(पान -१- मतदान) (सुधारित)

By Admin | Updated: May 12, 2014 22:59 IST2014-05-12T22:59:19+5:302014-05-12T22:59:19+5:30

सोळाव्या लोकसभेसाठी विक्रमी मतदान

(Page 1-poll) (improved) | (पान -१- मतदान) (सुधारित)

(पान -१- मतदान) (सुधारित)

ळाव्या लोकसभेसाठी विक्रमी मतदान

शेवटच्या टप्प्यातही उत्साह : प. बंगाल-८० टक्के, उ.प्रदेश-५६ टक्के, बिहार-५४ टक्के

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या अंतिम आणि नवव्या टप्प्यात तीन राज्यांमधील ४१ जागांसाठी आज (सोमवार) आधीच्या टप्प्यांप्रमाणेच भरघोस मतदान झाले. त्यामुळे सोळाव्या लोकसभेसाठी झालेल्या मतदानाची सरासरी स्व. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या १९८४ च्या निवडणुकीतील विक्रमी टक्केवारीपेक्षा (६४.०१) सरस ठरली. यंदा संपूर्ण देशात सरासरी ६६.३८ टक्के मतदारांनी आपला कौल दिला.
आजच्या टप्प्यात प. बंगालमध्ये सर्वाधिक ८० टक्के, उत्तर प्रदेशात ५६, तर बिहारमध्ये ५४ टक्के मतदान झाले. प. बंगालमधील हिंसाचाराच्या किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. उत्तर प्रदेशात वाराणसीतील लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून, तेथे ५५.३४ टक्के मतदान झाले. २००९ मध्ये तेथे ४३.३४ टक्के मतदान झाले होते. बिहारमधील सहा, प. बंगालमधील १७, तर उत्तर प्रदेशातील १८ जागांवर अखेरच्या टप्प्यात किरकोळ अपवाद वगळता सुरळीत मतदान झाल्याचे उपनिवडणूक आयुक्त विनोद जुत्शी यांनी सांगितले. २००९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सरासरी ५८़ १९ टक्के मतदान झाले होते़ (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: (Page 1-poll) (improved)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.