शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

Padma Awards 2024: पद्म पुरस्काराची घोषणा; देशातील पहिल्या महिला माहुतसह ३४ जणांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 23:08 IST

पारबती यांना त्यांच्या वडिलांकडून हे कौशल्य वारसा म्हणून मिळाले. वयाच्या १४ व्या वर्षीपासून त्यांनी या कामाला सुरुवात केली.

नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी संध्याकाळी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या, सर्वसामान्यांसाठी प्रेरणास्थान असलेल्या आणि ज्यांच्या जीवनकथा लोकांना सकारात्मक संदेश देऊ शकतात अशा अविस्मरणीय वीरांचा देशाने गौरव केला आहे. या यादीत ३४ नायकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पारबती बरुआ (प्रथम महिला माहुत), जागेश्वर यादव (आदिवासी कार्यकर्ता), चामी मुर्मू (आदिवासी पर्यावरणवादी आणि महिला सक्षमीकरण) या नावांचा समावेश आहे.

पारबती बरुआ : पहिली महिला माहुत

आसामच्या पार्वती बरुआ या ६७ वर्षांच्या आहेत. त्यांना सामाजिक कार्य (प्राणी कल्याण) क्षेत्रात पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पारबती, भारतातील पहिल्या महिला माहूत आहेत ज्यांनी पारंपारिकपणे पुरुषप्रधान क्षेत्रात स्वत:साठी एक स्थान निर्माण करण्यासाठी प्रथेला छेद दिला. आणि त्यासाठी वचनबद्ध राहिली. मनुष्य आणि हत्ती यांच्यातील संघर्षाच्या संकटाचा सामना करण्यासाठी त्यांनी राज्य सरकारांना मदत केली. वन्य हत्तींना कसे पकडायचे आणि त्यांच्या समस्येचा सामना कसा करायचा यासाठी त्यांच्या वैज्ञानिक पद्धती प्रभावी होत्या.

पारबती यांना त्यांच्या वडिलांकडून हे कौशल्य वारसा म्हणून मिळाले. वयाच्या १४ व्या वर्षीपासून त्यांनी या कामाला सुरुवात केली. या कार्यात गेल्या ४ दशकापासून त्या कार्यरत आहेत. हत्तीपासून अनेक लोकांचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. सामान्य जीवन जगणे आणि लोकांच्या सेवेसाठी आयुष्य खर्ची घालणे हे त्यांचे ध्येय बनले. 

जागेश्वर यादव : बिरहोरचा भाऊ

जशपूर येथील आदिवासी कल्याणासाठी झटणारे कार्यकर्ते जागेश्वर यादव यांचीही पद्मश्रीसाठी निवड झाली आहे. छत्तीसगडचे जागेश्वर यादव ६७ वर्षांचे आहे. त्यांना सामाजिक कार्यासाठी (आदिवासी - पीव्हीटीजी) पद्म पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. त्यांनी आपले जीवन उपेक्षित बिरहोर आणि पहाडी कोरवा लोकांच्या उन्नतीसाठी समर्पित केले. जशपूरमध्ये आश्रम स्थापन केला. तिथे शिबिरे उभारून निरक्षरता दूर करण्यासाठी आणि मानक आरोग्य सेवा सुधारण्याचे काम केले. महामारीच्या काळात त्यांनी भीती दूर करून लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली, ज्यामुळे बालमृत्यूचे प्रमाणही कमी होण्यास मदत झाली. आर्थिक अडचणी असूनही सामाजिक बदल घडवून आणण्याची त्यांची तळमळ कायम राहिली.

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिन २०२४