शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

जनता आमच्या ठाम पाठीशी - पंतप्रधान

By admin | Updated: April 12, 2017 04:29 IST

राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने लक्षणीय विजय मिळविल्याने आणि संसदेत अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेण्यास सरकारला यश आल्याने

नवी दिल्ली : राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने लक्षणीय विजय मिळविल्याने आणि संसदेत अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेण्यास सरकारला यश आल्याने संसदेचे सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात सत्ताधारी ‘विजेते’ ठरले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले.संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याच्या आदल्या दिवशी भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत मोदी बोलत होते. सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असल्याने आणि सत्ताधाऱ्यांविषयी जनतेचा ‘मूड’ सकारात्मक असल्याने आर्थिक सुधारणा व विकासाचा अजेंडा अधिक नेटाने राबविण्यावर त्यांनी भर दिला. भाजपाच्या संसद सदस्यांना उद्देशून पंतप्रधान म्हणाले की, गरीब आणि वंचितांचे जीवनमान उंचावण्याची आपल्याला ही सुवर्णसंधी आहे. अधिक विकास आणि अधिक सुधारणा राबविण्याची हीच वेळ आहे.मोदी असेही म्हणाले की, सन २०१४ मध्ये आपल्याला निवडून देताना लोकांनी जी आशा मनात बाळगली होती ती आता विश्वासामध्ये परिवर्तित झाली आहे. विधानसभा निवडणुकांमधील पक्षाचे उज्ज्वल यश हे याचेच द्योतक आहे.मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असल्याने येत्या २४ मेपासून हाती घेण्यात येणाऱ्या महिनाभराच्या कार्यक्रमांची माहितीही बैठकीत देण्यात आली. संसदीय कामकाजमंत्री अनंत कुमार यांनी बैठकीतील कामकाजाची नंतर पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले की, लोकसभेने २१ व राज्यसभेने १४ विधेयके मंजूर केल्याने संसदेचे हे अधिवेशन खूपच विधायक ठरल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. मंजूर झालेल्या या विधेयकांमध्ये ‘जीएसटी’खेरीज राजकीयदृष्ट्या महत्वाचे असे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगासंबंधीच्या विधेयकाचाही समावेश आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)हनुमान : समर्पित समाजसेवकही बैठक हनुमान जयंतीच्या दिवशी होत असल्याचा उल्लेख करून मोदी यांनी रामभक्त हनुमानाचे वर्णन ‘समर्पित समाजसेवक’ असे केले आणि त्याच्यापासून सर्वांनीच स्फूर्ती घ्यायला हवी, असे सांगितले.मोदी हे गरिबांचे मसिहा!बैठकीत बोलताना माहिती आाणि नभोवाणीमंत्री व्यंकय्या नायडू यांनी पंतप्रधानांच्या नेतृत्वगुणांची तोंड भरून स्तुती केली आणि मोदी हे ‘गरिबांचे मसिहा’ असल्याचा दावा केला. यासंदर्भत त्यांनी मंगळवारी झालेल्या ‘रालोआ’मधील ३३ पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीचा उल्लेख केला आणि अकाली दलाचे प्रकाश सिंग बादल व तेलगू देसमचे चंद्राबाबू नायडू यांनी मोदींच्या ‘परिवर्तनात्मक नेतृत्वा’चे कोतुक केल्याचे स्मरण दिले.