शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

जम्मू-काश्मीरमध्ये 400हून अधिक नेत्यांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 09:58 IST

जम्मू-काश्मीरमधील 400 हून अधिक नेत्यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील 400 हून अधिक नेत्यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्यातील नेत्यांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले आहेत. 

काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर मुख्य सचिव बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांनी राज्यातील 900 हून अधिक नेत्यांची सुरक्षा हटविली होती. तसेच, याप्रकरणी राज्यातील राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सुरक्षा हटवण्यात आल्यामुळे प्रमुख नेत्यांचा जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे याचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो, असे तक्रारीत म्हटले होते. 

दरम्यान, राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सांगितले की, राज्यातील योग्य नेत्यांना सुरक्षा लवकरात पुरवण्यात येत आहे.  जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या एक वर्षापासून राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले आहे. राज्यात 11 एप्रिल ते 6 मे पर्यंत पाच टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहे.

पुलवामा येथील दहशतवादी हल्यानंतर केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेतली होती. यावर राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली होती. शनिवारी श्रीनगरमध्ये एक उच्च स्तरीय बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षतेवर चर्चा करण्यात आली. यात नेत्यांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिसpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला