आसाम-नागालँडच्या सीमेवर हिंसाचाराचा उद्रेक; तीन ठार

By Admin | Updated: August 20, 2014 23:02 IST2014-08-20T23:02:04+5:302014-08-20T23:02:04+5:30

गोळीबारात तीन ठार तर अन्य सहा जखमी झाल़े या हिंसाचारानंतर संपूर्ण शहरात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आह़े

The outbreak of violence in Assam-Nagaland border; Three killed | आसाम-नागालँडच्या सीमेवर हिंसाचाराचा उद्रेक; तीन ठार

आसाम-नागालँडच्या सीमेवर हिंसाचाराचा उद्रेक; तीन ठार

गोलाघाट/जोरहाट : आसाम-नागालँड सीमेवरील गोलाघाट शहरात आज बुधवारी पुन्हा एकदा हिंसाचाराचा भडका उडाला़ संतप्त जमावाने उपायुक्त कार्यालय, पोलीस ठाणो जाळण्याचा आणि एका रुग्णालयालाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न करताच पोलिसांना गोळीबार करावा लागला़ या गोळीबारात तीन ठार तर अन्य सहा जखमी झाल़े या हिंसाचारानंतर संपूर्ण शहरात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आह़े
दरम्यान, या हिंसाचाराची गंभीर दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रलयाकडून अहवाल मागितला़ यानंतर काही तासांतच गृह मंत्रलयाने त्यांच्याकडे अहवाल सादर केला़ केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आसाम आणि नागालँडच्या   मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सीमेवरील तणाव त्वरित संपविण्याचे निर्देश दिल़े
 गत 12 ऑगस्ट रोजी गोलाघाट जिल्ह्यात आसाम- नागालँडच्या आंतरराज्यीय सीमेलगतच्या गावात कथितरीत्या सशस्त्र नागा बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात किमान 11 लोक ठार झाले होत़े त्यानंतर गोलाघाटमध्ये हिंसाचार भडकला आह़े काल मंगळवारी एका नागरिकाच्या मृत्यूनंतर आंदोलक संतप्त झाले होत़े यानंतर पोलिसांनी लाठीमार केला होता़ आज पोलिसांच्या या कारवाईचा विरोध करीत  सुमारे हजारावर आंदोलक पुन्हा रस्त्यावर आल़े शहराच्या इरेंगपारा चरियाली भागात आंदोलकांनी उपायुक्त कार्यालय व ठाणो जाळण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्यांना पांगविण्यासाठी अश्रूधुराचा वापर केला़ यामुळे आंदोलक संतापले व त्यांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू केली़ (वृत्तसंस्था)
 
 
अखेर पोलिसांना गोळीबार करावा लागला़ यात तीन ठार तर सहा जण जखमी झाल़े
 
4आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी आसाम-नागालँड सीमेवरील हिंसाचार आणि तणावपूर्ण स्थितीचे संपूर्ण खापर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या माथ्यावर फोडल़े केंद्र सरकार दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागांत सुरक्षा पुरविण्यात अपयशी ठरल्याचा ठपका त्यांनी ठेवला़ 
केंद्र म्हणते, गोगोईंचे आरोप निराधार
4सीआरपीएफवरील मुख्यमंत्री गोगोई यांनी लावलेला निष्क्रियतेचा आरोप केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी फेटाळून लावला़ आसाम-नागालँड दोन्ही राज्यांच्या स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा हिंसाचार भडकला आहे, असे ते म्हणाले.

 

Web Title: The outbreak of violence in Assam-Nagaland border; Three killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.