शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

"…अन्यथा मालदा, किशनगंजसारख्या भागातून हिंदू संपुष्टात येतील’’, संविधान हातात घेत भाजपा खासदाराने केली मोठी मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 20:03 IST

Nishikant Dubey News: झारखंडमधील गोड्डा येतील भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी आज लोकसभेमध्ये राज्यघटनेची प्रत हातात घेत एका गंभीर मुद्द्याकडे सरकारचं लक्ष वेधलं. निशिकांत दुबे यांनी घटत्या आदिवासी लोकसंख्येचा मुद्दा आज संसदेत उपस्थित केला.

झारखंडमधील गोड्डा येतील भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी आज लोकसभेमध्ये राज्यघटनेची प्रत हातात घेत एका गंभीर मुद्द्याकडे सरकारचं लक्ष वेधलं. निशिकांत दुबे यांनी घटत्या आदिवासी लोकसंख्येचा मुद्दा आज संसदेत उपस्थित केला. संपूर्ण संथाळ परगण्यामध्ये आदिवासी लोकसंख्या सातत्याने घटत आहे. या प्रकरणी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, तसेच संथाळ परगण्याला केंद्रशासित प्रवेश घोषित करावे, अन्यथा येथील हिंदू संपुष्टात येतील, अशी मागणी निशिकांत दुबे यांनी केली आहे. 

निशिकांत दुबे यांनी आपल्या भाषणाला संविधान धोक्यात आहे, असं म्हणत सुरुवात केली. ते म्हणाले की, आम्ही इथे दलितांबाबत बोलतो, आदिवासींबाबत बोलतो. कुठे कुठलंही सरकार असलं तरी त्याचं अंतिम लक्ष्य हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचं असतं. मी संथाळ परगण्यातून येतो. हा भाग जेव्हा बिहारपासून वेगळा होऊन झारखंडची निर्मिती झाली. तेव्हा येथील आदिवासींची संख्या ही ३६ टक्के होती. मात्र आज आदिवासींची लोकसंख्या ही २६ टक्के आहे. मग उरलेले १० टक्के आदिवासी गेले कुठे? ते कुठे हरवले? असा सवाल निशिकांत दुबे यांनी उपस्थित केला.

निशिकांत दुबे म्हणाले की, याबाबत हे सभागृह कधीही चिंता व्यक्त करत नाही. केवळ व्होटबँकेचं राजकारण होतं. निशिकांत दुबे पुढे म्हणाले की, आमच्याकडे राज्यात जे झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसचं सरकार आहे ते याबाबत कुठलीही कारवाई करत नाही आहे. आमच्याकडे बांगलादेशींची घुसखोरी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आदिवासी महिलांसोबत हे घुसखोर विवाह करत आहेत. हा हिंदू-मुस्लिम प्रश्न नाही. आमच्याकडे जी महिला लोकसभा निवडणूक लढते ती आदिवासी कोट्यामधून लढते. मात्र तिचा पती मुस्लिम आहे. येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचा पती मुस्लिम आहे. आमच्या भागात १०० महिला सरपंच अशा आहेत. ज्या आदिवासी कोट्यामधून सरपंच झाल्या आहेत. मात्र त्यांचे पती मुस्लिम आहेत.

प्रत्येक निवडणुकीत साधारण १५ ते १७ टक्के लोकसंख्या वाढते. मात्र आमच्याकडे ती १२३ टक्क्यांनी वाढली आहे. मी ज्या लोकसभा मतदारसंघातून निवडून आलो. त्या लोकसभा मतदारसंघात मधुपूर नावाचा एक मतदारसंघ आहे. तेथील २६७ केंद्रांवर मुस्लिमांची लोकसंख्या ११७ टक्क्यांनी वाढली आहे. संपूर्ण झारखंडमध्ये किमान २५ असे विधानसभा मतदारसंघ आहेत. जिथे लोकसंख्या १२३ टक्क्यांपर्यंत लोकसंख्या वाढली आहे. ही एक मोठी चिंतेची बाब आहे, असे दुबे म्हणाले.  

निशिकांत दुबे यांनी यावेळी संसदेमध्ये २२ जुलै रोजी झारखंड उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचाही उल्लेख केला. आदिवासी लोकसंख्या सातत्याने घटत आहे. या प्रकरणी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा. तसेच मालदा, मुर्शिदाबाद, किशनगंज, अररिया, कटिहार आणि एकूण संथाळ परगण्याला केंद्रशासित प्रदेश बनवा, नाही तर येथील हिंदू संपुष्टात येतील. एनआरसी लागू करा. त्यामुळेही काय होत नसेल तर एक संसदेची एक समिती पाठवा. या समितीमध्ये टीएमसीच्य अधिकाधिक खासदारांचा समावेश करा, अशी मागणीही निशिकांत दुबे यांनी केली. 

टॅग्स :JharkhandझारखंडBJPभाजपाlok sabhaलोकसभा