शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

देशात असमानता झपाट्याने वाढली: पी. चिदंबरम; आर्थिक धोरणांच्या पुनर्रचनेची काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 05:59 IST

भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने अर्थव्यवस्था संकटात घातली आहे. तथापि, ही बाब लोकांपर्यंत पोहोचविण्यात आपण अपयशी ठरल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे. 

नवी दिल्ली : ३० वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी भारतीय अर्थव्यवस्था खुली केल्यानंतरच्या काळात जागतिक तसेच देशांतर्गत पातळीवर मोठे बदल झाले असून, त्यानुषंगाने आता आर्थिक धोरणांची पुनर्रचना करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने अर्थव्यवस्था संकटात घातली आहे. तथापि, ही बाब लोकांपर्यंत पोहोचविण्यात आपण अपयशी ठरल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे. 

काँग्रेसच्या चिंतन शिबिराच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, १९९१ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने देशात उदारीकरणाचे नवे पर्व सुरू केले होते. यातून संपत्ती निर्मिती, नवे व्यवसाय व उद्योग, प्रचंड मोठा मध्यमवर्ग, लक्षावधी रोजगार आणि निर्यात वाढ असे प्रचंड फायदे झाले. पहिल्या १० वर्षांत तब्बल २७ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले. आता ३० वर्षांनंतर जगातील तसेच देशातील परिस्थिती बदलली आहे. आता आर्थिक धोरणांची फेररचना करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

चिदंबरम यांनी म्हटले की, आता देशात असमानता झपाट्याने वाढत आहे. १० टक्के लोकसंख्या अत्यंत गरिबीत ढकलली गेली आहे. २०२१ च्या जागतिक भूक निर्देशांकात भारताचे स्थान (११६ देशांत १०१ वे) कमालीचे घसरले आहे. महिला व मुलांत पोषणाची कमतरता वाढली आहे. उदारीकरणापासून काँग्रेस परत फिरत आहे का? या प्रश्नावर चिदंबरम म्हणाले की, नाही. आम्ही उदारीकरणाच्या पुढचे पाऊल टाकत आहोत. सध्याच्या सरकारचे अपयश लोकांसमोर आणण्यास काँग्रेस अपयशी ठरली आहे का? या प्रश्नावर चिंदबरम म्हणाले की, अर्थव्यवस्थेची बिकट स्थिती लोकांना समजून सांगण्यात आम्ही अपयशी ठरलो.

महिला आरक्षण; काँग्रेसची आता कोट्याच्या आत कोट्याला पसंती

- उदयपूर येथे सुरू असलेल्या चिंतन शिबिरात काँग्रेसने महिला आरक्षणाविषयीच्या आपल्या भूमिकेवरून घूमजाव केले असून, आता ‘कोट्याच्या आत कोटा’ या धोरणाची शिफारस केली आहे. 

- काँग्रेसच्या सामाजिक व्यवहार समितीने यासंबंधीचा प्रस्ताव संमत केला आहे. तो उद्या काँग्रेस कार्यसमितीसमोर ठेवला जाईल. महिला आरक्षण विधेयकास काँग्रेस संसदेत विरोध करीत आहे. 

- माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात महिला आरक्षण विधेयक प्रथमत: संसदेत मांडण्यात आले होते. संपुआच्या घटक पक्षांनी विरोध केला होता. 

- राष्ट्रीय जनता दलाच्या सदस्यांनी हे विधेयक फाडून टाकले होते. बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टी यांनीही विधेयकास विरोध केला होता.

काँग्रेस पक्षातील युवक काँग्रेस व त्या पक्षाची विद्यार्थी संघटना एनएसयूआयमधील निवडणुका बंद होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे उद्यपूर येथे तीन दिवसांचे नवसंकल्प शिबीर सुरू आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी या दोन संघटनांमधील निवडणुकांबाबत चर्चा झाली. त्या निवडणुका बंद करण्याबाबतचा प्रस्ताव उद्या कार्यकारिणीच्या बैठकीत मांडला जाणार आहे.

काँग्रेसमधील बहुतांश नेत्यांचे मत असे आहे की, एनएसयूआय व युवक काँग्रेसमधील नेत्यांनी त्या संघटनांच्या निवडणुकांपेक्षा उत्तम काम करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. या निवडणुका बंद करण्याच्या प्रस्ताव शनिवारी काँग्रेसच्या एका समितीने संमत केला व तो चर्चा व मंजुरीसाठी कार्यकारिणीकडे पाठविला.

२००७ साली राहुल गांधी काँग्रेसचे सरचिटणीस झाल्यानंतर युवक काँग्रेस व एनएसयूआयमध्ये निवडणुका घेण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे सामान्य कुटुंबातील मुलांनाही राजकारणात पुढे येण्याची उत्तम संधी मिळेल असा राहुल गांधी यांचा विचार होता. या निवडणुकांमुळे नवे नेतृत्व पुढे येण्यास मदतच झाली.

टॅग्स :congressकाँग्रेसP. Chidambaramपी. चिदंबरमCentral Governmentकेंद्र सरकार