शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मालेगाव खटल्याला उपस्थित राहण्याचे प्रज्ञासिंह ठाकूरला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 06:35 IST

विशेष न्यायालयाने परवानगीसंदर्भातील अर्ज फेटाळला

मुंबई : भोपाळची नवी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर हिने मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील खटल्यास अनुपस्थित राहण्याची परवानगी मिळावी याकरिता केलेला अर्ज विशेष एनआयए न्यायालयाने सोमवारी फेटाळला. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर संसदेत काही महत्त्वाच्या प्रक्रिया पार पाडायच्या आहेत. त्यासाठी आपण खटल्याला उपस्थित राहू शकत नाही, असा अर्ज ठाकूरने विशेष न्यायालयात केला होता. मात्र, न्या. व्ही. पडसळकर यांनी अशा प्रकारची कारणे वारंवार चालवून घेऊ शकत नाही, असे म्हणत ठाकूरचा अर्ज फेटाळला.

‘निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे, नाव नोंदवायचे आहे व अन्य काही कारणे न्यायालय वारंवार मान्य करू शकत नाही. आरोपीने (प्रज्ञासिंह ठाकूर) यापूर्वी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले आहे,’ असे न्यायालयाने म्हटले.

‘खटल्यास अनुपस्थित राहण्यापासून एकदा सवलत देण्यात आली आहे. मात्र, आता महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात येणार आहे. सरकारी वकील या साक्षीदारांद्वारे त्यांचा आरोपीविरोधातील दावा सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे आरोपीने खटल्यास उपस्थित राहणे आवश्यक आहे,’ असे निरीक्षण विशेष न्यायालयाने नोंदविले. राजकीय नेते आरोपी असलेल्या केसचा खटला जलदगतीने संपविणे आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात म्हटले आहे. आता आरोपी राजकीय नेता आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने हा खटला जलदगतीने संपविण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे आरोपीने आठवड्यातून किमान एकदा तरी खटल्याला उपस्थित राहावे, असे न्यायालयाने म्हटले. 

गेल्या महिन्यात विशेष न्यायालयाने या खटल्यातील सातही आरोपींना आठवड्यातून एकदा खटल्यास उपस्थित राहण्याचा आदेश दिला. मात्र, निवडणुकीच्या निकालाचे कारण देत प्रज्ञासिंह ठाकूर आणि सुधाकर चतुर्वेदी यांनी खटल्यास अनुपस्थित राहण्याची परवानगी न्यायालयाकडून मागितली. तर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याने वैयक्तिक कारण पुढे करीत आपण खटल्याला हजर राहू शकत नसल्याचे न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने या तिघांचा अर्ज मान्य करीत त्यांना केवळ एक आठवड्याची सवलत दिली. मात्र, पुन्हा ठाकूरने न्यायालयात खटल्याला गैरहजर राहण्यासंदर्भात अर्ज केला. न्यायालयाने तो फेटाळला.

मालेगाव येथे २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला तर १०० हून अधिक जखमी झाले. आरोपींवर यूएपीए कायद्यातील तरतुदी व भारतीय दंडसंहितेच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टॅग्स :Malegaon Blastमालेगाव बॉम्बस्फोटNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा