आमची माती आमची माणसे यासाठी लेख (मोहोळ लेख क्र. 1)
By Admin | Updated: March 25, 2015 21:10 IST2015-03-25T21:10:03+5:302015-03-25T21:10:03+5:30
पेनूर (वार्ताहर)- सुहासकुमार आवारे

आमची माती आमची माणसे यासाठी लेख (मोहोळ लेख क्र. 1)
प नूर (वार्ताहर)- सुहासकुमार आवारे‘एकमेका सहाय्य करू अवघे धरु सुपंथ’ या श्लोकास साजेसे वातावरण आपणास कोन्हेरी (ता़ मोहोळ) येथील राजमाता कृषी केंद्रात पाहावयास मिळते. या कृषी केंद्राच्या उभारणीस गावातील सर्व शेतकर्यांचे आर्थिक सहकार्य राजमाता कृषी केंद्राचे मालक देविदास दिगंबर देवकते यांना झाले. देविदास दिगंबर देवकते यांचा जन्म कोन्हेरी या छोट्याशा गावात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोन्हेरीच्या जिल्हा परिषद शाळेत झाले तर पुढील शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी संभाजीराव गरड महाविद्यालयात झाले. धनगर समाजात जन्माला आलेल्या या होतकरू लहान मुलास लहानपणापासूनच शेतीची अत्यंत आवड. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने लहानपणापासून शेतीत काम करत. त्यांचे वडील दिगंबर खेलू देवकते यांना नेहमी शेतीसाठी लागणारी खते, औषधे, बी-बियाणांसाठी मोहोळ तालुक्याच्या ठिकाणी यावे लागत. ते नेहमी त्यांच्या वडिलांसोबत जात. तेव्हा त्यांची त्या ठिकाणी होणारी हेळसांड, घालावे लागणारे हेलपाटे त्यांना पाहावत नव्हते. असेच एकदा कांदा बी घेण्यासाठी ते दुकानात वडिलांसोबत गेले. सतत सात ते आठ दिवस हेलपाटे मारत होते. प्रत्येक वेळेस नकार मिळत असे. शेवटी दुकानदाराने चढय़ा दराने बिया दिल्या. त्यावेळेस त्यांनी आपल्या मनाशी ठरवले की गावात आपण स्वत: दुकान टाकायचे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाने व आपल्या गावातील शेतकर्यांकडून पैसे जमा करून खत दुकानाचा परवाना काढला. पुढचा मोठा प्रश्न होता दुकानात मालाचा. तेव्हादेखील कोन्हेरी गावातील शेतकर्यांनी आर्थिक मदत केली. 6 सप्टेंबर 2011 रोजी सुरू झालेल्या राजमाता कृषी केंद्रास अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला; पण न डगमगता मोठय़ा धिराने चिकाटी सोडली नाही. आज अक्षरश: रांगेत उभे राहून खत मिळवावे लागते. कोन्हेरीसारख्या छोट्या गावात कृषी केंद्र चालू झाल्याने शेतकर्यांचा वाया जाणारा वेळ, आर्थिक पिळवणूक थांबली.त्यातूनच पुढे शेतकर्यांना रोपासाठी कोठेही जाऊ नये, त्यांच्या वेळेची व पैशाची बचत व्हावी या उद्देशाने ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर रोपवाटिका सुरू केली. अत्यंत वाजवी दरात सर्व भाजीपाल्यांची रोपे मिळू लागली. धनगर समाजाच्या मुलाने अत्यंत अल्प काळात परिसरातील शेतकर्यांसाठी केलेले काम, त्याची तळमळ मोहोळ तालुक्याचे भाग्यविधाते, माजी आमदार राजनजी पाटील यांच्या नजरेने हेरली. ते स्वत: 31 मार्च 2014 रोजी राजमाता रोपवाटिकाचे उद्घाटन केले. देविदास दिगंबर देवकते यांचे राजन पाटील यांनी कौतुक केले व सर्व तरुणांनी त्यांचा आदर्श घेण्याचा सल्ला दिला.देविदास देवकतेमोबा. 9860149520,9881641436