शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

पावसाचे तांडव; आतापर्यंत ४७० बळी; पश्चिम बंगाल, आसाम, गुजरातला सर्वाधिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 06:47 IST

आठ राज्यांत थैैमान

नवी दिल्ली : कोरोना संकटाशी सामना करीत असतानाच देशातील काही राज्यांत मुसळधार पावसाने कहर केला आहे. त्यामुळे आठ राज्यांत पावसाने घातलेले थैमान तसेच भूस्खलनामुळे आतापर्यंत ४७० जणांचा बळी गेला आहे. या मुसळधार पावसाचा सर्वात जास्त फटका पश्चिम बंगाल, गुजरात व आसाम या राज्यांना बसला आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशातील काही राज्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे तेथील काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांत पुराच्या पाण्याने हाहाकार माजविला आहे. या नैसर्गिक संकटापासून लोकांचा बचाव करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ)ची पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. त्यांनी तिथे मदतकार्यास सुरुवातही केली. एनडीआरएफची ७० हून अधिक पथके देशातील विविध भागांत मदतीसाठी पाठविण्यात आली आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या वर्षी पावसाळ्यात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्या राज्यात सुमारे १४२ लोकांचा मुसळधार पावसाने बळी घेतला, तसेच काही लोक बेपत्ता आहेत. पावसामुळे आसाममध्ये १११ जणांचा, तर गुजरातमध्ये ८१ लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात ४६, तर उत्तर प्रदेशमध्ये ४४ लोकांना आपला जीव गमवावा लागला. गेल्या वर्षीही मुसळधार पावसामुळे देशातील काही भागात मोठे नुकसान झाले होते. एनडीआरएफचे पूरग्रस्त आसाम आणि बिहारमध्ये मदत आणि बचाव चालू आहे. तथापि, हे काम दीर्घकाळ चालेल.

२५ लाख लोकांना फटका

आसाममधील २४ जिल्ह्यांमध्ये २५ लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. त्यात गोलपाडा येथील साडेचार लाख लोकांचा समावेश आहे.

बारपेटामध्ये ३.४४ लाख, तर मोरीगाव येथे ३.४१ लाखांहून अधिक लोकांना पावसाचा फटका बसला आहे. मुसळधार पाऊस व पूर यामुळे आसाममधील काझीरंगा अभयारण्यातील प्राण्यांच्या जिवालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. तिथे आतापर्यंत १०८ प्राण्यांचा मृत्यू झाला.

आसाममधील पूरस्थितीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याकडून दूरध्वनीवरून माहिती घेतली व त्यांना मदतीचे आश्वासन दिले आहे.

346 कोटी आसामला

पुराने थैमान घातलेल्या आसामला केंद्र सरकारने पूर व्यवस्थापन कार्यक्रमातहत लवकरच ३४६ कोटी रुपयांच्या मदतीचा पहिला हप्ता देण्याची घोषणा केली. आसाममध्ये आतापर्यंत पडझड आणि पुराच्या तडाख्याने ११५ लोकांचा मृत्यू झाला आहे. बिहारमधील ८ जिल्ह्यांना पुराचा जबर तडाखा बसला साडेतेरा हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

टॅग्स :floodपूरGujaratगुजरातwest bengalपश्चिम बंगाल