शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सिंधूताईंसह राज्यातील सहा जणांना पद्म पुरस्कार; उद्योगपती रजनीकांत श्रॉफ यांना पद्मभूषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 03:15 IST

नामदेव कांबळे, गिरीश प्रभुणे यांचाही समावेश 

नवी दिल्ली : पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, साहित्यिक नामदेव कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांच्यासह महाराष्ट्रातील सहा जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. 

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाने पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यात महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. उद्योगपती रजनीकांत श्रॉफ यांना पद्म भूषण तर शेकडो अनाथांना मायेने सांभाळणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, भटक्या विमुक्तांसाठी काम करणारे ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे, ‘राघव वेळ’ या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीचे लेखक नामदेव कांबळे, कळसुत्री बाहुल्यांची कला जिवंत ठेवलेले परशुराम गंगावणे आणि उद्योजिका जयवंतीबेन जमनादास पोपट यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. गोव्याचे संशोधक विनायक खेडेकर यांनाही पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.