शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

...जेव्हा 106 खासदारांनी दिला होता राजीनामा; राजकीय भूकंपाला 30 वर्ष पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 10:53 IST

विरोधकांच्या एकजुटीपुढे सत्ताधारी पूर्णपणे हतबल

नवी दिल्ली: विरोधकांची एकजूट काय करु शकते याचा प्रत्यय 30 वर्षांपूर्वी आला होता. विशेष म्हणजे विरोधी पक्षाचा नेता नसताना त्यांनी अभूतपूर्व एकजूट दाखवली होती. त्यावेळी सत्ताधारी पक्षाचा एक मंत्रीच विरोधकांचा नेता झाला. 24 जून 1989 ला सरकारला विरोध करताना विरोधात असलेल्या 106 खासदारांनी राजीनामे दिले. बोफोर्स तोफांच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. 

विरोधात असलेल्या 110 पैकी 106 खासदारांनी राजीनामे दिल्यानं तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींना मोठा धक्का बसला. 400 बोफोर्स तोफांच्या खरेदीसाठी राजीव गांधींच्या सरकारनं स्वीडनच्या कंपनीसोबत करार केला. यासाठी भारतातील कही नेत्यांनी आणि संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याचं वृत्त 1987 मध्ये स्वीडिश रेडिओनं दिलं. त्यानंतर संरक्षण मंत्री विश्वनाथ प्रताप सिंह यांनी हा मुद्दा लावून धरला. यामुळे 400 पेक्षा अधिक खासदार असलेल्या सत्ताधारी काँग्रेसला जोरदार दणका बसला. 
त्यावेळी 514 सदस्यसंख्या असलेल्या लोकसभेत विरोधी पक्षांमध्ये केवळ 110 खासदार होते. यामध्ये भाजपाचे 2, जनता पार्टीचे 10, डाव्यांचे 22, तेलगू देसमचे 30, एआयडीएमकेचे 12 खासदार होते. यातील 106 खासदारांनी राजीनामा दिला. सत्ताधाऱ्यांसमोर विरोधकांचं संख्याबळ अतिशय नगण्य होतं. मात्र तरीही विरोधकांच्या राजीनामा अस्त्रानं सत्ताधारी जेरीस आले. राजीव गांधींच्या मंत्रिमंडळातील सहकारी व्ही. पी. सिंहच विरोधात गेल्यानं काँग्रेसच्या अडचणी वाढल्या.  

1989 मध्ये लोकसभेची निवडणूक झाली. राजीव गांधींना पुन्हा एकदा बहुमत मिळेल, अशी शक्यता होती. मात्र अचानक बोफोर्स प्रकरण समोर आल्यानं राजीव गांधी अडचणीत आले. विरोधी पक्षांनी एकजूट दाखवली. काँग्रेसच्या जागा 404 वरुन थेट 197 वर आल्या. तर व्ही. पी. सिंग यांच्या जनता दलाला 143 जागा मिळाल्या. यानंतर व्ही. पी. सिंग पंतप्रधान झाले. 2 डिसेंबर 1989 रोजी त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली.  

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा