शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

आसाममधील पुराचा ५४ लाख जणांना फटका, ८१ मृत्यूमुखी; पंतप्रधान मोदींकडून मदतीचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 17:06 IST

पंतप्रधान मोदींचा आसामचे मुख्यमंत्री सोनोवाल यांच्याशी संवाद; सर्वतोपरी मदतीचं आश्वासन

पुराचा फटका बसलेल्या आसामला पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे. आसाममधील पुराचा फटका ३० जिल्ह्यांमधल्या ५४ लाख नागरिकांन बसला असून यामुळे आतापर्यंत ८१ जणांचा मृत्यू झाला आहे. या संदर्भात पंतप्रधान मोदींनी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी संवाद साधला असून राज्यातल्या परिस्थितीची माहिती त्यांच्याकडून घेतली आहे. राज्याला सर्वतोपरी सहाय्य करण्याचं आश्वासन मोदींकडून देण्यात आलं आहे.पंतप्रधान मोदींनी संपर्क साधून राज्यातल्या विविध विषयांची माहिती घेतल्याचं मुख्यमंत्री सोनोवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं. 'पंतप्रधान मोदींनी आसाममधील पूरस्थिती, कोरोना संकट आणि बघजन तेलविहिरीतील आगीबद्दलची माहिती फोनवरून घेतली. त्यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली. या कठीण काळात देश तुमच्यासोबत असून राज्याला आवश्यक ती सर्व मदत देण्यात येईल, असं आश्वासन मोदींनी दिलं, असं सोनोवाल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. पुरामुळे आसामचं मोठं नुकसान झालं आहे. पुरामुळे आतापर्यंत ८१ जणांचा मृत्यू झाला असून भूस्खलनामुळे मृत पावलेल्यांची संख्या २६ इतकी आहे. त्यामुळे या वर्षी आलेल्या पुरात आणि त्यामुळे झालेल्या भूस्खलनात मृत पावलेल्यांचा आकडा १०७ वर जाऊन पोहोचला आहे. पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना आतापर्यंत राज्य सरकारकडून ९९ हजार १७६ क्विंटल तांदूळ, १९ हजार ३९७ क्विंटल डाळ आणि १ लाख ७३ हजार लीटर मोहरीच्या तेलाचा पुरवठा करण्यात आला आहे.सर्व मंत्री आणि आमदारांनी त्यांच्या जिल्ह्यांमधील पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत करावी, असं आवाहन मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केलं आहे. राज्यातल्या ३० जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे. १६७ पूल, १६०० पेक्षा अधिक रस्त्यांचं पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे.

टॅग्स :Assam Floodआसाम पूरNarendra Modiनरेंद्र मोदी