शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

Padma Awards 2024: पद्म पुरस्काराची घोषणा; देशातील पहिल्या महिला माहुतसह ३४ जणांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 23:08 IST

पारबती यांना त्यांच्या वडिलांकडून हे कौशल्य वारसा म्हणून मिळाले. वयाच्या १४ व्या वर्षीपासून त्यांनी या कामाला सुरुवात केली.

नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी संध्याकाळी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या, सर्वसामान्यांसाठी प्रेरणास्थान असलेल्या आणि ज्यांच्या जीवनकथा लोकांना सकारात्मक संदेश देऊ शकतात अशा अविस्मरणीय वीरांचा देशाने गौरव केला आहे. या यादीत ३४ नायकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पारबती बरुआ (प्रथम महिला माहुत), जागेश्वर यादव (आदिवासी कार्यकर्ता), चामी मुर्मू (आदिवासी पर्यावरणवादी आणि महिला सक्षमीकरण) या नावांचा समावेश आहे.

पारबती बरुआ : पहिली महिला माहुत

आसामच्या पार्वती बरुआ या ६७ वर्षांच्या आहेत. त्यांना सामाजिक कार्य (प्राणी कल्याण) क्षेत्रात पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पारबती, भारतातील पहिल्या महिला माहूत आहेत ज्यांनी पारंपारिकपणे पुरुषप्रधान क्षेत्रात स्वत:साठी एक स्थान निर्माण करण्यासाठी प्रथेला छेद दिला. आणि त्यासाठी वचनबद्ध राहिली. मनुष्य आणि हत्ती यांच्यातील संघर्षाच्या संकटाचा सामना करण्यासाठी त्यांनी राज्य सरकारांना मदत केली. वन्य हत्तींना कसे पकडायचे आणि त्यांच्या समस्येचा सामना कसा करायचा यासाठी त्यांच्या वैज्ञानिक पद्धती प्रभावी होत्या.

पारबती यांना त्यांच्या वडिलांकडून हे कौशल्य वारसा म्हणून मिळाले. वयाच्या १४ व्या वर्षीपासून त्यांनी या कामाला सुरुवात केली. या कार्यात गेल्या ४ दशकापासून त्या कार्यरत आहेत. हत्तीपासून अनेक लोकांचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. सामान्य जीवन जगणे आणि लोकांच्या सेवेसाठी आयुष्य खर्ची घालणे हे त्यांचे ध्येय बनले. 

जागेश्वर यादव : बिरहोरचा भाऊ

जशपूर येथील आदिवासी कल्याणासाठी झटणारे कार्यकर्ते जागेश्वर यादव यांचीही पद्मश्रीसाठी निवड झाली आहे. छत्तीसगडचे जागेश्वर यादव ६७ वर्षांचे आहे. त्यांना सामाजिक कार्यासाठी (आदिवासी - पीव्हीटीजी) पद्म पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. त्यांनी आपले जीवन उपेक्षित बिरहोर आणि पहाडी कोरवा लोकांच्या उन्नतीसाठी समर्पित केले. जशपूरमध्ये आश्रम स्थापन केला. तिथे शिबिरे उभारून निरक्षरता दूर करण्यासाठी आणि मानक आरोग्य सेवा सुधारण्याचे काम केले. महामारीच्या काळात त्यांनी भीती दूर करून लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली, ज्यामुळे बालमृत्यूचे प्रमाणही कमी होण्यास मदत झाली. आर्थिक अडचणी असूनही सामाजिक बदल घडवून आणण्याची त्यांची तळमळ कायम राहिली.

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिन २०२४