शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

'पॅकेजची हेडलाईन झाली, पण घरवापसी करणाऱ्या मजुरांच्या सद्य परिस्थितीचं काय?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 22:18 IST

कोरोनामुळे जगभरात ४२ लाखांपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले आहेत. पावणे तीन लाख लोकांचा मृत्यू झाला असून भारतामध्येही अनेक कुटुंबांनी त्यांचे आप्तजण गमावले आहेत.

मुंबई - पंतप्रधाननरेंद्र मोदींनी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासंदर्भात माहिती देत देशवासीयांना संबोधित केले. कोरोनासारख्या एका व्हायरसने जगाला उद्धवस्त केले आहे. करोडो लोक संकटाचा सामना करत आहेत. यापूर्वी आम्ही असे संकट ना पाहिले किंवा ऐकलेही नाही. हे कल्पनेपलिकडचे आहे. एकविसावे शतक भारताचे असावे, यासाठी आपली जबाबदारी आहे. म्हणून, एकच मार्ग आहे, स्वावलंबी भारत. शास्त्रामध्येही हेच सांगितले आहे, असे म्हणत मोदींनी चौथ्या लॉकडाऊनसंदर्भातही संकेत दिले आहेत. तसेच, देशातील नागरिकांसाठी २० लाख कोटींच्या पॅकेजचीही घोषणा केली. मात्र, गावाकडे, घराकडे वापस जाणाऱ्या मजुरांच्या आत्ताच्या परिस्थितीसंदर्भात मोदी काहीच बोलले नाहीत. यावरुन काँग्रेसने मोदींना लक्ष्य केले आहे. 

कोरोनामुळे जगभरात ४२ लाखांपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले आहेत. पावणे तीन लाख लोकांचा मृत्यू झाला असून भारतामध्येही अनेक कुटुंबांनी त्यांचे आप्तजण गमावले आहेत. त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. एका व्हायरसने जगाला उद्धवस्त केले आहे. करोडो लोक संकटाचा सामना करत आहेत. आम्ही असे संकट ना पाहिलेय, ना ऐकले. हे कल्पनेपलिकडचे आहे, असे मोदींनी सांगितले. तसेच मोदींनी जीडीपीच्या १० टक्के आर्थिक पॅकेजची घोषणा केली. म्हणजेच देशातील प्रत्येक नागरिकांसाठी, मजूरांपासून ते उद्योजकांपर्यंत सर्वच भारतीयांसाठी मोदींनी २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. त्यानंतर, चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन संदर्भातही मोदींनी महत्वाची सूचना केली. 

याचबरोबर मी विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा करतो. स्वावलंबी भारत मोहिमेसाठी हे पॅकेज काम करेल. गेल्या काळात आर्थिक पॅकेज दिले होते. त्याला आणि आजच्या पॅकजला जोडले तर जवळपास २० लाख कोटी रुपयांचे आहे. भारताच्या जीडीपीच्या जवळपास १० टक्के आहे. या पॅकेजमध्ये जमीन, कामगार यावर लक्ष देऊन बनविण्यात आले आहे. यामध्ये कुटीर उद्योग, लघू, मध्यम उद्योग, यासाठी हे पॅकेज आहे. हे पॅकेज देशाच्या श्रमिक आणि शेतकऱ्यासाठी आहे, असे मोदींनी सांगितले. मात्र, सध्या लॉकडाऊनमुळए होत असलेल्या स्थलांतरीत मजूर, कामगारांच्या सद्यपरिस्थितीबाबत मोदींनीही काहीही वक्तव्य केले नाही. यावरुन काँग्रेसने प्रश्न उपस्थित करत मोदी सरकार असंवेदनशील असल्याचं म्हटलं आहे. 

देशभरात स्थलांतरीत करत असलेल्या मजूर, कामगार, गरिब वर्गातील नागरिकांना सर्वात प्रथम मदत मिळणे गरजेचं आहे. आज आपण या कामगारांसाठी काहीतरी पॅकेज जाहीर कराल, अशी आशा होती. देश आणि राष्ट्रनिर्मित्तीसाठी कार्यरत असलेल्या मजूर आणि कष्टकरी बांधवांप्रति आपली निष्ठुरता आणि असंवेदनशीलता निराशाजनक असल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. तसेच, मोदींनी जे पॅकेज जाहीर केलं ते सत्यात उतरण्याची वाट पाहात आहोत, असेही सुरजेवाला यांनी म्हटले आहे.  

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानcongressकाँग्रेसMigrationस्थलांतरणcorona virusकोरोना वायरस बातम्या