शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
4
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
5
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
6
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
7
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
8
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
9
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
10
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
11
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
12
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
13
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
15
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
16
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
18
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
19
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
20
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?

Padma Awards 2024: पद्म पुरस्काराची घोषणा; देशातील पहिल्या महिला माहुतसह ३४ जणांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 23:08 IST

पारबती यांना त्यांच्या वडिलांकडून हे कौशल्य वारसा म्हणून मिळाले. वयाच्या १४ व्या वर्षीपासून त्यांनी या कामाला सुरुवात केली.

नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी संध्याकाळी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या, सर्वसामान्यांसाठी प्रेरणास्थान असलेल्या आणि ज्यांच्या जीवनकथा लोकांना सकारात्मक संदेश देऊ शकतात अशा अविस्मरणीय वीरांचा देशाने गौरव केला आहे. या यादीत ३४ नायकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पारबती बरुआ (प्रथम महिला माहुत), जागेश्वर यादव (आदिवासी कार्यकर्ता), चामी मुर्मू (आदिवासी पर्यावरणवादी आणि महिला सक्षमीकरण) या नावांचा समावेश आहे.

पारबती बरुआ : पहिली महिला माहुत

आसामच्या पार्वती बरुआ या ६७ वर्षांच्या आहेत. त्यांना सामाजिक कार्य (प्राणी कल्याण) क्षेत्रात पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पारबती, भारतातील पहिल्या महिला माहूत आहेत ज्यांनी पारंपारिकपणे पुरुषप्रधान क्षेत्रात स्वत:साठी एक स्थान निर्माण करण्यासाठी प्रथेला छेद दिला. आणि त्यासाठी वचनबद्ध राहिली. मनुष्य आणि हत्ती यांच्यातील संघर्षाच्या संकटाचा सामना करण्यासाठी त्यांनी राज्य सरकारांना मदत केली. वन्य हत्तींना कसे पकडायचे आणि त्यांच्या समस्येचा सामना कसा करायचा यासाठी त्यांच्या वैज्ञानिक पद्धती प्रभावी होत्या.

पारबती यांना त्यांच्या वडिलांकडून हे कौशल्य वारसा म्हणून मिळाले. वयाच्या १४ व्या वर्षीपासून त्यांनी या कामाला सुरुवात केली. या कार्यात गेल्या ४ दशकापासून त्या कार्यरत आहेत. हत्तीपासून अनेक लोकांचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. सामान्य जीवन जगणे आणि लोकांच्या सेवेसाठी आयुष्य खर्ची घालणे हे त्यांचे ध्येय बनले. 

जागेश्वर यादव : बिरहोरचा भाऊ

जशपूर येथील आदिवासी कल्याणासाठी झटणारे कार्यकर्ते जागेश्वर यादव यांचीही पद्मश्रीसाठी निवड झाली आहे. छत्तीसगडचे जागेश्वर यादव ६७ वर्षांचे आहे. त्यांना सामाजिक कार्यासाठी (आदिवासी - पीव्हीटीजी) पद्म पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. त्यांनी आपले जीवन उपेक्षित बिरहोर आणि पहाडी कोरवा लोकांच्या उन्नतीसाठी समर्पित केले. जशपूरमध्ये आश्रम स्थापन केला. तिथे शिबिरे उभारून निरक्षरता दूर करण्यासाठी आणि मानक आरोग्य सेवा सुधारण्याचे काम केले. महामारीच्या काळात त्यांनी भीती दूर करून लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली, ज्यामुळे बालमृत्यूचे प्रमाणही कमी होण्यास मदत झाली. आर्थिक अडचणी असूनही सामाजिक बदल घडवून आणण्याची त्यांची तळमळ कायम राहिली.

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिन २०२४