शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
3
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
4
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
5
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
6
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
7
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
8
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
9
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
10
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
11
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
12
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
13
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
14
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
15
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
16
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
17
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
19
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
20
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 15:49 IST

India vs Pakistan: भारतात सासर, पाकिस्तानात माहेर किंवा पाकिस्तानात सासर, भारतात माहेर असलेल्या अनेकजणी आपापल्या माहेरी आलेल्या होत्या. त्यांना सगळे आवरून मुलांना घेऊन वाघा किंवा अटारी बॉर्डर गाठावी लागत आहे. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानींना देश सोडण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली आहे. तर त्याला प्रत्यूत्तर म्हणून पाकिस्ताननेहीभारतीय नागरिकांना ४८ तासांची मुदत दिली आहे. परंतू, मुख्य अडचण माहेरवाशिनींची झाली आहे. भारतात सासर, पाकिस्तानात माहेर किंवा पाकिस्तानात सासर, भारतात माहेर असलेल्या अनेकजणी आपापल्या माहेरी आलेल्या होत्या. त्यांना सगळे आवरून मुलांना घेऊन वाघा किंवा अटारी बॉर्डर गाठावी लागत आहे. 

पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...

याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या

कराचीला दिलेली जोधपूरची महिला यामुळे त्रस्त झाली आहे. आम्हाला ४८ तासांत जाण्यास सांगितले आहे. हे कसे शक्य आहे. अटारी हे जोधपूरपासून ९०० किमी दूर आहे. आम्हाला बस मिळत नाहीत. माझ्या पतीला तिकिटांसाठी १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. २७ तारखेला जाणार होतो. परंतू, या हल्ल्यामुळे आता जावे लागत आहे. माझा पासपोर्ट भारतीय आहे, परंतू मी अर्धी पाकिस्तानी आहे. दहशतवाद्यांना अल्ला शिक्षा देईल, पण यात आमची काय चूक, आमच्यासारख्या लग्न होऊन गेलेल्यांसाठी एक पर्याय खुला ठेवावा, अशी दोन्ही सरकारांना विनंती करत असल्याचे या महिलेने सांगितले. 

तर दिल्लीत माहेरी आलेल्या महिलेने तिची आपबिती सांगितली आहे. सादिया अल्वी ही भारतीय आहे, तिचे कराचीतील मुलाशी लग्न झाले आहे. सादिया म्हणते, माझ्याकडे भारतीय पासपोर्ट आहे, त्यावरचा व्हिसा संपला आहे. तर माझ्या पाच वर्षांच्या मुलाकडे पाकिस्तानी पासपोर्ट आहे. मी पाकिस्तानात जाऊ शकत नाही, मुलाला एकटे कसे पाठवू, असा सवाल तिने केला आहे. पाकिस्तानी एम्बेसीमध्ये गेलेली परंतू ती बंद आहे. सरकारने याचा विचार करावा व मला व्हिसा द्यावा जेणेकरून मी मुलासह पतीच्या घरी जाऊ शकेन, असे सादिया म्हणत आहे. 

असाच प्रकार पाकिस्तानात गेलेल्या महिलांच्या बाबत घडला आहे. तिकडून भारतात येण्यासाठी त्या निघाल्या आहेत, परंतू वाघा बॉर्डर बंद असल्याने परत माघारी फिरावे लागले आहे. सिंध प्रांतातील हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाच्या लोकांवर या निर्णयाचा परिणाम होत आहे. १५ वर्षांची मुलगी तिकडे १० वी ची परीक्षा देण्यासाठी गेली होती, ती देखील आता तिथे अडकली आहे. आठ महिन्यांपूर्वी तिचे कुटुंब धार्मिक अत्याचाराला कंटाळून भारतात आले होते. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानIndiaभारतWagha Borderवाघा बॉर्डर