शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

जनता आमच्या ठाम पाठीशी - पंतप्रधान

By admin | Updated: April 12, 2017 04:29 IST

राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने लक्षणीय विजय मिळविल्याने आणि संसदेत अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेण्यास सरकारला यश आल्याने

नवी दिल्ली : राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने लक्षणीय विजय मिळविल्याने आणि संसदेत अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेण्यास सरकारला यश आल्याने संसदेचे सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात सत्ताधारी ‘विजेते’ ठरले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले.संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याच्या आदल्या दिवशी भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत मोदी बोलत होते. सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असल्याने आणि सत्ताधाऱ्यांविषयी जनतेचा ‘मूड’ सकारात्मक असल्याने आर्थिक सुधारणा व विकासाचा अजेंडा अधिक नेटाने राबविण्यावर त्यांनी भर दिला. भाजपाच्या संसद सदस्यांना उद्देशून पंतप्रधान म्हणाले की, गरीब आणि वंचितांचे जीवनमान उंचावण्याची आपल्याला ही सुवर्णसंधी आहे. अधिक विकास आणि अधिक सुधारणा राबविण्याची हीच वेळ आहे.मोदी असेही म्हणाले की, सन २०१४ मध्ये आपल्याला निवडून देताना लोकांनी जी आशा मनात बाळगली होती ती आता विश्वासामध्ये परिवर्तित झाली आहे. विधानसभा निवडणुकांमधील पक्षाचे उज्ज्वल यश हे याचेच द्योतक आहे.मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असल्याने येत्या २४ मेपासून हाती घेण्यात येणाऱ्या महिनाभराच्या कार्यक्रमांची माहितीही बैठकीत देण्यात आली. संसदीय कामकाजमंत्री अनंत कुमार यांनी बैठकीतील कामकाजाची नंतर पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले की, लोकसभेने २१ व राज्यसभेने १४ विधेयके मंजूर केल्याने संसदेचे हे अधिवेशन खूपच विधायक ठरल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. मंजूर झालेल्या या विधेयकांमध्ये ‘जीएसटी’खेरीज राजकीयदृष्ट्या महत्वाचे असे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगासंबंधीच्या विधेयकाचाही समावेश आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)हनुमान : समर्पित समाजसेवकही बैठक हनुमान जयंतीच्या दिवशी होत असल्याचा उल्लेख करून मोदी यांनी रामभक्त हनुमानाचे वर्णन ‘समर्पित समाजसेवक’ असे केले आणि त्याच्यापासून सर्वांनीच स्फूर्ती घ्यायला हवी, असे सांगितले.मोदी हे गरिबांचे मसिहा!बैठकीत बोलताना माहिती आाणि नभोवाणीमंत्री व्यंकय्या नायडू यांनी पंतप्रधानांच्या नेतृत्वगुणांची तोंड भरून स्तुती केली आणि मोदी हे ‘गरिबांचे मसिहा’ असल्याचा दावा केला. यासंदर्भत त्यांनी मंगळवारी झालेल्या ‘रालोआ’मधील ३३ पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीचा उल्लेख केला आणि अकाली दलाचे प्रकाश सिंग बादल व तेलगू देसमचे चंद्राबाबू नायडू यांनी मोदींच्या ‘परिवर्तनात्मक नेतृत्वा’चे कोतुक केल्याचे स्मरण दिले.