शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

...अन्यथा भरचौकात फासावर लटकेन; केजरीवालांना गंभीरचे तिसरे चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 16:28 IST

गंभीरवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा अरविंद केजरीवाल यांनी दिला आहे.

नवी दिल्ली : एरव्ही परदेशी क्रिकेटपटूंना सोशल मिडीयावरून प्रत्युत्तर देत प्रसिद्धीच्या झोतात असलेला माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. मात्र, भाजपात प्रवेश केल्यापासून सोशल मिडीयावर टीकेचा धनी ठरत आहे. आपच्या उमेदवार आतिशी मार्लेना यांच्याबाबतची आक्षेपार्ह पत्रके वाटल्यावरून टीका होत असताना गंभीरने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तिसरे चॅलेंज दिले आहे. यामध्ये त्याने लोकांसमोर स्वत:ला फाशी लावून घेणार असल्याचे सांगितले आहे. 

पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजपानेगौतम गंभीरला निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. तर त्याच्या विरोधात आपकडून आतिशी मार्लेना या उभ्या राहिल्या आहेत. आतिशींनी गौतम गंभीरवर गेल्या काही दिवसांत गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये गौतम गंभीरकडे दोन मतदान ओळखपत्रे असल्याचा दावाही करताना त्याच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल झालेली आहे. तसेच प्रचार पत्रकांवर पत्रकांची संख्या आणि मुद्रकाचे नाव न छापल्याचाही गुव्हा दाखल झालेला आहे. यापेक्षा गंभीर आरोप त्याच्यावर आतिशी यांनी गुरुवारी केला आहे. 

मतदासंघातल्या काही ठिकाणी आतिशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर असलेली पत्रकं वाटण्यात आली. यामागे भाजपा आणि गौतम गंभीर असल्याचा आरोप मार्लेना यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये केला. गंभीर एखाद्या सशक्त महिलेविरोधात अशा प्रकारची पत्रकं वाटू शकतात. तर ते महिलांना काय सुरक्षा देणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांना पत्रकातील मजकूर वाचून दाखवत असताना रडू कोसळले होते. या प्रकरणी आपच्या उमेदवार आतिशी यांनी दिल्ली महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी गंभीरविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. 

 

यावर केजरीवाल यांनी आतिशी एवढ्या चांगल्या शिकलेल्या उमेदवार असताना आणि त्यांनी शिक्षणासाठी एवढे चांगले काम केलेले असताना भाजपा आणि त्यांच्या उमेदवार गौतम गंभीर असले कृत्य करेल असे वाटले नव्हते. गंभीरवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यावर गौतम गंभीरने ट्विट करत केजरीवाल यांच्यासारखा घाणेरडा मुख्यमंत्री पाहिला नसल्याचे म्हटले होते. या प्रकरणी त्याने गेल्या काही दिवसांपासून केजरीवाल यांना दोन चॅलेंज दिली होती. यामध्ये उमेदवारी मागे घेण्याचेही म्हटले होते. आज त्याने फासावर लटकण्याचा इशाराच दिला आहे. 

आतिशी यांच्याबाबत मी जर असा प्रकार केला हे जर केजरीवाल आणि आपने सिद्ध केल्यास लोकांच्यासमोर स्वत:ला फाशी लावून घेणार असल्याचे ट्विट त्याने केले आहे. तसेच जर केजरीवाल अपयशी ठरले तर त्यांनी राजकारण सोडावे, असे आव्हानही दिले आहे.

 

टॅग्स :Gautam Gambhirगौतम गंभीरArvind Kejriwalअरविंद केजरीवालeast-delhi-pcपूर्व दिल्लीDelhi Lok Sabha Election 2019दिल्ली लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपा