शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
4
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
5
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
6
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
7
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
8
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
9
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
10
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
11
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
12
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
13
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
14
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
15
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
16
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
17
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
18
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
19
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
20
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

निर्मला सीतारामन यांनी राजीनामा द्यावा- चिदंबरम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 23:09 IST

चिदंबरम यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली: अर्थव्यवस्थेच्या बिकट अवस्थेवरुन मोदी सरकारला वारंवार लक्ष्य करणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. निर्मला सीतारामन यांच्या जागी मी असतो आणि माझे निर्णय अशाच प्रकारे चुकले असते, तर मी राजीनामा दिला असता, असंदेखील ते पुढे म्हणाले. इंडिया टुडे या इंग्रजी वृत्तवाहिनीला चिदंबरम यांनी मुलाखत दिली. त्यात त्यांनी अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला.अर्थव्यवस्था वाढीचा वेग, महागाई, औद्योगिक उत्पादन याबद्दलची आकडेवारी देत चिदंबरम यांनी अर्थव्यवस्था संकटात असल्याचं म्हटलं. 'खाद्यपदार्थांशी संबंधित महागाई १० टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे. कारखानदारीच्या वाढीचा वेग ३.८ टक्क्यांवर आला आहे,' असं चिदंबरम म्हणाले. यंदाचं आर्थिक वर्ष संपताना विकास दर वाढीचा वेग ५ टक्क्यांपेक्षा कमी असेल, असं भाकीत त्यांनी वर्तवलं. जुन्या निकषांच्या आधारे पाहायला गेल्यास हा दर केवळ ३ ते ३.५ टक्के इतका असेल, असंदेखील त्यांनी स्पष्ट केलं. अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ अर्थचक्राचाच भाग असल्याचा मोदी सरकारचा दावा चिदंबरम यांनी पूर्णपणे खोडून काढला. सध्या निर्माण झालेली परिस्थिती अर्थचक्राचा भाग असल्याच्या दाव्यावर केवळ दोनच व्यक्ती विश्वास ठेवू शकतात. त्यातील एक व्यक्ती म्हणजे अर्थमंत्री आणि दुसरी व्यक्ती म्हणजे मुख्य आर्थिक सल्लागार, असा टोला त्यांनी लगावला. आर्थिक मंदी रचनात्मक असल्याचं अर्थक्षेत्रातील जाणकारांचं मत असून त्या संदर्भात सरकारनं तातडीनं पावलं उचलण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले. मोदी सरकारनं केलेल्या दोन गंभीर चुकांमुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडल्याचं त्यांनी सांगितलं. निश्चलीकरण ही अतिशय मोठी चूक होती. वस्तू आणि सेवा कराची सरकारनं अतिशय चुकीच्या पद्धतीनं केली. सरकारनं कर आणि तपास यंत्रणांच्या हाती बरेचसे अधिकार दिले. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात भीती निर्माण झाली, अशा शब्दांत चिदंबरम यांनी अर्थव्यवस्थेचं विश्लेषण केलं.  

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनEconomyअर्थव्यवस्था