडण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली आहे. तर त्याला प्रत्यूत्तर म्हणून पाकिस्ताननेहीभारतीय नागरिकांना ४८ तासांची मुदत दिली आहे. परंतू, मुख्य अडचण माहेरवाशिनींची झाली आहे. भारतात सासर, पाकिस्तानात माहेर किंवा पाकिस्तानात सासर, भारतात माहेर असलेल्या अनेकजणी आपापल्या माहेरी आलेल्या होत्या. त्यांना सगळे आवरून मुलांना घेऊन वाघा किंवा अटारी बॉर्डर गाठावी लागत आहे. 

पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...

याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या

कराचीला दिलेली जोधपूरची महिला यामुळे त्रस्त झाली आहे. आम्हाला ४८ तासांत जाण्यास सांगितले आहे. हे कसे शक्य आहे. अटारी हे जोधपूरपासून ९०० किमी दूर आहे. आम्हाला बस मिळत नाहीत. माझ्या पतीला तिकिटांसाठी १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. २७ तारखेला जाणार होतो. परंतू, या हल्ल्यामुळे आता जावे लागत आहे. माझा पासपोर्ट भारतीय आहे, परंतू मी अर्धी पाकिस्तानी आहे. दहशतवाद्यांना अल्ला शिक्षा देईल, पण यात आमची काय चूक, आमच्यासारख्या लग्न होऊन गेलेल्यांसाठी एक पर्याय खुला ठेवावा, अशी दोन्ही सरकारांना विनंती करत असल्याचे या महिलेने सांगितले. 

तर दिल्लीत माहेरी आलेल्या महिलेने तिची आपबिती सांगितली आहे. सादिया अल्वी ही भारतीय आहे, तिचे कराचीतील मुलाशी लग्न झाले आहे. सादिया म्हणते, माझ्याकडे भारतीय पासपोर्ट आहे, त्यावरचा व्हिसा संपला आहे. तर माझ्या पाच वर्षांच्या मुलाकडे पाकिस्तानी पासपोर्ट आहे. मी पाकिस्तानात जाऊ शकत नाही, मुलाला एकटे कसे पाठवू, असा सवाल तिने केला आहे. पाकिस्तानी एम्बेसीमध्ये गेलेली परंतू ती बंद आहे. सरकारने याचा विचार करावा व मला व्हिसा द्यावा जेणेकरून मी मुलासह पतीच्या घरी जाऊ शकेन, असे सादिया म्हणत आहे. 

असाच प्रकार पाकिस्तानात गेलेल्या महिलांच्या बाबत घडला आहे. तिकडून भारतात येण्यासाठी त्या निघाल्या आहेत, परंतू वाघा बॉर्डर बंद असल्याने परत माघारी फिरावे लागले आहे. सिंध प्रांतातील हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाच्या लोकांवर या निर्णयाचा परिणाम होत आहे. १५ वर्षांची मुलगी तिकडे १० वी ची परीक्षा देण्यासाठी गेली होती, ती देखील आता तिथे अडकली आहे. आठ महिन्यांपूर्वी तिचे कुटुंब धार्मिक अत्याचाराला कंटाळून भारतात आले होते. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानIndiaभारतWagha Borderवाघा बॉर्डर