शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

...जेव्हा 106 खासदारांनी दिला होता राजीनामा; राजकीय भूकंपाला 30 वर्ष पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 10:53 IST

विरोधकांच्या एकजुटीपुढे सत्ताधारी पूर्णपणे हतबल

नवी दिल्ली: विरोधकांची एकजूट काय करु शकते याचा प्रत्यय 30 वर्षांपूर्वी आला होता. विशेष म्हणजे विरोधी पक्षाचा नेता नसताना त्यांनी अभूतपूर्व एकजूट दाखवली होती. त्यावेळी सत्ताधारी पक्षाचा एक मंत्रीच विरोधकांचा नेता झाला. 24 जून 1989 ला सरकारला विरोध करताना विरोधात असलेल्या 106 खासदारांनी राजीनामे दिले. बोफोर्स तोफांच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. 

विरोधात असलेल्या 110 पैकी 106 खासदारांनी राजीनामे दिल्यानं तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींना मोठा धक्का बसला. 400 बोफोर्स तोफांच्या खरेदीसाठी राजीव गांधींच्या सरकारनं स्वीडनच्या कंपनीसोबत करार केला. यासाठी भारतातील कही नेत्यांनी आणि संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याचं वृत्त 1987 मध्ये स्वीडिश रेडिओनं दिलं. त्यानंतर संरक्षण मंत्री विश्वनाथ प्रताप सिंह यांनी हा मुद्दा लावून धरला. यामुळे 400 पेक्षा अधिक खासदार असलेल्या सत्ताधारी काँग्रेसला जोरदार दणका बसला. 
त्यावेळी 514 सदस्यसंख्या असलेल्या लोकसभेत विरोधी पक्षांमध्ये केवळ 110 खासदार होते. यामध्ये भाजपाचे 2, जनता पार्टीचे 10, डाव्यांचे 22, तेलगू देसमचे 30, एआयडीएमकेचे 12 खासदार होते. यातील 106 खासदारांनी राजीनामा दिला. सत्ताधाऱ्यांसमोर विरोधकांचं संख्याबळ अतिशय नगण्य होतं. मात्र तरीही विरोधकांच्या राजीनामा अस्त्रानं सत्ताधारी जेरीस आले. राजीव गांधींच्या मंत्रिमंडळातील सहकारी व्ही. पी. सिंहच विरोधात गेल्यानं काँग्रेसच्या अडचणी वाढल्या.  

1989 मध्ये लोकसभेची निवडणूक झाली. राजीव गांधींना पुन्हा एकदा बहुमत मिळेल, अशी शक्यता होती. मात्र अचानक बोफोर्स प्रकरण समोर आल्यानं राजीव गांधी अडचणीत आले. विरोधी पक्षांनी एकजूट दाखवली. काँग्रेसच्या जागा 404 वरुन थेट 197 वर आल्या. तर व्ही. पी. सिंग यांच्या जनता दलाला 143 जागा मिळाल्या. यानंतर व्ही. पी. सिंग पंतप्रधान झाले. 2 डिसेंबर 1989 रोजी त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली.  

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा