गुरूपौर्णिमेनिमित्त सत्संगाचे आयोजन इरेश स्वामी : गुरूकडून मनोबल प्राप्त होते
By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:10+5:302015-08-02T22:55:10+5:30
सोलापूर :

गुरूपौर्णिमेनिमित्त सत्संगाचे आयोजन इरेश स्वामी : गुरूकडून मनोबल प्राप्त होते
स लापूर : गुरुपौर्णिमेनिमित्त सोलापुरात विविध आध्यात्मिक, धार्मिक संस्थांच्या वतीने सत्संगाचे आयोजन करण्यात आले. योगविहारात माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी यांचे भाषण झाले. गुरूकडून आत्मविश्वास आणि मनोबल प्राप्त होते, असे ते म्हणाले.कुमार स्वामीजी योगविहारात आयोजित समारंभात स्वामीजींचे साधक धनश्री कुमार, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मायनाळ, बसवराज कोळी, शंकर भंडारे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. स्वामी म्हणाले, जीवन जगत असताना आपल्याला अनंत अडचणी येत असतात. आपला व्यवहार आणि वागणे जर व्यवस्थित असेल तर गुरू या अडचणींवर मात करण्यासाठी आत्मबल देतात. गुरू ही माऊली असते. गुरू नेहमीच आपल्या साधकांवर प्रेम करतात. त्यांचे जीवन सुखमय, आनंददायी होण्यासाठी आशीर्वाद देतात. त्यामुळे गुरूपौर्णिमेच्या दिवशी गुरूप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करणे हे भक्ताचे कर्तव्य आहे. यावेळी बाबासाहेब कुलकर्णी, बसवराज कोळी, शंकर भंडारे आदी उपस्थित होते.आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने सत्संगाचे आयोजन करून एक हजार वृक्षरोपणाचा संकल्प करण्यात आला. हेरिटेज येथे प्रारंभी गुरूपूजन करण्यात आले. यावेळी बाराशे साधक उपस्थित होते. साधकांच्या उपस्थितीत भजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी रघुराज चौहान, डॉ. अंबादास गाजूल, भालचंद्र पगड्याल, अंजू क्षीरसागर, रेणुका शिरेगोंड आदी उपस्थित होते.