शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
Sonam Raghuvanshi : राजाच्या हत्येचा प्लॅन अयशस्वी झाला असता तर काय करणार होती सोनम? बॅकअप प्लॅन तयार
4
ट्रेन प्रवासाची चिंता मिटली! आता २४ तास आधीच मिळेल कन्फर्म सीटची अपडेट, कधीपासून लागू होणार?
5
कुणाल कपूरच्या गुड लूक्सवर चाहते फिदा, 'रामायण'च्या सेटवरचा फोटो केला शेअर? चाहते म्हणाले...
6
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
7
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
8
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
9
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
10
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली, गोलंदाजांना फुटला घाम
11
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
12
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
13
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
14
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
15
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
16
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
17
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
18
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
19
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
20
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."

जम्मू-काश्मीरमध्ये 400हून अधिक नेत्यांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 09:58 IST

जम्मू-काश्मीरमधील 400 हून अधिक नेत्यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील 400 हून अधिक नेत्यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्यातील नेत्यांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले आहेत. 

काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर मुख्य सचिव बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांनी राज्यातील 900 हून अधिक नेत्यांची सुरक्षा हटविली होती. तसेच, याप्रकरणी राज्यातील राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सुरक्षा हटवण्यात आल्यामुळे प्रमुख नेत्यांचा जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे याचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो, असे तक्रारीत म्हटले होते. 

दरम्यान, राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सांगितले की, राज्यातील योग्य नेत्यांना सुरक्षा लवकरात पुरवण्यात येत आहे.  जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या एक वर्षापासून राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले आहे. राज्यात 11 एप्रिल ते 6 मे पर्यंत पाच टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहे.

पुलवामा येथील दहशतवादी हल्यानंतर केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेतली होती. यावर राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली होती. शनिवारी श्रीनगरमध्ये एक उच्च स्तरीय बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षतेवर चर्चा करण्यात आली. यात नेत्यांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिसpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला