पान २ : ट्रकचालकांनाही हवे प्रत्येकी ५ लाखांचे पॅकेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2015 15:56 IST2015-07-16T15:56:24+5:302015-07-16T15:56:24+5:30

ट्रक चालकांनाही हवे प्रत्येकी ५ लाखांचे पॅकेज

Page 2: Truckers also have a package of 5 lakh each | पान २ : ट्रकचालकांनाही हवे प्रत्येकी ५ लाखांचे पॅकेज

पान २ : ट्रकचालकांनाही हवे प्रत्येकी ५ लाखांचे पॅकेज

रक चालकांनाही हवे प्रत्येकी ५ लाखांचे पॅकेज
शिवसेनेचा पाठिंबा
पणजी : खनिज व्यवसायग्रस्त ट्रकचालकांना प्रत्येकी ५ लाख रुपये आर्थिक साहाय्य देण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन गोवा शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व मुख्य सचिव यांना देण्यात येणार आहे. ट्रकचालकांच्या मागण्यांवर आठ दिवसांत निकाल न दिल्यास आंदोलनाची भूमिका घेईल, असा इशारा गोवा शिवसेनेचे अध्यक्ष ॲड. अजितसिंग राणे यांनी दिला.
गोवा ट्रकचालक संघटनेचे सरचिटणीस विष्णू सावळ यांच्या उपस्थिती राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी शिवसेनेचे समीर च्यारी, गोविंद ताम्हसकर इत्यादी उपस्थित होते.
राणे म्हणाले, राज्यात खनिज व्यवसाय बंद पडल्यास तीन वर्ष पूर्ण झाली. सरकारने ट्रकमालकांना आर्थिक सहकार्य केले मात्र ट्रकचालकांना खर्‍या अर्थाने आर्थिक सहकार्याची गरज असूनही सरकार व खनिज मालकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. खनिज भागातील ७००० हजार गोमंतकीय ट्रकचालक, वाहक बेरोजगार आहेत. उपजीविका चालवण्याचे त्यांच्याकडे कोणतेही साधन नाही. सध्या हे ट्रकचालक अत्यंत कठीण अशा आर्थिक समस्येतून जात आहेत. सरकारने ट्रकचालकांना आर्थिक मदत देण्याबाबत त्वरित निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याने आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे, असे राणे म्हणाले.
खनिज व्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकांच्या कल्याणासाठी सरकारने महामंडळ स्थापन करण्याची गरज होती. महामंडळाद्वारेच सरकारने खाणी चालवायला हव्या. महामंडळ स्थापन झाल्यास खनिजग्रस्त घटकांना न्याय मागण्यासाठी जागा उपलब्ध होईल. यापुढे राज्यात खनिज व्यवसाय सुरू होऊ घातल्यास तो खनिज महामंडळाच्या अंतर्गत सुरू व्हावा, अशी मागणीही राणे यांनी केली.

(फोटो अत्री देणार)

Web Title: Page 2: Truckers also have a package of 5 lakh each

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.