शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

जनता आमच्या ठाम पाठीशी - पंतप्रधान

By admin | Updated: April 12, 2017 04:29 IST

राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने लक्षणीय विजय मिळविल्याने आणि संसदेत अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेण्यास सरकारला यश आल्याने

नवी दिल्ली : राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने लक्षणीय विजय मिळविल्याने आणि संसदेत अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेण्यास सरकारला यश आल्याने संसदेचे सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात सत्ताधारी ‘विजेते’ ठरले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले.संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याच्या आदल्या दिवशी भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत मोदी बोलत होते. सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असल्याने आणि सत्ताधाऱ्यांविषयी जनतेचा ‘मूड’ सकारात्मक असल्याने आर्थिक सुधारणा व विकासाचा अजेंडा अधिक नेटाने राबविण्यावर त्यांनी भर दिला. भाजपाच्या संसद सदस्यांना उद्देशून पंतप्रधान म्हणाले की, गरीब आणि वंचितांचे जीवनमान उंचावण्याची आपल्याला ही सुवर्णसंधी आहे. अधिक विकास आणि अधिक सुधारणा राबविण्याची हीच वेळ आहे.मोदी असेही म्हणाले की, सन २०१४ मध्ये आपल्याला निवडून देताना लोकांनी जी आशा मनात बाळगली होती ती आता विश्वासामध्ये परिवर्तित झाली आहे. विधानसभा निवडणुकांमधील पक्षाचे उज्ज्वल यश हे याचेच द्योतक आहे.मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असल्याने येत्या २४ मेपासून हाती घेण्यात येणाऱ्या महिनाभराच्या कार्यक्रमांची माहितीही बैठकीत देण्यात आली. संसदीय कामकाजमंत्री अनंत कुमार यांनी बैठकीतील कामकाजाची नंतर पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले की, लोकसभेने २१ व राज्यसभेने १४ विधेयके मंजूर केल्याने संसदेचे हे अधिवेशन खूपच विधायक ठरल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. मंजूर झालेल्या या विधेयकांमध्ये ‘जीएसटी’खेरीज राजकीयदृष्ट्या महत्वाचे असे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगासंबंधीच्या विधेयकाचाही समावेश आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)हनुमान : समर्पित समाजसेवकही बैठक हनुमान जयंतीच्या दिवशी होत असल्याचा उल्लेख करून मोदी यांनी रामभक्त हनुमानाचे वर्णन ‘समर्पित समाजसेवक’ असे केले आणि त्याच्यापासून सर्वांनीच स्फूर्ती घ्यायला हवी, असे सांगितले.मोदी हे गरिबांचे मसिहा!बैठकीत बोलताना माहिती आाणि नभोवाणीमंत्री व्यंकय्या नायडू यांनी पंतप्रधानांच्या नेतृत्वगुणांची तोंड भरून स्तुती केली आणि मोदी हे ‘गरिबांचे मसिहा’ असल्याचा दावा केला. यासंदर्भत त्यांनी मंगळवारी झालेल्या ‘रालोआ’मधील ३३ पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीचा उल्लेख केला आणि अकाली दलाचे प्रकाश सिंग बादल व तेलगू देसमचे चंद्राबाबू नायडू यांनी मोदींच्या ‘परिवर्तनात्मक नेतृत्वा’चे कोतुक केल्याचे स्मरण दिले.