शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

देशात असमानता झपाट्याने वाढली: पी. चिदंबरम; आर्थिक धोरणांच्या पुनर्रचनेची काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 05:59 IST

भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने अर्थव्यवस्था संकटात घातली आहे. तथापि, ही बाब लोकांपर्यंत पोहोचविण्यात आपण अपयशी ठरल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे. 

नवी दिल्ली : ३० वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी भारतीय अर्थव्यवस्था खुली केल्यानंतरच्या काळात जागतिक तसेच देशांतर्गत पातळीवर मोठे बदल झाले असून, त्यानुषंगाने आता आर्थिक धोरणांची पुनर्रचना करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने अर्थव्यवस्था संकटात घातली आहे. तथापि, ही बाब लोकांपर्यंत पोहोचविण्यात आपण अपयशी ठरल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे. 

काँग्रेसच्या चिंतन शिबिराच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, १९९१ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने देशात उदारीकरणाचे नवे पर्व सुरू केले होते. यातून संपत्ती निर्मिती, नवे व्यवसाय व उद्योग, प्रचंड मोठा मध्यमवर्ग, लक्षावधी रोजगार आणि निर्यात वाढ असे प्रचंड फायदे झाले. पहिल्या १० वर्षांत तब्बल २७ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले. आता ३० वर्षांनंतर जगातील तसेच देशातील परिस्थिती बदलली आहे. आता आर्थिक धोरणांची फेररचना करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

चिदंबरम यांनी म्हटले की, आता देशात असमानता झपाट्याने वाढत आहे. १० टक्के लोकसंख्या अत्यंत गरिबीत ढकलली गेली आहे. २०२१ च्या जागतिक भूक निर्देशांकात भारताचे स्थान (११६ देशांत १०१ वे) कमालीचे घसरले आहे. महिला व मुलांत पोषणाची कमतरता वाढली आहे. उदारीकरणापासून काँग्रेस परत फिरत आहे का? या प्रश्नावर चिदंबरम म्हणाले की, नाही. आम्ही उदारीकरणाच्या पुढचे पाऊल टाकत आहोत. सध्याच्या सरकारचे अपयश लोकांसमोर आणण्यास काँग्रेस अपयशी ठरली आहे का? या प्रश्नावर चिंदबरम म्हणाले की, अर्थव्यवस्थेची बिकट स्थिती लोकांना समजून सांगण्यात आम्ही अपयशी ठरलो.

महिला आरक्षण; काँग्रेसची आता कोट्याच्या आत कोट्याला पसंती

- उदयपूर येथे सुरू असलेल्या चिंतन शिबिरात काँग्रेसने महिला आरक्षणाविषयीच्या आपल्या भूमिकेवरून घूमजाव केले असून, आता ‘कोट्याच्या आत कोटा’ या धोरणाची शिफारस केली आहे. 

- काँग्रेसच्या सामाजिक व्यवहार समितीने यासंबंधीचा प्रस्ताव संमत केला आहे. तो उद्या काँग्रेस कार्यसमितीसमोर ठेवला जाईल. महिला आरक्षण विधेयकास काँग्रेस संसदेत विरोध करीत आहे. 

- माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात महिला आरक्षण विधेयक प्रथमत: संसदेत मांडण्यात आले होते. संपुआच्या घटक पक्षांनी विरोध केला होता. 

- राष्ट्रीय जनता दलाच्या सदस्यांनी हे विधेयक फाडून टाकले होते. बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टी यांनीही विधेयकास विरोध केला होता.

काँग्रेस पक्षातील युवक काँग्रेस व त्या पक्षाची विद्यार्थी संघटना एनएसयूआयमधील निवडणुका बंद होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे उद्यपूर येथे तीन दिवसांचे नवसंकल्प शिबीर सुरू आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी या दोन संघटनांमधील निवडणुकांबाबत चर्चा झाली. त्या निवडणुका बंद करण्याबाबतचा प्रस्ताव उद्या कार्यकारिणीच्या बैठकीत मांडला जाणार आहे.

काँग्रेसमधील बहुतांश नेत्यांचे मत असे आहे की, एनएसयूआय व युवक काँग्रेसमधील नेत्यांनी त्या संघटनांच्या निवडणुकांपेक्षा उत्तम काम करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. या निवडणुका बंद करण्याच्या प्रस्ताव शनिवारी काँग्रेसच्या एका समितीने संमत केला व तो चर्चा व मंजुरीसाठी कार्यकारिणीकडे पाठविला.

२००७ साली राहुल गांधी काँग्रेसचे सरचिटणीस झाल्यानंतर युवक काँग्रेस व एनएसयूआयमध्ये निवडणुका घेण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे सामान्य कुटुंबातील मुलांनाही राजकारणात पुढे येण्याची उत्तम संधी मिळेल असा राहुल गांधी यांचा विचार होता. या निवडणुकांमुळे नवे नेतृत्व पुढे येण्यास मदतच झाली.

टॅग्स :congressकाँग्रेसP. Chidambaramपी. चिदंबरमCentral Governmentकेंद्र सरकार