शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 14:42 IST

गुजरातमधील भावनगर येथे राहणारा सावन परमार आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्यामुळे खूप दुःखी झाला आहे.

गुजरातमधील भावनगर येथे राहणारा सावन परमार आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्यामुळे खूप दुःखी झाला आहे. त्याने सरकारच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सावन परमारने पहलगाम दहशतवादी हल्ल्यात वडील आणि भाऊ गमावला आहे. "माझ्या भावाला गोळी लागली, मला तो परत आणून द्या आणि मग पाकिस्तानशी मॅच खेळा..." असं सावन परमारने म्हटलं आहे. 

आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचा सामना असल्याने कुटुंबीय खूश नाहीत. पहलगाम हल्ल्यात २६ जणांना आपला जीव गमवावा लागला, ज्यात गुजरातमधील भावनगर येथील सुमित परमार आणि त्याचे वडील यतिश परमार यांचा समावेश होता. सावन परमार म्हणाला की, "पाकिस्तान हा दहशतवादी देश असल्याने त्याच्याशी कोणतेही व्यवहार होऊ नये." 

"BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"

"माझा १६ वर्षांचा भाऊ परत आणून द्या"

"जर तुम्हाला पाकिस्तानसोबत सामना खेळायचा असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा १६ वर्षांचा भाऊ परत आणून द्या. ऑपरेशन सिंदूर हे भारत सरकारने केलं होतं, जर सामना झाला तर हे व्यर्थ होईल. एकूणच, पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचे व्यवहार व्हायला नकोत." भारत आणि पाकिस्तानमधील सामन्याला अनेक लोकांनी विरोध केला आहे.

"आमच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत"

पती आणि मुलगा गमावलेल्या किरण परमार म्हणाल्या की, "हा सामना होऊ नये. मी पंतप्रधान मोदींना विचारू इच्छिते की, जर ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही, तर हा भारत-पाकिस्तान सामना का होत आहे? मी संपूर्ण देशाला सांगू इच्छितो की पहलगाम दहशतवादी हल्ल्यात ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे त्यांना भेटा आणि ते किती दुःखी आहेत ते पाहा. आमच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत..."

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद